शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

ऊसशेतीला धरणाचे पाणी नाही?

By admin | Updated: September 21, 2015 03:50 IST

धरणातील पाणी ऊस पिकास देऊ नये, अशी जलतज्ज्ञांनी शिफारस केली आहे. त्यावर शासन गांभीर्याने विचार करीत असल्याने आगामी काळात उसाला

इंदापूर : धरणातील पाणी ऊस पिकास देऊ नये, अशी जलतज्ज्ञांनी शिफारस केली आहे. त्यावर शासन गांभीर्याने विचार करीत असल्याने आगामी काळात उसाला धरणातून पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याचे संकेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ही सभा झाली. साखर कारखान्यांच्या चालू गळीत हंगामासंदर्भात मंत्री समितीची बैठक अद्याप झाली नाही. बैठक झाल्याशिवाय कारखाना सुरू करता येत नाही. जर सरकारच्या परवानगी शिवाय कारखाना सुरू केला तर सरकार एका दिवसाला ५ लाख रुपये दंड करणार आहे. त्यामुळे कारखानदारांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, सभासदांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत कारखाना आपण सुरूच करणार आहोत, असे पाटील म्हणाले. २०१५-१६ च्या गळीत हंगामाला शासनाने त्वरित परवानगी द्यावी. याबाबत ठराव या वेळी मंजूर करण्यात आला. तसेच ऊस गाळपासाठी कारखान्याला पाणी उचलण्याची परवानगी शासनाने द्यावी, असा ठरावही मंजूर करण्यात आला. सभेस सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी प्रास्ताविक केले.