शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

टीईटीचा पेपर फुटला?

By admin | Updated: December 15, 2014 01:54 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) दोन्ही पेपर फुटले असल्याची चर्चा रविवारी परीक्षार्थींमध्ये सुरू होती.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) दोन्ही पेपर फुटले असल्याची चर्चा रविवारी परीक्षार्थींमध्ये सुरू होती. परंतु, टीईटी परीक्षेचा एकही पेपर फुटलेला नाही, राज्यात सर्वत्र सुरळीपणे परीक्षा पार पडली, पेपर फुटला नसल्यामुळे टीईटी परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले आहे.राज्यातील ४ लाख १४ हजार ८१८ उमेदवार टीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. राज्यातील एकूण १ हजार ३६२ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यात ८४६ परीक्षा केंद्रांवर टीईटीचा पेपर एक आणि ५१६ परीक्षा केंद्रांवर टीईटी पेपर दोनची परीक्षा घेण्यात आली. पुण्यातील १४ हजार २०९ विद्यार्थ्यांनी पेपर एक तर १० हजार ३७६ विद्यार्थ्यांनी पेपर दोनच्या परीक्षेसाठी अर्ज केला होता. पेपर क्रमांक एक सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत तर पेपर क्रमांक दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आला. परंतु, बीड येथील एका विद्यार्थ्याकडे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका सापडली असल्याची अफवा उठली. तसेच गोंदिया जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्राची तपासणी करण्यास गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनाच एक विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले. या दोन्ही विद्यार्थ्यांकडे टीईटीची प्रश्नपत्रिका नव्हती तर त्यांनी अंदाजपंचे काही प्रश्नांची उत्तरे लिहून आणली होती. परंतु, या घटनांमुळे राज्यभर टीईटीचा पेपर फुटला अशी अफवा पसरली.राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व्ही.बी. पायमल म्हणाले, की राज्यात सर्वत्र शांततेत परीक्षा पार पडली. बीड येथे पेपर क्रमांक एकच्या पेपर दरम्यान एका विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली तर गोंदिया येथे पेपर क्रमांक दोनच्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना एक विद्यार्थी कागदावर उत्तरे पाहून लिहीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली. तसेच या विद्यार्थांना पुढील परीक्षेसाठी बसू द्यावे किंवा नाही याबाबतचा निर्णय परीक्षेच्या वरिष्ठ समितीमार्फत घेतला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे उत्तरपत्रिकेची डमीशीट मिळाली त्याची पडताळणी करून पाहिली असता ती मूळ प्रश्नपत्रिकेच्या उत्तरांशी जुळत नसल्याचे आढळून आले. परिणामी राज्यात कोठेही टीईटीची प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना समोर आलेली नाही. त्यामुळे परीक्षा पुन्हा नव्याने घेण्याचा प्रश्नच उरत नाही. (प्रतिनिधी)