शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

संत साहित्य पाठांतराचे नसून आचरणाचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

पुणे : जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा. तसेच संत साहित्य हे ...

पुणे : जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा. तसेच संत साहित्य हे पाठांतराचे नाही तर आचरणाचे शिक्षण आहे, असे मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने आयोजित भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेत ‘भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संत गौण का?’ या विषयावरील सत्रात. अभय टिळक बोलत होते. कार्यक्रमास कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्र.कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे ,डॉ. संजय उपाध्ये आदी उपस्थित होते.

डॉ. अभय टिळक म्हणाले, रोजच्या जीवनात संतांचे स्थान काय आहे, हे पाहणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्थेत संत साहित्यांचे प्रतिबिंबित होत नाही. रोजच्या जीवनात संतांचे विचार डोकावतात का? सर्वांनी हे पाहावे. तसेच समता, प्रेम, सामंजस्य व बंधुभाव हे ख-या अर्थाने मानवी जीवन आहे. हे मूल्यशिक्षण पद्धतीत पर्याय म्हणून ठेवले आहे.

डॉ. शशिकला वंजारी म्हणाल्या, संतांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची योग्य व्याख्या केली आहे. जीवनात याचा उपयोग कसा करावा हे शिकविले. पण काळाच्या ओघात हे सर्व विसरले आहे. सद्यस्थितीत मूल्य संवर्धनाची खूप गरज आहे. त्यासाठी संत साहित्याचा समावेश शिक्षणात प्रखरतेने करावे.

डॉ. श्रीनिवास वरखेडी म्हणाले, चैतन्य महाराज देगलूरकर,वैभव डांगे म्हणाले, डॉ. ज्ञानेश लिमये, यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक, महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. मृदुला कुलकर्णी यांनी आभार मानले.