शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बंधुतेचा विचार रुजवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:26 IST

प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया : विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. डॉ. ...

प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया : विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेतील स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांतील बंधुतेचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवा. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महाराष्ट्र विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, संमेलनाध्यक्ष प्राचार्य प्रा. प्रदीप कदम, स्वागताध्यक्ष अनिल पाटील, कवी चंद्रकांत वानखेडे, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, माजी स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रकाश जवळकर, संयोजक महेंद्र भारती, प्रा. वैभव पताळे, प्रा. प्रशांत रोकडे, शंकर आथरे उपस्थित होते. याप्रसंगी ‘बंधुतेचे विस्तीर्ण क्षितिज्’ पुस्तकाचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

प्रकाश रोकडे म्हणाले, कोरोनाच्या साथीनंतर सगळी क्षेत्रे सुरू झाली. मात्र, अद्यापही ज्ञानमंदिरे बंद आहेत. शिक्षणसंस्था, शिक्षक आणि पालकांनी मनातील अनावश्यक भीती काढून टाकावी आणि संहिता पाळून शाळा सुरू करण्यात पुढाकार घ्यावा. शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान आत्मसात करत विद्यार्थ्यांना नव्या युगाचे शिक्षण देण्यावर आपण भर दिला पाहिजे.

अनिल पाटील यांनी प्रास्ताविक तर शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत रोकडे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. प्रा. अमोल कवडे यांनी आभार मानले.