शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बंधुतेचा विचार रुजवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:26 IST

प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया : विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. डॉ. ...

प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया : विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेतील स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांतील बंधुतेचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवा. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महाराष्ट्र विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, संमेलनाध्यक्ष प्राचार्य प्रा. प्रदीप कदम, स्वागताध्यक्ष अनिल पाटील, कवी चंद्रकांत वानखेडे, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, माजी स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रकाश जवळकर, संयोजक महेंद्र भारती, प्रा. वैभव पताळे, प्रा. प्रशांत रोकडे, शंकर आथरे उपस्थित होते. याप्रसंगी ‘बंधुतेचे विस्तीर्ण क्षितिज्’ पुस्तकाचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

प्रकाश रोकडे म्हणाले, कोरोनाच्या साथीनंतर सगळी क्षेत्रे सुरू झाली. मात्र, अद्यापही ज्ञानमंदिरे बंद आहेत. शिक्षणसंस्था, शिक्षक आणि पालकांनी मनातील अनावश्यक भीती काढून टाकावी आणि संहिता पाळून शाळा सुरू करण्यात पुढाकार घ्यावा. शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान आत्मसात करत विद्यार्थ्यांना नव्या युगाचे शिक्षण देण्यावर आपण भर दिला पाहिजे.

अनिल पाटील यांनी प्रास्ताविक तर शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत रोकडे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. प्रा. अमोल कवडे यांनी आभार मानले.