शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

संत साहित्य पाठांतराचे नसून आचरणाचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

पुणे : जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा. तसेच संत साहित्य हे ...

पुणे : जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा. तसेच संत साहित्य हे पाठांतराचे नाही तर आचरणाचे शिक्षण आहे, असे मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने आयोजित भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेत ‘भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संत गौण का?’ या विषयावरील सत्रात. अभय टिळक बोलत होते. कार्यक्रमास कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्र.कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे ,डॉ. संजय उपाध्ये आदी उपस्थित होते.

डॉ. अभय टिळक म्हणाले, रोजच्या जीवनात संतांचे स्थान काय आहे, हे पाहणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्थेत संत साहित्यांचे प्रतिबिंबित होत नाही. रोजच्या जीवनात संतांचे विचार डोकावतात का? सर्वांनी हे पाहावे. तसेच समता, प्रेम, सामंजस्य व बंधुभाव हे ख-या अर्थाने मानवी जीवन आहे. हे मूल्यशिक्षण पद्धतीत पर्याय म्हणून ठेवले आहे.

डॉ. शशिकला वंजारी म्हणाल्या, संतांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची योग्य व्याख्या केली आहे. जीवनात याचा उपयोग कसा करावा हे शिकविले. पण काळाच्या ओघात हे सर्व विसरले आहे. सद्यस्थितीत मूल्य संवर्धनाची खूप गरज आहे. त्यासाठी संत साहित्याचा समावेश शिक्षणात प्रखरतेने करावे.

डॉ. श्रीनिवास वरखेडी म्हणाले, चैतन्य महाराज देगलूरकर,वैभव डांगे म्हणाले, डॉ. ज्ञानेश लिमये, यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक, महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. मृदुला कुलकर्णी यांनी आभार मानले.