शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

त्यांच्या नशिबी शिक्षणाचीही ‘छाटणी’

By admin | Updated: October 22, 2016 03:51 IST

नवीन शिक्षण हक्क कायदा लागू होऊन सहा वर्षे झाली. तरीही ऊसतोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. नवीन कायद्यानुसार या मुलांच्या शिक्षणाची

- महेश जगताप, सोमेश्वरनगरनवीन शिक्षण हक्क कायदा लागू होऊन सहा वर्षे झाली. तरीही ऊसतोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. नवीन कायद्यानुसार या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषद शाळांवर देण्यात आली होती. इच्छाशक्तीच्या अभावी शिक्षण विभाग या मुलांना शिक्षण देण्यात अपशयी ठरला आहे. या मुलांचा विचार करून शासनाने साखर शाळांना पुन्हा एकदा ऊर्जितावस्था देण्याची गरज आहे, अशी भावना या क्षेत्रातील सामाजिक संस्थांनी व्यक्त केली आहे. १ एप्रिल २०१० पासून नवीन शिक्षण हक्क कायद्यानुसार साखर कारखान्यांच्या व जनार्थ या संस्थेच्या साखर शाळा शासनाने बंद केल्या आणि ही जबाबदारी शासनाने स्वत:वर घेतली. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे, ही शासनाची जबाबदारी असतानाही गेल्या सहा वर्षांपासून ही जबाबदारी पेलण्यात शासन अपयशी ठरले आहे. येणाऱ्या हंगामातही ऊसतोड कामागरांची मुले शिक्षणापासून वंचितच राहणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील १५ ते १६ साखर कारखान्यांवरील ऊसतोडणी कामगारांची हजारो मुले शाळेतच जात नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जनार्थ या संस्थेच्या अनेक साखरशाळा या राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांवर सुरू होत्या. त्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जात होते. तसेच राज्यातील बरेच कारखाने स्वत:च साखर शाळा चालवित होते. परंतु, १ एप्रिल २०१० पासून केंद्र शासनाने जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा लागू केला. या मुलांना हे मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासनावर असताना गेल्या सहा वर्षांत या कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने परिणामी ऊसतोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. साधारणता दिवाळीनंतर ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर दाखल होतात. १ एप्रिल २०१० पासून लागू झालेल्या नवीन शिक्षण हक्क कायद्यानुसार ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर सोपविली. मात्र या शाळांकडून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. त्यासाठी स्वतंत्र इमारती उभरण्यात आल्या नाहीत. त्यांना कोणत्याही भौतिक सुविधा देण्यात आल्या नाहीत. वास्तविक त्यांना स्वतंत्र खोलीत शिक्षण देण्याची गरज आहे. मात्र जी काही थोडाफार मुले शाळेत जातात त्यांना स्थानिक मुलांमध्येच बसविण्यात येते; त्यामुळे त्यांची कु चंबना होते. परिणामी शाळेतून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची उपस्थिती घटू लागली. जनार्थ शाळेने या मुलांसाठी गंजलेल्या पत्र्याच्या खोलीत का होईना लॅपटॉप, ग्रंथालय अशा सुविधा पुरविल्यामुळे ऊसतोडणी कामगारांची मुले या पत्र्याच्या खोलीत आपले भविष्य गिरवताना दिसत होती. मात्र शासन या सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे. आज जनार्थ साखर शाळा बंद होऊन सहा वर्षे उलटली. मात्र ऊसतोडणी कामागरांची मुले ऊसाच्या फडातच रमताना दिसत आहेत. यासंदर्भात जनार्थ संस्थेचे कार्यकारी संचालक प्रवीण महाजन यांनी सांगितली, की ऊसतोडणी कामागरांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. मात्र शासन या जबाबदारी पासून लांब पळत आहे. त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. राज्यात ८९ हजार प्राथमिक शाळा आहेत. यातील स्थलांतरीत होणाऱ्या मुलांसाठी केवळ एक टक्का जरी राखून ठेवला तरी ही मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनच काम करू शकते.कायदा बासनात..?एकही मुल शाळेबाहेर राहू नये, असा नवीन कायद्याचा दंडक आहे. तसे झाल्यास त्या परिसरातीलसंबंधित शाळेचा शिक्षण, संबंधित ग्रामपंचायत व शिक्षणविभाग यांना दोषी धरले जाणार आहे. मात्र गेल्या सहा वर्षांत वरील कोणावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा यामध्ये हस्तक्षेप करून साखर शाळांना ऊर्जितावस्था देण्यासाठी पुढे यायला हवे़छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी सांगितले, की पाच वर्षांपूर्वी सुरू असलेल्या साखर शाळांना कारखाने जागा, पत्र्याच्या खोल्या, वीज, पाणी अशा प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवित होते. आताही कोणत्याही सामाजिक संस्थेने साखर शाळा सुरू केल्या तर आमचे अशाच प्रकारचे सहकार्य राहणार आहे.