शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींच्या पालखीस्थळावर होणार विविध सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:09 IST

नीरा/ वाल्हे : नीरा आणि वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीस्थळ कायमस्वरूपी विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. ...

नीरा/ वाल्हे : नीरा आणि वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीस्थळ कायमस्वरूपी विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठीच येथील स्थानिक आणि वारकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या आहेत. यावर लवकच कार्यवाही होईल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

पुरंदरमधील पालखी विसावा व मुक्कामाच्या ठिकाणच्या अडचणी व नवीन विकासकामांच्या संदर्भात बुधवारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी दौरा केला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे, दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार रुपाली सरनोबत, जिल्हा नियोजन आधिकारी संजय मरकळे, सहाय्यक आधिकारी किरण इंदलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, वाल्हेचे सरपंच अमोल खवले, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, संदेश पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकासातून पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामे लवकरच मार्गी लागतील. तीर्थस्थळांच्या दृष्टीने या परिसरात लोकांना सोय-सुविधा पुरवणे गरजेचे आहे. नीरा आणि वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीस्थळ कायमस्वरूपी विकसित करण्याच्या दृष्टीने स्थानिक व वारकऱ्यांचा काय मागण्या आहेत व काय उपाय योजना करता येतील हे जाणून घेत, पायी पालखी सोहळा जरी रद्द झाला असला, तरी पालखी विसावा व मुक्कामाच्या ठिकाणच्या अडचणी व नवीन विकासकामांच्या संदर्भात माहिती घेतली आहे. यावर लवकरच कार्यवाही होईल.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना नियम हा परवणीचा शब्द झाला पाहिजे. गेली दोन दिवस जरी पुरंदर तालुका कोरोना लस उपलब्ध नसली, तरी जिल्ह्यात मागील दोन दिवसांत विक्रमी संख्येने लसीकरण झाले आहे. एकाच दिवशी १ लाख ४० हजार लोकांना लिस दिली आहे. जिल्हाभरात दोन्ही महानगरपालिका व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६३० पेक्षा अधिक लसीकरण केंद्र सुरू आहेत. एकाच दिवशी दीड लाख लोकांना लसी दिली जाऊ शकते, अशी सोय केली आहे, पण लस उपलब्ध होत नाही. त्या अनुषंगाने लसींचा पुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

३० नीरा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळावर वृक्षारोपण करताना राजेश देशमुख, संजय जगताप, प्रमोद गायकवाड, रुपाली सरनोबत व इतर.