शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य प्रवाहात आणणारे शिक्षण हवे

By admin | Updated: February 11, 2017 02:18 IST

शिक्षण आणि रोजगारात मुस्लिम समाज मागे आहे. तसेच केंद्रशासन, राज्यशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी योजना

शिक्षण आणि रोजगारात मुस्लिम समाज मागे आहे. तसेच केंद्रशासन, राज्यशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी योजना असल्या तरी नीट राबविल्या जात नाहीत आणि योग्य प्रकारे योजना आखल्याही जात नाहीत. भारतातील मुस्लिम समाजाचा शिक्षणाचा बॅकलॉग मोठा आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात १९८६ च्या शैक्षणिक धोरणात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास चाळीस वर्षांनी मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा विषय सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर आला. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर असंघटित क्षेत्रात काम करतो. तसेच पिढीजात व्यवसाय करतो. मात्र शिक्षणाचे महत्त्व पटलेले असूनही शिक्षणाचे आजचे स्वरूप गरीब समाजाला उपयोगी वाटत नाही. तसेच शिक्षणाचे स्वरूप लवचिकही नाही. मुस्लिम समाज रोजगारासाठी स्थलांतर करीत असतो आणि त्यातही मुलांची शाळा सुटत जाते. शिक्षणाचे वेगाने खासगीकरण होत चालले आहे, खासगी शाळेत शिक्षण घेणे गरिबांना परवडत नाही. त्यात सरकारी शाळांची गुणवत्ता घसरते आहे. त्यातच मुस्लिम समाजासाठी जे ५% (पाच टक्के) आरक्षण दिले होते तेही नाकारले आहे. मुस्लिम समाजामध्ये मुलींना शिक्षण देण्याबाबत जागृती दिसून येते. राष्ट्रीयस्तरावर मी केलेल्या एका अभ्यासात ८०% पालकांनी आम्ही मुलींना शिकवू इच्छितो, असे उत्तर दिले. मात्र, पुन्हा गरिबी, सामाजिक असुरक्षितता, शिक्षणाची गुणवत्ता या समस्या येतात. परिणामी उच्च शिक्षणात मुस्लिम मुले-मुली २-३% पर्यंतही पोहोचत नाहीत. मात्र मुस्लिम मुलींची संख्या उर्दू शाळांमध्ये जास्त दिसते. कारण धर्माशी जोडलेले शिक्षण मुलींना आणि आर्थिक रोजगाराशी जोडलेले शिक्षण मुलांना असे चित्र दिसते. आज बहुसंख्याकांच्या वस्त्यांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याकांना घरेही मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिम समाजासाठी सरकारने आखलेली धोरणे, योजना, कार्यक्रम हे त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही, शासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ किती टक्के लोकांना मिळतो याचे सर्वेक्षण केंद्र आणि राज्य सरकारांनी केले पाहिजे. गेल्या तीस वर्षांत मुस्लिम समाजासाठी राबवण्यात आलेल्या योजनांसाठी देण्यात आलेला निधी किती टक्के खर्च झाला आणि किती परत सरकारच्या तिजोरीत गेला, हेही पाहिले पाहिजे.