शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

शिक्षक बदल्यांचा पेच आणखी वाढला

By admin | Updated: May 24, 2016 05:49 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वर्षी समानीकरणाच्या नियमानुसार बदल्या करण्याचा घेतलेला निर्णय बदलण्यासाठी शिक्षक संघटनांनी सोमवारी दबावतंत्राचा वापर केला.

पुणे : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वर्षी समानीकरणाच्या नियमानुसार बदल्या करण्याचा घेतलेला निर्णय बदलण्यासाठी शिक्षक संघटनांनी सोमवारी दबावतंत्राचा वापर केला. मात्र भोर, वेल्हे, मुळशीतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बदल्या समानीकरणानुसारच झाल्या पाहिजेत, अशी मागणी केल्याने बदल्यांतील पेच वाढला आहे.समानीकरणामुळे ज्या तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त आहेत, त्यांना शिक्षक मिळणार आहेत. मात्र, जेथे शिक्षक जास्त आहेत, तेथील शिक्षकांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागेल. या बदली प्रक्रियेला विरोध करण्यासाठी सोमवारी सर्वच शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष व शिक्षण सभापती शुक्राचार्य वांजळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह बैैठक घेतली. या बैठकीत बिंदुनामावली पूर्ण झाल्यानंतर जे शिक्षक भरले जाणार आहेत, ते शिक्षक रिक्त पदे असलेल्या तालुक्यात द्या. आता समानीकरण करू नका. सध्या ज्या तालुक्यात शिक्षणव्यवस्था सुरळीत आहे ती विस्कळीत करू नका, अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘फक्त तुमचा फायदा पाहू नका; विद्यार्थ्यांचाही विचार करा,’ असे आवाहन केले. मात्र, संघटनांनी आपली मागणी कायम ठेवली. शासनाच्या आदेशाचा अभ्यास करून उद्या निर्णय घेऊ, असे अश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी त्यांना दिले. एकीकडे संघटनांनी समानीकरण करून नये, असा दबाव सुरू असल्याचे कळताच भोर, वेल्हे, मुळशीतील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बदल्या समानीकरणानुसारच करून भोर, वेल्हे, मुळशीला जादा शिक्षक मिळाले पाहिजेत, अशी मागणी अध्यक्ष व उपाध्यक्षांकडे केली. यात राष्ट्रवादीचे गटनेते शांताराम इंगवले, भोर पंचायत समिती सभापती रणजित शिवतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, बाबा धुमाळ, वेल्हे तालुका शिवसेनाप्रमुख दत्तात्रय देशमाने यांनी निवेदन देऊन मागणी केली. त्यामुळे समानीकरण बदलीचा पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)या वर्षी जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या गळती कमी होऊन ती फक्त २३०वर आली आहे. शाळांमधील गुणवत्ता वाढत आहे, ती केवळ शिक्षकांमुळेच. समानीकरणामुळे इतर तालुक्यांतील शिक्षकांची गैरसोय होणार असली, तरी दुर्गम भागातीलही शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाचा नीट अभ्यास करून निर्णय घेऊ, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केंद्रशाळांनुसार विचार व्हावासमानीकरणामुळे जरी भोर, वेल्हे, मुळशीला शिक्षक मिळणार आहेत. मात्र, तेथेही दुर्गम व शहरालगत असे दोन भाग आहेत. त्यामुळे तालुक्याला शिक्षक मिळाले तरी दुर्गम भागावर अन्याय होईल. त्यामुळे केंद्रशाळांनुसार रिक्त पदांचा विचार करून शिक्षक द्यावेत, अशी मागणी रणजित शिवतरे यांनी केली आहे. रिक्त पदे भरल्यानंतरच प्रशासकीय बदल्या करावेल्हे तालुक्यात ८१ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ३५० शिक्षकांपैकी १० टक्के प्रशासकीय बदल्या झाल्या, तर तालुक्यातून आणखी ३५ शिक्षक कमी होतील. त्यामुळे ११६ शिक्षकांची पदे रिक्त होतील. ५० टक्के शिक्षक तालुक्यात कमी होतील. त्यामुळे अगोदर रिक्त पदे भरल्यानंतर प्रशासकीय बदल्या करा, असे निवेदन शिवसेना वेल्हे तालुकाप्रमुख दत्तात्रय देशमाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अध्यक्ष-उपाध्यक्षांना दिले आहे.समानीकरण होऊ नये, अशी संघटनांची मागणी आहे. मात्र आम्ही शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहोत. आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. शिक्षक संघटनांशी आमची चर्चा सुरू असून, सर्वांचा विचार करून निर्णय घेऊ. - शुक्राचार्य वांजळे, उपाध्यक्ष, सभापती शिक्षण समिती.