शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

संत साहित्य पाठांतराचे नसून आचरणाचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

पुणे : जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा. तसेच संत साहित्य हे ...

पुणे : जीवनाची पायाभरणी शालेय शिक्षणातून होत असल्याने त्यात संत साहित्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा. तसेच संत साहित्य हे पाठांतराचे नाही तर आचरणाचे शिक्षण आहे, असे मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने आयोजित भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेत ‘भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संत गौण का?’ या विषयावरील सत्रात. अभय टिळक बोलत होते. कार्यक्रमास कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्र.कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे ,डॉ. संजय उपाध्ये आदी उपस्थित होते.

डॉ. अभय टिळक म्हणाले, रोजच्या जीवनात संतांचे स्थान काय आहे, हे पाहणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्थेत संत साहित्यांचे प्रतिबिंबित होत नाही. रोजच्या जीवनात संतांचे विचार डोकावतात का? सर्वांनी हे पाहावे. तसेच समता, प्रेम, सामंजस्य व बंधुभाव हे ख-या अर्थाने मानवी जीवन आहे. हे मूल्यशिक्षण पद्धतीत पर्याय म्हणून ठेवले आहे.

डॉ. शशिकला वंजारी म्हणाल्या, संतांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची योग्य व्याख्या केली आहे. जीवनात याचा उपयोग कसा करावा हे शिकविले. पण काळाच्या ओघात हे सर्व विसरले आहे. सद्यस्थितीत मूल्य संवर्धनाची खूप गरज आहे. त्यासाठी संत साहित्याचा समावेश शिक्षणात प्रखरतेने करावे.

डॉ. श्रीनिवास वरखेडी म्हणाले, चैतन्य महाराज देगलूरकर,वैभव डांगे म्हणाले, डॉ. ज्ञानेश लिमये, यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक, महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. मृदुला कुलकर्णी यांनी आभार मानले.