शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

...तर धरणाचा वॉल तोडून पाणी सोडू

By admin | Updated: March 31, 2017 02:42 IST

खेड तालुक्यातील चासकमान धरणातील पाणी तालुक्यातील जनतेच्या हक्काचे आहे. ते तालुक्यातील जनतेला

दावडी : खेड तालुक्यातील चासकमान धरणातील पाणी तालुक्यातील जनतेच्या हक्काचे आहे. ते तालुक्यातील जनतेला टंचाईच्या काळात मिळालेच पाहिजे. जर दोन दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तर चासकमान धरणावर हजारो शेतकऱ्यांना नेऊन हाताने वॉल उघडून पाणी सोडले जाईल, असा इशारा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील टाकळकरवाडी, भांबुरवाडी, जऊळके, खरपुडी, निमगाव, दावडी, दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव या परिसरातुन पुढे शिरुर तालुक्यात जातो. पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असूनही चासकमान धरणातून पाणी सोडले जात नाही. त्या पार्श्वभूमीवर आज थेट राजगुरुनगर येथील चासकमान प्रकल्प विभाग ५च्या पाटबंधारे उपअभियांता यांच्या कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आला. या वेळी येथे अधिकारीवर्ग उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या भावनांची कदर करा अन्यथा त्यांच्या रोषाला सामोरे जा असे आक्रमक होत नाराजी व्यक्त केली.माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील पूर्व भागातील चिंचोशी, शेलपिंपळगाव, कोयाळी, काळूस, दावडी निमगाव, खरपुडी, होलेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ए. ए. कपोले यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांची बाजू मांडली. या वेळी त्यांनी दोन दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्री बापट यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. दोन दिवसांत निणर्य झाला नाही तर पाण्यासाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.दिलीप मोहिते पाटील म्हणाले, पाण्याअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळू लागली आहेत. अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. दोन दिवसांत यावर निर्णय झालाच पाहिजे. तसे न झाल्यास शेतकरी अधिकारीवर्गाला सोडणार नाहीत अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. सरकार आणि अधिकारीवर्ग खेड तालुक्यातील शेकऱ्यांबाबत दुजाभाव करीत आहे. खेड तालुक्यातील जिथपर्यंत कालवा आहे तिथपर्यंत पाणी सोडलेच पाहिजे. या वेळी जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, वैशाली गव्हाणे, कैलास सांडभोर, संतोष गव्हाणे, शिवाजी दरगुडे, भानुदास अमराळे, शंकर माळी, विजय गंगावणे, तुषार निकम, देवराम सातपुते, दत्ता ओंबाळे, शिवाजी दरगुडे, सीताराम गुजर, दत्ता लांडे आदी उपस्थित होते.‘पाणी आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेले माजी सैनिक व प्रगतिशील शेतकरी बाजीराव दौंडकर यांनी धरणातून पाणी सोडले नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करणार, असा इशारा दिला आहे.