शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

...तर धरणाचा वॉल तोडून पाणी सोडू

By admin | Updated: March 31, 2017 02:42 IST

खेड तालुक्यातील चासकमान धरणातील पाणी तालुक्यातील जनतेच्या हक्काचे आहे. ते तालुक्यातील जनतेला

दावडी : खेड तालुक्यातील चासकमान धरणातील पाणी तालुक्यातील जनतेच्या हक्काचे आहे. ते तालुक्यातील जनतेला टंचाईच्या काळात मिळालेच पाहिजे. जर दोन दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तर चासकमान धरणावर हजारो शेतकऱ्यांना नेऊन हाताने वॉल उघडून पाणी सोडले जाईल, असा इशारा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील टाकळकरवाडी, भांबुरवाडी, जऊळके, खरपुडी, निमगाव, दावडी, दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव या परिसरातुन पुढे शिरुर तालुक्यात जातो. पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असूनही चासकमान धरणातून पाणी सोडले जात नाही. त्या पार्श्वभूमीवर आज थेट राजगुरुनगर येथील चासकमान प्रकल्प विभाग ५च्या पाटबंधारे उपअभियांता यांच्या कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आला. या वेळी येथे अधिकारीवर्ग उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या भावनांची कदर करा अन्यथा त्यांच्या रोषाला सामोरे जा असे आक्रमक होत नाराजी व्यक्त केली.माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील पूर्व भागातील चिंचोशी, शेलपिंपळगाव, कोयाळी, काळूस, दावडी निमगाव, खरपुडी, होलेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ए. ए. कपोले यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांची बाजू मांडली. या वेळी त्यांनी दोन दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्री बापट यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. दोन दिवसांत निणर्य झाला नाही तर पाण्यासाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.दिलीप मोहिते पाटील म्हणाले, पाण्याअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळू लागली आहेत. अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. दोन दिवसांत यावर निर्णय झालाच पाहिजे. तसे न झाल्यास शेतकरी अधिकारीवर्गाला सोडणार नाहीत अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. सरकार आणि अधिकारीवर्ग खेड तालुक्यातील शेकऱ्यांबाबत दुजाभाव करीत आहे. खेड तालुक्यातील जिथपर्यंत कालवा आहे तिथपर्यंत पाणी सोडलेच पाहिजे. या वेळी जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, वैशाली गव्हाणे, कैलास सांडभोर, संतोष गव्हाणे, शिवाजी दरगुडे, भानुदास अमराळे, शंकर माळी, विजय गंगावणे, तुषार निकम, देवराम सातपुते, दत्ता ओंबाळे, शिवाजी दरगुडे, सीताराम गुजर, दत्ता लांडे आदी उपस्थित होते.‘पाणी आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेले माजी सैनिक व प्रगतिशील शेतकरी बाजीराव दौंडकर यांनी धरणातून पाणी सोडले नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करणार, असा इशारा दिला आहे.