शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

गरिबी निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: February 13, 2017 02:03 IST

भारतात गरिबीची समस्या मोठ्या प्रमाणावर असून, समाजात अनेक दुर्लक्षित घटक आहेत. त्यांच्यापर्यंत मूलभूत हक्कही अद्याप पोहोचले नाहीत.

पुणे : भारतात गरिबीची समस्या मोठ्या प्रमाणावर असून, समाजात अनेक दुर्लक्षित घटक आहेत. त्यांच्यापर्यंत मूलभूत हक्कही अद्याप पोहोचले नाहीत. तसेच शहरातील रस्त्यांवर भीक मागून जगणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे लाजिरवाणे चित्र बदलण्यासाठी आणि गरिबी हटविण्यासाठी लायन्ससारख्या समाजसेवी संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यास समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी हे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. तसेच लायन्स क्लब्सने केलेल्या विविध कार्याचे कौतुक केले.लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त लायन्स क्लब्सच्या माध्यमातून सलग ५० व २५ वर्षे सेवा करणाऱ्या लायन्स सदस्यांना प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते रविवारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना लायन्स शताब्दी पुरस्कार देण्यात आला. त्यात ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश देसाई, डॉ. मधुसूदन झंवर, नितीन देसाई, डॉ. अभय मुथा, स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. अभय सदरे यांचा समावेश होता. या वेळी उद्योजक अरुण फिरोदिया, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रवीण छाजेड, माजी प्रांतपाल श्रीकांत सोनी, दीपक शहा, फत्तेचंद रांका, द्वारका जालान, रेखा शेट्टी, उपप्रांतपाल गिरीश मालपाणी, श्याम खंडेलवाल आदी उपस्थित होते. प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, ‘‘समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी केवळ सरकारला दोष देणे योग्य नाही. प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपले शहर भिकारीमुक्त बनविण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. केवळ पैशांमुळे सर्व समस्या सुटू शकत नाहीत. पैसे असले, तरी प्रत्येक माणूस आनंदी नाही. गरीब माणसाला प्रेम आणि दयेची गरज आहे. परदेशी राहणाऱ्यांनी आपल्या मातृभूमीला आणि संस्कृतीला विसरू नये.’’अरुण फिरोदिया म्हणाले, ‘‘चीन, अमेरिकेसारख्या देशांमध्ये दीन-दुबळा माणूस दिसत नाही. भारतातच गरिबी का दिसते, याचा विचार करायला पाहिजे. दीन-दुबळ्या लोकांना सशक्त बनवायचे आपले ध्येय असले पाहिजे.’’आपल्या देशात अनेक प्रौढ मतिमंद लोक महत्त्वाच्या जागांवर बसले आहेत, अशी टीका करून अविनाश धर्माधिकारी म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीचा आधार घेऊन आपण जातिव्यवस्थेच्या शापातून मुक्त व्हायला पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समान संधी मिळावी.’’ कार्यक्रमात के. एच. संचेती, प्रवीण छाजेड आदींनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)