शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने ९ गावांमध्ये पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी गेल्या महिन्यात संपुष्टात आली. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर झाल्याने ९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी गेल्या महिन्यात संपुष्टात आली. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर झाल्याने ९ गावांमध्ये पेच निर्माण झाला आहे. आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्यच नसल्याने सरपंच कोण होणार, असा पेच निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी बहुमत असतानाही सरपंचपद हे विरोधी गटात जाणारे असल्याने तणावाचे वातावरण निर्माण होणार आहे. यामुळे काही गावांतील नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली असल्याने जिल्ह्यातील खेड, मुळशी, बारामती, शिरूर तालुक्यातील सरपंचपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यात जाहीर झाला होता. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्यात पार पडली होती. यावर्षी केवळ सदस्यांचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आले होते. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न केल्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले होते. तसेच, निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यास अनेक प्रश्न निर्माण होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. १८ जानेवारीला निकाल लागल्यावर फेब्रुवारीत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. मात्र, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या आरक्षणानुसार उमेदवारच निवडून आला नसल्याने सरपंच कोण होणार, याबाबत पेच निर्माण झाला होता. तर काही ठिकाणी आरक्षण स्त्री उमेदवाराचे, तर निवडून आलेला सदस्य हा पुरुष आहे. काही ठिकाणी उमेदवारच न मिळाल्याने ती जागा रिक्त राहिल्यानेही पेच निर्माण झाला. खेड तालुक्यातील भाेसे, नाणेकरवाडी, बिरदवडी, मेदनकरवाडी या चार गावांत, तर बारामती तालुक्यातील निंबूत या गावी, दौंड तालुक्यात पडवी, बिरोबाची वाडी या गावात आरक्षणानुसार उमेदवार नाही. भोर तालुक्यात उत्रोली, तर वेल्हे तालुक्यातील घोल ग्रामपंचायतीत आरक्षणानुसार उमेदवारच निवडणुकीला उभा राहिल्याने ही जागाही रिक्त राहिले. नेमके याच जागेसाठी सरपंचपद राखीव झाल्याने सरपंच कोण होणार, हा पेच निर्माण झाला आहे.

या गावांमध्ये पेच

बारामती तालुक्यातील निंबूत, खेड तालुक्यातील भाेसे, नाणेकरवाडी, बिरदवडी, मेदनकरवाडी, दौंड तालुक्यात पडवी, बिरोबाची वाडी, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, भोर तालुक्यातील उत्रोली तर वेल्हे तालुक्यातील घोल येथे आरक्षणानुसार सरपंच पदाचा उमेदवार नसल्याने पेच निर्माण झाला आहे.

पुढे काय होणार?

सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यावर पेच निर्माण झालेल्या गावांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने आरक्षण बदलने अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने हा पेच सुटण्याऐवजी कायम राहिला. परिणामी, बारामतीतील निंबूत, खेडमधील भाेसे आणि शिक्रापूर येथील ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

बहुमत नसतानाही लॉटरी

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीत बहुमत नसतानाही विरोधी पॅनेलला सरपंच पदाची लॉटरी लागणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात संघर्ष पाहायला मिळणार आहे.