शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

ऊसशेतीला धरणाचे पाणी नाही?

By admin | Updated: September 21, 2015 03:50 IST

धरणातील पाणी ऊस पिकास देऊ नये, अशी जलतज्ज्ञांनी शिफारस केली आहे. त्यावर शासन गांभीर्याने विचार करीत असल्याने आगामी काळात उसाला

इंदापूर : धरणातील पाणी ऊस पिकास देऊ नये, अशी जलतज्ज्ञांनी शिफारस केली आहे. त्यावर शासन गांभीर्याने विचार करीत असल्याने आगामी काळात उसाला धरणातून पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याचे संकेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ही सभा झाली. साखर कारखान्यांच्या चालू गळीत हंगामासंदर्भात मंत्री समितीची बैठक अद्याप झाली नाही. बैठक झाल्याशिवाय कारखाना सुरू करता येत नाही. जर सरकारच्या परवानगी शिवाय कारखाना सुरू केला तर सरकार एका दिवसाला ५ लाख रुपये दंड करणार आहे. त्यामुळे कारखानदारांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, सभासदांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत कारखाना आपण सुरूच करणार आहोत, असे पाटील म्हणाले. २०१५-१६ च्या गळीत हंगामाला शासनाने त्वरित परवानगी द्यावी. याबाबत ठराव या वेळी मंजूर करण्यात आला. तसेच ऊस गाळपासाठी कारखान्याला पाणी उचलण्याची परवानगी शासनाने द्यावी, असा ठरावही मंजूर करण्यात आला. सभेस सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी प्रास्ताविक केले.