शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

‘तर माझा योगी आदित्यनाथ झाला असता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST

पुणे : उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याचा आयोजनानंतर कोरोना संसर्ग वाढल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ...

पुणे : उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याचा आयोजनानंतर कोरोना संसर्ग वाढल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “संंमेलनापेक्षा लोकांच्या जगण्याला प्राधान्य आहे. जर संंमेलन घेतले असते तर माझा ‘योगी आदित्यनाथ’ झाला असता.”

यंदाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. यासाठी २६ ते २८ मार्च हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र कोरोना साथीमुळे अजूनपर्यंत संमेलन होऊ शकलेले नाही. “संमेलनापेक्षा लोकांचा जीव अधिक प्रिय आहे. संमेलनाबाबत घाई करण्यात कोणताही अर्थ नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि सरकारच्या नियमावलीचे पालन करूनच संमेलनाचे आयोजन केले जाईल,” अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनाबद्दलची अनिश्चितता कायम आहे.

नाशिक संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. डॉ. नारळीकर यांच्या रूपाने वाचकप्रिय, ज्येष्ठ लेखक संमेलनाध्यक्ष लाभल्याने संमेलनाबद्दलची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अजून संकट संपलेले नाही. त्यामुळे संंमेलनाचा विषय काढणार देखील नाही. राज्य सरकारकडून परवानगी नसल्याने संमेलनाच्या आयोजनाचा विचार तूर्तास तरी केलेला नाही. महिनाभर कोरोनाबाबतचे चित्र काय आहे ते पाहावे लागेल.”

जानेवारीनंतर कोरोना निवळण्यास सुरुवात झाल्यानंतर संमेलनाच्या कामाला पुन्हा सुरूवात केली. मात्र पुन्हा कोरोना वाढण्यास सुरूवात झाली आणि लोकांच्या हितासाठी संंमेलन स्थगित करण्याची वेळ आली. संमेलनासाठी राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांचा निधीला मान्यता मिळालेली आहे. पण, संमेलनच झाले नाहीतर सरकार निधी का देईल? जेव्हा संंमेलन होईल तेव्हा पैसे मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.