शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

पुणे : देशभरातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत असल्याने लोकप्रिय ठरल्याचं सांगितले जात आहे, असे ...

पुणे : देशभरातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत असल्याने लोकप्रिय ठरल्याचं सांगितले जात आहे, असे असेल तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करावे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे़

कॉँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात सुरू केलेल्या राज्यव्यापी आंदोलनासाठी चव्हाण पुण्यात आले असताना, कॉँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड, गटनेते आबा बागूल, सोनाली मारणे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते़

चव्हाण म्हणाले, आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अकार्यक्षम आहेत याचा साक्षात्कार पंतप्रधान मोदी यांना झाला असून, कोरोना आपत्तीत व शिक्षण क्षेत्रात केंद्र सरकार हे कमी पडले याचा हा कबुलीजबाबच आहे़ परंतु, हे मंत्री अकार्यक्षम होते तर त्यांना मंत्रिपदावर का ठेवले यामुळे देशाचे किती नुकसान झाले याला जबाबदार कोण, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ दरम्यान, कुठल्याच केंद्रीय मंत्र्यांना कुठलाच अधिकार नसून सर्व निर्णय हे नरेंद्र मोदीच घेत असल्याचेही ते म्हणाले़

मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नावाखाली फेररचना करून, बारा मंत्र्यांचे राजीनामे घेणे म्हणजे त्यांचा अवमान करणेच होय़. केंद्रात यापूर्वीपासून सहकार विभाग कार्यरत असून, सहकार विभागाला स्वतंत्र सचिव होते. तर हा विभाग कृषी मंत्रालयाअंतर्गत येत होता. परंतु, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हे खाते देण्यासाठी सहकार हे स्वतंत्र मंत्रालय केले आहे़ केंद्र सरकारने असा निर्णय का घेतला यातून कोणाला काय मिळणार आहे लवकरच स्पष्ट होईल, असेही चव्हाण म्हणाले़

सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे केंद्र सरकारचे काम

कोरोना आपत्तीत सर्वसामान्यांना दिलासा न देता, केंद्र सरकार इंधन दरवाढीच्या रूपात नागरिकांच्या खिशातून जिझिया कर वसूल करत आहे. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात २३ टक्के, डिझेलच्या दरात २८ टक्के तर गॅस सिलिंडरच्या दरात ४१ टक्के वाढ केली. जानेवारी २१ पासून आजपर्यंत म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर ६६ वेळा वाढले आहेत. सरकार मात्र कंपन्यांना करसवलत देऊन सरकारी कंपन्या विक्रीस काढून जनतेला वेठीस धरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़