शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

पुणे : देशभरातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत असल्याने लोकप्रिय ठरल्याचं सांगितले जात आहे, असे ...

पुणे : देशभरातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत असल्याने लोकप्रिय ठरल्याचं सांगितले जात आहे, असे असेल तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करावे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे़

कॉँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात सुरू केलेल्या राज्यव्यापी आंदोलनासाठी चव्हाण पुण्यात आले असताना, कॉँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड, गटनेते आबा बागूल, सोनाली मारणे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते़

चव्हाण म्हणाले, आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अकार्यक्षम आहेत याचा साक्षात्कार पंतप्रधान मोदी यांना झाला असून, कोरोना आपत्तीत व शिक्षण क्षेत्रात केंद्र सरकार हे कमी पडले याचा हा कबुलीजबाबच आहे़ परंतु, हे मंत्री अकार्यक्षम होते तर त्यांना मंत्रिपदावर का ठेवले यामुळे देशाचे किती नुकसान झाले याला जबाबदार कोण, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ दरम्यान, कुठल्याच केंद्रीय मंत्र्यांना कुठलाच अधिकार नसून सर्व निर्णय हे नरेंद्र मोदीच घेत असल्याचेही ते म्हणाले़

मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नावाखाली फेररचना करून, बारा मंत्र्यांचे राजीनामे घेणे म्हणजे त्यांचा अवमान करणेच होय़. केंद्रात यापूर्वीपासून सहकार विभाग कार्यरत असून, सहकार विभागाला स्वतंत्र सचिव होते. तर हा विभाग कृषी मंत्रालयाअंतर्गत येत होता. परंतु, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हे खाते देण्यासाठी सहकार हे स्वतंत्र मंत्रालय केले आहे़ केंद्र सरकारने असा निर्णय का घेतला यातून कोणाला काय मिळणार आहे लवकरच स्पष्ट होईल, असेही चव्हाण म्हणाले़

सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे केंद्र सरकारचे काम

कोरोना आपत्तीत सर्वसामान्यांना दिलासा न देता, केंद्र सरकार इंधन दरवाढीच्या रूपात नागरिकांच्या खिशातून जिझिया कर वसूल करत आहे. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात २३ टक्के, डिझेलच्या दरात २८ टक्के तर गॅस सिलिंडरच्या दरात ४१ टक्के वाढ केली. जानेवारी २१ पासून आजपर्यंत म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर ६६ वेळा वाढले आहेत. सरकार मात्र कंपन्यांना करसवलत देऊन सरकारी कंपन्या विक्रीस काढून जनतेला वेठीस धरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़