शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

क्लिष्ट प्रक्रियेने ‘रेरा’कडे बांधकाम व्यावसायिकांची पाठ

By admin | Updated: June 14, 2017 04:00 IST

केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने रियल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीची (रेरा) स्थापना केली आहे. परंतु यासाठी घातलेल्या प्रचंड क्लिष्ट अटीमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने रियल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीची (रेरा) स्थापना केली आहे. परंतु यासाठी घातलेल्या प्रचंड क्लिष्ट अटीमुळे बांधकाम व्यावसायिकांनी ‘रेरा’च्या नोंदणीकडे पाठ फिरवली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे विभागामध्ये आतापर्यंत बांधकाम व्यावसायिकांची केवळ २३ प्रकल्पांची नोंद केली आहे. तर नोंदणीमध्ये एजंट आघाडीवर असून आतापर्यंत १२४६ एजंट नोंदणीकृत झाले आहेत.बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी रेरा हा बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी कायदा करण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाने १ मे पासून त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी बांधकाम व्यावसायिकांना किंवा विकासकांना या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी सुरु होऊन एक महिना लोटला तरी अद्यापही ‘रेरा’ अंतर्गत नोंदणी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांचा अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळालेला नाही. रेरा अतंर्गत नोंदणी केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी स्वतंत्र नोंदणी करून बँकेत खाते उघडाले लागणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी अनेक कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असून, ही कागदपत्रे मिळविण्यासाठी किमान चार-पाच दिवस लागतात. या सर्व क्लिष्ट अटींमुळे सध्या तरी बांधकाम व्यावसायिकांना रेराकडे पाठ फिरवली आहे. आता पर्यंत विभागात १२४६ एजंडांनी रेरा अतंर्गत नोंदणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.एक महिना झाला तरी बिल्डरांकडून नोंदणीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जनजागृती करण्यासाठी पीएमआरडीएच्या वतीने नुकतीच स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात आली. पीएमआरडीएच्या वतीने १५ जूून पासून पाषाण येथील कार्यालयात ‘रेरा’ अतंर्गत नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात येत आहे. - किरण गित्ते, मुख्यकार्यकारी अधिकारी, पीएमआरडीएग्राहकांसोबत करार, खरेदी खत, ताबा कधी देणार, प्लॅन कसा असेल याची माहिती भरावी लागणार आहे. तसेच एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. चुकी माहिती भरली तर मोठ्या रक्कमेचे दंड केले जातील किंवा नोंदणी रद्द होईल.रेरा च्या नोंदणीच्या या क्लिष्ट प्रक्रियेमुळे उशीर होणे सहाजिक आहे. - शांतीलाल कटारिया, अध्यक्ष, महाराष्ट्र के्रडाई