शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर येथील क्रीडा संकुल परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:13 IST

राजगुरुनगर : शहर परिसरात पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा फायदा चोरटे घेऊ लागले असून तिन्हेवाडी रोड क्रीडा संकुल परिसरात ...

राजगुरुनगर : शहर परिसरात पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा फायदा चोरटे घेऊ लागले असून तिन्हेवाडी रोड क्रीडा संकुल परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच या परिसरात तळीरामांचा वावर वाढला असून यांचा त्रास नागरिकांना होत आहे. चोरीच्या घटना थोड्याफार प्रमाणात घडत असल्या तरी मात्र या घटनांची जास्त वाच्यता होत नसल्याने अशा भुरट्या चोरांचे फावत चालले आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तिन्हेवाडी रोड येथील क्रीडा संकुल नेहमी गजबजले असते. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ तरुण, तरुणी, नागरिक, वयोवृद्ध फिरण्यासाठी येतात. मात्र भुरटे चोरटे नागरिकांच्या हातातील मोबाईल, तसेच जे मिळेल ते हिसकावून नेत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी क्रीडा संकुल व कॅनॉलच्या पट्टीवर एक नागरिक फिरण्यास गेला होता. सव्वासातच्या सुमारास अंधार असल्यामुळे त्यांनी मोबाईलची बॅटरी लावून चालत होते. दरम्यान समोरून टू व्हिलरवर तीन जण येऊन त्यातील मागे बसलेल्याने हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी क्रीडा संकुल रस्त्यावरील पुलावर रात्री दहाचे सुमारास एका तरुणास चाकूचा धाक दाखवून सर्व ऎवज काढून देण्यास धमकावले. मात्र तेवढ्यात तिन्हेवाडीकडे जाणारे एक चारचाकी वाहन आल्यामुळे सदरची चोरी टळली, अशा किरकोळ चोरीच्या घटना थोड्याफार प्रमाणात घडलेल्या आहेत. मात्र या घटनांची जास्त वाच्यता होत नाही. चोरट्यांना पळण्यासाठी या रस्त्याने अनेक मार्ग उपलब्ध असल्याने चोरटे त्याचा फायदा उठवितात. अशा भुरट्या चोरांचे फावत चालले आहे. कॅनॉल पट्टीवर व शेतांमध्ये संध्याकाळी सात वाजल्यानंतर दारू पिणाऱ्यांची गर्दी असते. तळीराम दारू पिऊन ग्लास, बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या रस्त्यावर किंवा शेतात टाकतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

संध्याकाळी सातनंतर कॅनॉलच्या रस्त्यावर किंवा शेतात तरुण मुले व मुली चाळे करताना आढळतात. सातकरस्थळ रस्त्याने कॅनॉलकडे गेल्यावर कॅनॉलचा कॉर्नर ते डाक बंगला थिगळस्थळ वस्तीजवळील पुलापर्यंत संध्याकाळी सातनंतर चोरटे, दारूडे व तरुण मुले व मुली यांचा जास्त वावर असतो. यांच्यावर काही वचक बसला नाही तर काही दिवसातच अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी राजेंद्र थिगळे, बी. टी. थिगळे व मोहिंदर थिगळे यांनी केली आहे. शहराची वाढ चौफेर होऊ लागली असली तरी त्या प्रमाणात पोलिसांच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना शर्त करावी लागत आहे. पोलिसांकडून रात्रीची गस्त नेहमीच्या ठरावीक मार्गाने घातली जात असल्याने ही गस्त फारशी परिणामकारक ठरत नाही.