शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गरिबी निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: February 13, 2017 02:03 IST

भारतात गरिबीची समस्या मोठ्या प्रमाणावर असून, समाजात अनेक दुर्लक्षित घटक आहेत. त्यांच्यापर्यंत मूलभूत हक्कही अद्याप पोहोचले नाहीत.

पुणे : भारतात गरिबीची समस्या मोठ्या प्रमाणावर असून, समाजात अनेक दुर्लक्षित घटक आहेत. त्यांच्यापर्यंत मूलभूत हक्कही अद्याप पोहोचले नाहीत. तसेच शहरातील रस्त्यांवर भीक मागून जगणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे लाजिरवाणे चित्र बदलण्यासाठी आणि गरिबी हटविण्यासाठी लायन्ससारख्या समाजसेवी संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यास समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी हे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. तसेच लायन्स क्लब्सने केलेल्या विविध कार्याचे कौतुक केले.लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त लायन्स क्लब्सच्या माध्यमातून सलग ५० व २५ वर्षे सेवा करणाऱ्या लायन्स सदस्यांना प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते रविवारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना लायन्स शताब्दी पुरस्कार देण्यात आला. त्यात ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश देसाई, डॉ. मधुसूदन झंवर, नितीन देसाई, डॉ. अभय मुथा, स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. अभय सदरे यांचा समावेश होता. या वेळी उद्योजक अरुण फिरोदिया, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रवीण छाजेड, माजी प्रांतपाल श्रीकांत सोनी, दीपक शहा, फत्तेचंद रांका, द्वारका जालान, रेखा शेट्टी, उपप्रांतपाल गिरीश मालपाणी, श्याम खंडेलवाल आदी उपस्थित होते. प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, ‘‘समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी केवळ सरकारला दोष देणे योग्य नाही. प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपले शहर भिकारीमुक्त बनविण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. केवळ पैशांमुळे सर्व समस्या सुटू शकत नाहीत. पैसे असले, तरी प्रत्येक माणूस आनंदी नाही. गरीब माणसाला प्रेम आणि दयेची गरज आहे. परदेशी राहणाऱ्यांनी आपल्या मातृभूमीला आणि संस्कृतीला विसरू नये.’’अरुण फिरोदिया म्हणाले, ‘‘चीन, अमेरिकेसारख्या देशांमध्ये दीन-दुबळा माणूस दिसत नाही. भारतातच गरिबी का दिसते, याचा विचार करायला पाहिजे. दीन-दुबळ्या लोकांना सशक्त बनवायचे आपले ध्येय असले पाहिजे.’’आपल्या देशात अनेक प्रौढ मतिमंद लोक महत्त्वाच्या जागांवर बसले आहेत, अशी टीका करून अविनाश धर्माधिकारी म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीचा आधार घेऊन आपण जातिव्यवस्थेच्या शापातून मुक्त व्हायला पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समान संधी मिळावी.’’ कार्यक्रमात के. एच. संचेती, प्रवीण छाजेड आदींनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)