शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

टाळेबंदीत प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:10 IST

पिंपरी : राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सरकार टाळेबंदीचा विचार करीत आहे. सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यास त्याला पाठिंबा असेल. ...

पिंपरी : राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सरकार टाळेबंदीचा विचार करीत आहे. सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यास त्याला पाठिंबा असेल. मात्र, सरकारने दोन कोटी कुटुंबाना प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावेत. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून कर्ज घ्यावे, अशी मागणी जनता दल सेक्युलरने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी सरकार किमान दोन ते तीन आठवड्यांची टाळेबंदी करण्याची शक्यता आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची वेळ आली आहे. त्यासाठी राज्य सरकार कठोर उपाययोजना करीत आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र टाळेबंदीची किंमत सामान्य माणसाला मोजावी लागते. त्यांचे रोजी रोटीचे साधन बंद होते. त्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येते. याचाही विचार राज्य सरकारने करणे आवश्यक आहे. राज्यातील दोन कोटी जनतेला दहा हजार रुपयांची थेट मदत दिल्यास त्यांना टाळेबंदी काळात मोठा दिलासा मिळेल. त्यासाठी वीस हजार कोटी रुपये लागतील. राज्य सरकारच्या तिजोरीवर त्यामुळे भार पडेल. मुंबई महापालिकेकडे ऐंशी हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यातील वीस हजार कोटी रुपये कर्जाऊ घेतल्यास निधीची अडचण सुटेल. त्यातून मुंबईतील वीस लाख आणि उर्वरित राज्यातील एक कोटी ऐंशी लाख कुटुंबांची मदत करता येईल, असे जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे, महासचिव न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष शरद पाटील आणि महासचिव प्रताप होगाडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.