शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

पोलीस पाटील पद दाखवले अंशकालीन, तलाठी झालेल्या उमेदवारांवर कारवाईची शक्यता

By नितीन चौधरी | Updated: February 3, 2024 15:28 IST

येत्या सोमवारपासून राज्यभरात होणाऱ्या या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीत हे उमेदवार बाद ठरणार असल्याने, तसे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांची आता धावाधाव सुरू आहे...

पुणे : पोलिस पाटील या नियमित शासकीय सेवेत असतानाही तलाठी भरती परीक्षेचा अर्ज भरताना अंशकालीन संवर्ग असे नमूद केलेल्या उमेदवारांची निकाल लागल्यानंतर निवड झाली आहे. हे पद अंशकालीन नसल्याने या उमेदवारांनी राज्य सरकारची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. येत्या सोमवारपासून राज्यभरात होणाऱ्या या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीत हे उमेदवार बाद ठरणार असल्याने, तसे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांची आता धावाधाव सुरू आहे. त्यामुळे अशा उमेदवारांवर कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात तलाठी संवर्गातील ४ हजार ६४४ पदे भरण्यासाठी जून २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित मागणी पत्रानुसार पदांची संख्या ४ हजार ७९३ इतकी करण्यात आली. या परीक्षेला राज्यातून १० लाख ४१ हजार जणांनी अर्ज केले. त्यानंतर ८ लाख ६४ हजार ९६० जणांनी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ५७ सत्रांमधून ऑनलाईन परीक्षा दिली. पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. उर्वरित २३ जिल्ह्यांसाठी ६ जानेवारीला प्रथम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रवर्गनिहाय २३ जिल्ह्यांमधील २ हजार ५०१ पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी २३ जानेवारीला जाहीर करण्यात आली.

या निवड यादीतील काही उमेदवार सध्या पोलिस पाटील म्हणून कार्यरत आहेत. हे पद नियमित शासकीय सेवेत असून पाच वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. या पदाची निवड महसूल विभागाकडून रितसर परीक्षा घेऊन निवड केली जाते. त्यासाठी पोलिस विभागाकडून मानधनही दिले जाते. मात्र, अशा पोलिस पाटील असलेल्या व निवड झालेल्या अनेकांनी अर्ज भरताना अंशकालीन असल्याचे नमूद केले आहे. अंशकालीन सेवेत या संवर्गातून या उमेदवारांची निवड झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र आरक्षणही आहे. येत्या सोमवारपासून राज्यभरात निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. मात्र, हे पद अंशकालीन असल्याचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने या उमेदवारांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तालयात चकरा वाढविल्या आहेत.

मात्र, नियमित पद असताना त्याला अंशकालीन पद असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शासकीय सेवेत असताना संबंधित वरिष्ठांची लेखी परवानगी घेऊन अर्ज करावा लागतो. मात्र, या उमेदवारांनी अशी कोणतीही परवानगी न घेता अंशकालीन संवर्गाचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कागदपत्रे पडताळणीवेळी त्यांना असे प्रमाणपत्र सादर करता येणार नाही. परिणामी त्यांची तलाठी म्हणून नेमणूक करता येणार नसून शासकीय सेवेत असल्याची बाब लपवून लाभ लाटल्याने ही राज्य सरकारची फसवणूक आहे, असेही सुत्रांनी स्पष्ट केले आहे. सरकारची फसवणूक केल्याने पोलिस पाटील पदही धोक्यात येऊ शकते, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड