शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

पुणे : नालायक राजकारणी आणि भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका आहे. समतेच्या प्रकाशात न्हाऊन निघणारे गाव कवीला हवे आहे. डॉ. ...

पुणे : नालायक राजकारणी आणि भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका आहे. समतेच्या प्रकाशात न्हाऊन निघणारे गाव कवीला हवे आहे. डॉ. सुभाष वाघमारे हे विचारवंत कवी असून, ते सत्तेपेक्षा सत्याचे कैवारी आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.

डॉ. सुभाष वाघमारे यांनी लिहिलेल्या ‘संविधानाच्या स्वप्नातील गाव’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात डॉ. सबनीस बोलत होते. साहित्यविश्व प्रकाशन आणि रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभाग यांनी या समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी रयतचे सचिव, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर होते. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रकाशक कवी विक्रम शिंदे उपस्थित होते.

"संविधानाचा ध्यास घेणारी २१ व्या शतकातील मराठी साहित्यातील डॉ. वाघमारे यांची दुर्मिळातील दुर्मिळ कविता आहे. भारतीय संविधान आणि ग्रामीण भारताचा अनुबंध गावाच्या माध्यमातून मराठी साहित्यात कवितेतून प्रथमच जुळवण्याचे राष्ट्रीय कर्तव्य डॉ. वाघमारे यांनी केलेले आहे. हा कवितासंग्रह संविधानाचा धर्म सांगत असून त्यात विश्वधर्माची, माणुसकीची पायाभरणी करणारी ही कविता आहे. विवेकी विद्रोह व सेक्युलर संस्कार करणारी ही कविता आहे. हरामखोर सत्तेला उध्वस्त करणे हा या कवितेचा उद्देश असून वेदनामुक्त मानवतेशी बांधलेली ही कविता सांगते आहे. मानवी विधायक संस्कृतीचा सारांश पचवलेली ही कविता आहे. विकृती भोगून संस्कृतीला जन्म देणारा हा कवी आहे. सर्व समाज सुधारक व संत यांच्यातील माणुसकीची बेरीज ही कविता करते", असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले.

डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, 'डॉ.वाघमारे हे ज्ञानप्रेमी, पुरोगामी मूल्यांसाठी संघर्ष करणारे असून माणुसकी, अभ्यासाची जाणीव व सर्वांशी संवाद साधणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे'. गावशिवारातले हंबरडे त्यांनी अनुभवले आहेत. त्यांची कविता जगत कल्याणाचा ध्यास घेतलेली असून आत्मभान,आत्मबळ,व आत्मप्रेरणा देणारी कविता आहे.'

डॉ.अनिलकुमार वावरे यांनी प्रास्ताविक केले. कवी डॉ. सुभाष वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. विक्रम शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. गजानन चव्हाण यांनी केले.