शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

राजगुरुनगर येथील क्रीडा संकुल परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:13 IST

राजगुरुनगर : शहर परिसरात पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा फायदा चोरटे घेऊ लागले असून तिन्हेवाडी रोड क्रीडा संकुल परिसरात ...

राजगुरुनगर : शहर परिसरात पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा फायदा चोरटे घेऊ लागले असून तिन्हेवाडी रोड क्रीडा संकुल परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच या परिसरात तळीरामांचा वावर वाढला असून यांचा त्रास नागरिकांना होत आहे. चोरीच्या घटना थोड्याफार प्रमाणात घडत असल्या तरी मात्र या घटनांची जास्त वाच्यता होत नसल्याने अशा भुरट्या चोरांचे फावत चालले आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तिन्हेवाडी रोड येथील क्रीडा संकुल नेहमी गजबजले असते. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ तरुण, तरुणी, नागरिक, वयोवृद्ध फिरण्यासाठी येतात. मात्र भुरटे चोरटे नागरिकांच्या हातातील मोबाईल, तसेच जे मिळेल ते हिसकावून नेत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी क्रीडा संकुल व कॅनॉलच्या पट्टीवर एक नागरिक फिरण्यास गेला होता. सव्वासातच्या सुमारास अंधार असल्यामुळे त्यांनी मोबाईलची बॅटरी लावून चालत होते. दरम्यान समोरून टू व्हिलरवर तीन जण येऊन त्यातील मागे बसलेल्याने हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी क्रीडा संकुल रस्त्यावरील पुलावर रात्री दहाचे सुमारास एका तरुणास चाकूचा धाक दाखवून सर्व ऎवज काढून देण्यास धमकावले. मात्र तेवढ्यात तिन्हेवाडीकडे जाणारे एक चारचाकी वाहन आल्यामुळे सदरची चोरी टळली, अशा किरकोळ चोरीच्या घटना थोड्याफार प्रमाणात घडलेल्या आहेत. मात्र या घटनांची जास्त वाच्यता होत नाही. चोरट्यांना पळण्यासाठी या रस्त्याने अनेक मार्ग उपलब्ध असल्याने चोरटे त्याचा फायदा उठवितात. अशा भुरट्या चोरांचे फावत चालले आहे. कॅनॉल पट्टीवर व शेतांमध्ये संध्याकाळी सात वाजल्यानंतर दारू पिणाऱ्यांची गर्दी असते. तळीराम दारू पिऊन ग्लास, बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या रस्त्यावर किंवा शेतात टाकतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

संध्याकाळी सातनंतर कॅनॉलच्या रस्त्यावर किंवा शेतात तरुण मुले व मुली चाळे करताना आढळतात. सातकरस्थळ रस्त्याने कॅनॉलकडे गेल्यावर कॅनॉलचा कॉर्नर ते डाक बंगला थिगळस्थळ वस्तीजवळील पुलापर्यंत संध्याकाळी सातनंतर चोरटे, दारूडे व तरुण मुले व मुली यांचा जास्त वावर असतो. यांच्यावर काही वचक बसला नाही तर काही दिवसातच अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी राजेंद्र थिगळे, बी. टी. थिगळे व मोहिंदर थिगळे यांनी केली आहे. शहराची वाढ चौफेर होऊ लागली असली तरी त्या प्रमाणात पोलिसांच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना शर्त करावी लागत आहे. पोलिसांकडून रात्रीची गस्त नेहमीच्या ठरावीक मार्गाने घातली जात असल्याने ही गस्त फारशी परिणामकारक ठरत नाही.