शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी!

By admin | Updated: May 26, 2016 03:36 IST

आयएसओ शाळा ही चळवळ पुढे त्याच गतीने चालू ठेवून गुणवत्तावाढीसाठी भविष्यात शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा मानस बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

पुणे : आयएसओ शाळा ही चळवळ पुढे त्याच गतीने चालू ठेवून गुणवत्तावाढीसाठी भविष्यात शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा मानस बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.देसाई यांनी पदभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचा पत्रकारांशी बोलत होते. देसाई म्हणाले, ‘‘आयएसओमुळे शाळांमध्ये बदल होत आहे. यात लोकसहभाग मिळत असल्याने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा बदलत असून, भौतिक सुधारणाही होत आहेत. गुणवत्तावाढ होत असून पटसंख्या वाढत आहे. यात शिक्षकांचे योगदान आहेच; मात्र आता जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा बघाण्याचा दृष्टिकोनही बदलत असून, त्यांच्या अपेक्षांना पुरेपूर उतरण्यासाठी सिस्टीममध्ये थोडा बदल आवश्यक आहे.’’ याचाच एक भाग म्हणून शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा विचार आहे. शिक्षक कामावर असूनही गैरहजर असतात, अशा तक्रारी येतात. यावर उपाय म्हणून ही पद्धत लागू करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे, ही हजेरी फक्त केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता सर्वांसाठी खुली करण्यात येणार आहे. वेबसाईटवर आपल्या शाळेतील शिक्षक आज शाळेवर होता की नाही, तो किती वेळ शाळेत होता, हे सर्वांनाच पाहता येईल. यातूनही शिक्षक मार्ग काढू शकतात; मात्र वारंवार दांडी मारणाऱ्या शिक्षकांच्या पगारावरही गदा येऊ शकते, याचाही प्लॅन करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)विद्यार्थिहित महत्त्वाचे1)सध्या शिक्षकांच्या समानीकरणावरून पेच सुरू आहे. समानीकरणाला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. याविषयी देसाई म्हणाले, ‘‘शेवटी विद्यार्थ्यांचे हित सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. काही तालुक्यांत रिक्त जागांचे प्रमाण खूप आहे. 2)एक किंवा दोन शिक्षकी शाळांमध्ये तेथील शिक्षक रजेवर गल्यावर शाळा बंद ठेवाव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे रिक्त जागांना प्राधान्य दिले जाणार आहे.’’ शिक्षक संघटनांनीही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. रोस्टरनंतर अनुशेष भरणार...सध्या रोस्टर तपासणी सुरू आहे. एका महिनाभरात रोस्टर पूर्र्ण होईल, अशी शक्यता आहे. त्यानंतर अनुशेष किती आहे, यावर भरती करण्याचे ठरविण्यात येईल. रुजू न होणाऱ्या शिक्षकांना नोटीसआपापसातील बदलीने इतर जिल्ह्यांतून आपल्याकडे आलेल्या, मात्र त्या जागेवर रुजू न झालेल्या शिक्षकांना नोटीस काढणार असून ते रुजू न झाल्यास परत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठवू, असे यापुढे धोरणच ठरविणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. गेल्या ६ महिन्यांत इतर जिल्ह्यांतून आपल्याकडे आपापसातील बदलीतून आलेल्या शिक्षकांपैैकी ३० शिक्षक अद्याप त्यांच्या जागेवर रुजू झाले नाहीत. हे शिक्षक सुरुवातीला अटी व नियम मान्य करून सोयीने येतात. नंतर पुन्हा आपल्या सोयीच्या जागेनुसार अंशत: बदलासाठी फिरत बसतात. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे अशा शिक्षकांबाबत धोरण म्हणून निर्णय घेतला जाणार असून जे त्यांना मिळालेल्या जागेवर रुजू होणार नाहीत, त्यांना आम्ही सेवेत दाखल करूनच घेणार नाही.