शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांचा पेच आणखी वाढला

By admin | Updated: May 24, 2016 05:49 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वर्षी समानीकरणाच्या नियमानुसार बदल्या करण्याचा घेतलेला निर्णय बदलण्यासाठी शिक्षक संघटनांनी सोमवारी दबावतंत्राचा वापर केला.

पुणे : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वर्षी समानीकरणाच्या नियमानुसार बदल्या करण्याचा घेतलेला निर्णय बदलण्यासाठी शिक्षक संघटनांनी सोमवारी दबावतंत्राचा वापर केला. मात्र भोर, वेल्हे, मुळशीतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बदल्या समानीकरणानुसारच झाल्या पाहिजेत, अशी मागणी केल्याने बदल्यांतील पेच वाढला आहे.समानीकरणामुळे ज्या तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त आहेत, त्यांना शिक्षक मिळणार आहेत. मात्र, जेथे शिक्षक जास्त आहेत, तेथील शिक्षकांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागेल. या बदली प्रक्रियेला विरोध करण्यासाठी सोमवारी सर्वच शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष व शिक्षण सभापती शुक्राचार्य वांजळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह बैैठक घेतली. या बैठकीत बिंदुनामावली पूर्ण झाल्यानंतर जे शिक्षक भरले जाणार आहेत, ते शिक्षक रिक्त पदे असलेल्या तालुक्यात द्या. आता समानीकरण करू नका. सध्या ज्या तालुक्यात शिक्षणव्यवस्था सुरळीत आहे ती विस्कळीत करू नका, अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘फक्त तुमचा फायदा पाहू नका; विद्यार्थ्यांचाही विचार करा,’ असे आवाहन केले. मात्र, संघटनांनी आपली मागणी कायम ठेवली. शासनाच्या आदेशाचा अभ्यास करून उद्या निर्णय घेऊ, असे अश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी त्यांना दिले. एकीकडे संघटनांनी समानीकरण करून नये, असा दबाव सुरू असल्याचे कळताच भोर, वेल्हे, मुळशीतील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बदल्या समानीकरणानुसारच करून भोर, वेल्हे, मुळशीला जादा शिक्षक मिळाले पाहिजेत, अशी मागणी अध्यक्ष व उपाध्यक्षांकडे केली. यात राष्ट्रवादीचे गटनेते शांताराम इंगवले, भोर पंचायत समिती सभापती रणजित शिवतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, बाबा धुमाळ, वेल्हे तालुका शिवसेनाप्रमुख दत्तात्रय देशमाने यांनी निवेदन देऊन मागणी केली. त्यामुळे समानीकरण बदलीचा पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)या वर्षी जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या गळती कमी होऊन ती फक्त २३०वर आली आहे. शाळांमधील गुणवत्ता वाढत आहे, ती केवळ शिक्षकांमुळेच. समानीकरणामुळे इतर तालुक्यांतील शिक्षकांची गैरसोय होणार असली, तरी दुर्गम भागातीलही शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाचा नीट अभ्यास करून निर्णय घेऊ, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केंद्रशाळांनुसार विचार व्हावासमानीकरणामुळे जरी भोर, वेल्हे, मुळशीला शिक्षक मिळणार आहेत. मात्र, तेथेही दुर्गम व शहरालगत असे दोन भाग आहेत. त्यामुळे तालुक्याला शिक्षक मिळाले तरी दुर्गम भागावर अन्याय होईल. त्यामुळे केंद्रशाळांनुसार रिक्त पदांचा विचार करून शिक्षक द्यावेत, अशी मागणी रणजित शिवतरे यांनी केली आहे. रिक्त पदे भरल्यानंतरच प्रशासकीय बदल्या करावेल्हे तालुक्यात ८१ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ३५० शिक्षकांपैकी १० टक्के प्रशासकीय बदल्या झाल्या, तर तालुक्यातून आणखी ३५ शिक्षक कमी होतील. त्यामुळे ११६ शिक्षकांची पदे रिक्त होतील. ५० टक्के शिक्षक तालुक्यात कमी होतील. त्यामुळे अगोदर रिक्त पदे भरल्यानंतर प्रशासकीय बदल्या करा, असे निवेदन शिवसेना वेल्हे तालुकाप्रमुख दत्तात्रय देशमाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अध्यक्ष-उपाध्यक्षांना दिले आहे.समानीकरण होऊ नये, अशी संघटनांची मागणी आहे. मात्र आम्ही शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहोत. आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. शिक्षक संघटनांशी आमची चर्चा सुरू असून, सर्वांचा विचार करून निर्णय घेऊ. - शुक्राचार्य वांजळे, उपाध्यक्ष, सभापती शिक्षण समिती.