शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
2
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
3
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
4
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
5
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
6
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
7
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

तमाशा सम्राज्ञी विठाबार्इंच्या स्मारकाचे शासनाला विस्मरण!

By admin | Updated: January 15, 2015 00:01 IST

नारायणगाव येथे त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने केलेल्या स्मारकाच्या घोषणेला आज एक तप (१२ वर्षे) पूर्ण होत आहेत.

सचिन कांकरिया, नारायणगावजिवंतपणी अनेक हालअपेष्टा सहन करीत येणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड देत महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणा-या तमाशासाठी स्वत:ला झोकून देऊन स्वत:च्या आयुष्याचाच ‘तमाशा’करून घेणाऱ्या व अवघ्या महाराष्ट्राला आपल्या घुंगरांच्या तालावर डोलायला लावणा-या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची मरणोत्तरही उपेक्षाच होत आाहे. नारायणगाव येथे त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने केलेल्या स्मारकाच्या घोषणेला आज एक तप (१२ वर्षे) पूर्ण होत आहेत. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे.१५ जानेवारी २००२ मध्ये विठाबार्इंचा नारायणगावमध्ये निवासस्थानी मृत्यू झाला. एका लोककलेचा अस्त अशा शब्दांत अनेक मंत्र्यांनी व राजकारण्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. विठाबार्इंच्या स्मरणार्थ राज्य शासनाने १२ फेब्रुवारी २००६ ला नारायणगाव येथे पहिला तमाशा महोत्सव आयोजित केला होता़ या तमाशा महोत्सवात तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी विठाबाईंच्या स्मारकाबाबत जाहीर घोषणा केली होती; मात्र आजपर्यंत विठाबार्इंच्या स्मारकाबाबत राज्य शासनाने कोणतेही पाऊल न उचलल्याने या स्मारकाचे राज्य शासनाला विस्मरण झाले की काय....? असा प्रश्न तमाशा कलावंतांमधून व्यक्त केला जात आहे.१९३५ मध्ये विठाबार्इंचा जन्म पंढरपूर येथे झाला म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव ‘विठाई’ असे ठेवले़ तमाशामध्ये पदार्पण केल्यानंतर रसिकांनीच विठाईचे रूपांतर विठाबाई असे केले. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी खेळणाऱ्या कोवळ्या पायात ५ किलो वजनाचे घुंगरांचे चाळ बांधून तमाशासृष्टीत विठाबाईंनी पदार्पण केले़ आयुष्यात पहिल्यांदा विठाबाईंनी वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे रॉकेलचे टेंभे लावून झालेल्या तमाशात लावणी सादर करून रसिकांची मने जिंकली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने विठाबार्इंच्या तमाशामय आयुष्याला सुरुवात झाली.तमाशाची कला जोपासत असताना विठाबार्इंचे स्वत:चा संसार, मुलाबाळांकडे दुर्लक्ष झाले़ पर्यायाने कुटुंबाची वाताहात झाली़ मात्र, या लोककलेवर त्यांनी निष्णात प्रेम केले. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटांत काम करण्यासाठी स्वत:हून अनेक आॅफर दिल्या होत्या; मात्र तमाशावर मनापासून प्रेम करणाऱ्या विठाबाईंनी केवळ तमाशासाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचे नाकारले.समाजात घडणाऱ्या ताज्या घडामोडी त्यांनी तमाशाच्या मंचावरून अत्यंत प्रभावी व सहजपणे मांडून विविध विषयांद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले. १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान विठाबार्इंनी नेफा आघाडीवर जाऊन जवानांचे मनोरंजन केले होते. १९९० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते विठाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते.विठाबाईंचे स्मारक हे तमाशाक्षेत्रातील इतर कलावंतांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे़ मात्र, विठाबार्इंसारख्या एका महान कलावंताचं हे स्मारक १२ वर्षे पूर्ण होऊनही होत नसेल, तर आपल्यासारख्याची काय गत....? हा प्रश्न निश्चितच इतर कलावंतांना भेडसावणारा आहे.