शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

पुणे : नालायक राजकारणी आणि भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका आहे. समतेच्या प्रकाशात न्हाऊन निघणारे गाव कवीला हवे आहे. डॉ. ...

पुणे : नालायक राजकारणी आणि भ्रष्ट विद्वानांपासून संविधानाला धोका आहे. समतेच्या प्रकाशात न्हाऊन निघणारे गाव कवीला हवे आहे. डॉ. सुभाष वाघमारे हे विचारवंत कवी असून, ते सत्तेपेक्षा सत्याचे कैवारी आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.

डॉ. सुभाष वाघमारे यांनी लिहिलेल्या ‘संविधानाच्या स्वप्नातील गाव’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात डॉ. सबनीस बोलत होते. साहित्यविश्व प्रकाशन आणि रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभाग यांनी या समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी रयतचे सचिव, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर होते. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रकाशक कवी विक्रम शिंदे उपस्थित होते.

"संविधानाचा ध्यास घेणारी २१ व्या शतकातील मराठी साहित्यातील डॉ. वाघमारे यांची दुर्मिळातील दुर्मिळ कविता आहे. भारतीय संविधान आणि ग्रामीण भारताचा अनुबंध गावाच्या माध्यमातून मराठी साहित्यात कवितेतून प्रथमच जुळवण्याचे राष्ट्रीय कर्तव्य डॉ. वाघमारे यांनी केलेले आहे. हा कवितासंग्रह संविधानाचा धर्म सांगत असून त्यात विश्वधर्माची, माणुसकीची पायाभरणी करणारी ही कविता आहे. विवेकी विद्रोह व सेक्युलर संस्कार करणारी ही कविता आहे. हरामखोर सत्तेला उध्वस्त करणे हा या कवितेचा उद्देश असून वेदनामुक्त मानवतेशी बांधलेली ही कविता सांगते आहे. मानवी विधायक संस्कृतीचा सारांश पचवलेली ही कविता आहे. विकृती भोगून संस्कृतीला जन्म देणारा हा कवी आहे. सर्व समाज सुधारक व संत यांच्यातील माणुसकीची बेरीज ही कविता करते", असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले.

डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, 'डॉ.वाघमारे हे ज्ञानप्रेमी, पुरोगामी मूल्यांसाठी संघर्ष करणारे असून माणुसकी, अभ्यासाची जाणीव व सर्वांशी संवाद साधणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे'. गावशिवारातले हंबरडे त्यांनी अनुभवले आहेत. त्यांची कविता जगत कल्याणाचा ध्यास घेतलेली असून आत्मभान,आत्मबळ,व आत्मप्रेरणा देणारी कविता आहे.'

डॉ.अनिलकुमार वावरे यांनी प्रास्ताविक केले. कवी डॉ. सुभाष वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. विक्रम शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. गजानन चव्हाण यांनी केले.