शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठिबकद्वारे घ्या भातपीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:48 IST

गुंजवणी धरणाच्या पाणीवाटपाबाबत सुधारित अहवाल समितीने नुकतात राज्य सरकारकडे सादर केला

लोकमत न्यूज नेटवर्कमार्गासनी : गुंजवणी धरणाच्या पाणीवाटपाबाबत सुधारित अहवाल समितीने नुकतात राज्य सरकारकडे सादर केला असून, यात भोर, वेल्हा तालुक्यांतील शेतक-यांची चेष्टा केली आहे. येथील मुख्य पीक भात असून त्यास सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुचविले आहे. भातपिकास सिंचनाद्वारे पाणी दिल्यास भातपिकेच राहणार नाहीत.यासह अनेक बाबतीत येथील शेतक-यांचा विचारच केला नसल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी याला आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी मुख्यामंत्र्यांसह संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणीवाटपाबाबत राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा धरणग्रस्त यांचा समावेश न करता अहवाल तयार करण्यात आला. हा सुधारित अहवाल समितीने राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र यात विसंगती असून प्रकल्पग्रस्त व लाभार्थी यांच्यावर अन्याय होत असल्याचे थोपटे यांचे म्हणणे आहे.पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, उपसभापती दिनकर सरपाले, काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, विष्णू राऊत, माजी सभापती रघुनाथ कथुरे, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, माजी उपसभापती डॉ. संभाजी मांगडे, दिलीप बाठे, दत्तात्रय दिघे, प्रकाश जेधे, राजाराम देवगिरीकर, बळीबा आधवडे, प्रभाकर आधवडे, शंकर जेधे आदींसह गुंजवणी प्रकल्पग्रस्त व शेतकरी उपस्थित होते.याबाबत तालुक्यातील शेतकºयांना विचारात घेतले नाही. तर मूळ अहवालात एकही उपसा सिंचन योजना प्रस्तावित नव्हती तर नवीन अहवालात नारायणपूर उपसा सिंचन योजना (दीडशे कोटी) प्रस्तावित आहे. भोर व वेल्हे तालुक्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी काय तरदूत केली आहे हे समजून येत नाही. वेल्हे तालुक्यातील उपसा सिंचनासाठी वांगणी, वाजेघर, रांजणे, खामगाव तर २० किलोमीटर उजवा कालवा, डावा कालवा याबाबत काहीही उल्लेख नाही. मूळ अहवालात पाण्याचे क्षेत्र भोरसाठी ७२८५ व वेल्ह्यासाठी ६८५ इतके होते, तर नवीन अहवालात भोरसाठी ९४३५ आणि वेल्ह्यासाठी ८५० क्षेत्र वाढविले आहे. क्षेत्र वाढूनही गावांची संख्या वाढली नाही.राजगड सहकारी साखर कारखाना निगडे येथे गुंजवणी पाणीवाटपाच्या सुधारित अहवालाबाबत माहिती देताना आमदार संग्राम थोपट व काँग्रेसचे पदाधिकारी.विद्युतनिर्मिती होणार नाही?मूळ प्रकल्प अहवालात धरणाजवळ २ मेगावॅट इतकी विद्युतनिर्मिती प्रस्तावित होती, परंतु नवीन अहवालात शासनाने तत्त्वत: मान्यता देताना धरणाजवळ विद्युत गृह उभारून त्यानंतर बंद पाईपलाईन करण्याचे नियोजित होते. त्यास दि. २१ एप्रिल २०१७ रोजी शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.प्रस्तावित नवीन अहवाल तयार करताना विद्युत गृहाचा कोठेही विचार केल्याचे दिसत नाही. त्यामुळे २ मेगावॅट विद्युतनिर्मिती होणार नाही. त्यामुळे शासनाचे दरवर्षी ३.२८ कोटी इतके उत्पन्न बंद होणार आहे.>भोर, वेल्हे तालुक्यात मूळ अहवालात भोर तालुक्यात २८ टक्के व वेल्हे ४० टक्के भातक्षेत्र होते. परंतु नवीन अहवालानुसार कमी करुन भोर व वेल्ह्यासाठी प्रत्येकी २५ टक्केच पाण्याचे क्षेत्र सुचविले आहेत. ठिबक सिंचनाद्वारे भातपिके घेणे म्हणजे शेतक-यांची चेष्टा केल्यासारखे दिसत आहे. गहू, हरभरा व ज्वारी पिके न घेण्याचे सुचविले आहे. म्हणजे येथील शेतकºयांनी केवळ भातपिकेच घ्यावीत व इतर कोणतीही पिके घेऊ नयेत असे अहवालात नमूद केले आहे.>देखभाल शेतक-यांना करावी लागणारपाटाद्वारे पाणी देण्याची तरतूद होती परंतु आता वितरण व्यवस्था बंद पाईपद्वारे व ठिबक सिंचनाद्वारे प्रस्तावित केली आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे याची देखभाल दुरुस्ती शेतक-यांना करावी लागणार आहे.