शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

पुणे : नालायक राजकारणी आणि भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका आहे. समतेच्या प्रकाशात न्हाऊन निघणारे गाव कवीला हवे आहे. डॉ. ...

पुणे : नालायक राजकारणी आणि भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका आहे. समतेच्या प्रकाशात न्हाऊन निघणारे गाव कवीला हवे आहे. डॉ. सुभाष वाघमारे हे विचारवंत कवी असून, ते सत्तेपेक्षा सत्याचे कैवारी आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.

डॉ. सुभाष वाघमारे यांनी लिहिलेल्या ‘संविधानाच्या स्वप्नातील गाव’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात डॉ. सबनीस बोलत होते. साहित्यविश्व प्रकाशन आणि रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभाग यांनी या समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी रयतचे सचिव, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर होते. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रकाशक कवी विक्रम शिंदे उपस्थित होते.

"संविधानाचा ध्यास घेणारी २१ व्या शतकातील मराठी साहित्यातील डॉ. वाघमारे यांची दुर्मिळातील दुर्मिळ कविता आहे. भारतीय संविधान आणि ग्रामीण भारताचा अनुबंध गावाच्या माध्यमातून मराठी साहित्यात कवितेतून प्रथमच जुळवण्याचे राष्ट्रीय कर्तव्य डॉ. वाघमारे यांनी केलेले आहे. हा कवितासंग्रह संविधानाचा धर्म सांगत असून त्यात विश्वधर्माची, माणुसकीची पायाभरणी करणारी ही कविता आहे. विवेकी विद्रोह व सेक्युलर संस्कार करणारी ही कविता आहे. हरामखोर सत्तेला उध्वस्त करणे हा या कवितेचा उद्देश असून वेदनामुक्त मानवतेशी बांधलेली ही कविता सांगते आहे. मानवी विधायक संस्कृतीचा सारांश पचवलेली ही कविता आहे. विकृती भोगून संस्कृतीला जन्म देणारा हा कवी आहे. सर्व समाज सुधारक व संत यांच्यातील माणुसकीची बेरीज ही कविता करते", असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले.

डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, 'डॉ.वाघमारे हे ज्ञानप्रेमी, पुरोगामी मूल्यांसाठी संघर्ष करणारे असून माणुसकी, अभ्यासाची जाणीव व सर्वांशी संवाद साधणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे'. गावशिवारातले हंबरडे त्यांनी अनुभवले आहेत. त्यांची कविता जगत कल्याणाचा ध्यास घेतलेली असून आत्मभान,आत्मबळ,व आत्मप्रेरणा देणारी कविता आहे.'

डॉ.अनिलकुमार वावरे यांनी प्रास्ताविक केले. कवी डॉ. सुभाष वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. विक्रम शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. गजानन चव्हाण यांनी केले.