शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ठिबकद्वारे घ्या भातपीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:48 IST

गुंजवणी धरणाच्या पाणीवाटपाबाबत सुधारित अहवाल समितीने नुकतात राज्य सरकारकडे सादर केला

लोकमत न्यूज नेटवर्कमार्गासनी : गुंजवणी धरणाच्या पाणीवाटपाबाबत सुधारित अहवाल समितीने नुकतात राज्य सरकारकडे सादर केला असून, यात भोर, वेल्हा तालुक्यांतील शेतक-यांची चेष्टा केली आहे. येथील मुख्य पीक भात असून त्यास सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुचविले आहे. भातपिकास सिंचनाद्वारे पाणी दिल्यास भातपिकेच राहणार नाहीत.यासह अनेक बाबतीत येथील शेतक-यांचा विचारच केला नसल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी याला आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी मुख्यामंत्र्यांसह संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणीवाटपाबाबत राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा धरणग्रस्त यांचा समावेश न करता अहवाल तयार करण्यात आला. हा सुधारित अहवाल समितीने राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र यात विसंगती असून प्रकल्पग्रस्त व लाभार्थी यांच्यावर अन्याय होत असल्याचे थोपटे यांचे म्हणणे आहे.पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, उपसभापती दिनकर सरपाले, काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, विष्णू राऊत, माजी सभापती रघुनाथ कथुरे, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, माजी उपसभापती डॉ. संभाजी मांगडे, दिलीप बाठे, दत्तात्रय दिघे, प्रकाश जेधे, राजाराम देवगिरीकर, बळीबा आधवडे, प्रभाकर आधवडे, शंकर जेधे आदींसह गुंजवणी प्रकल्पग्रस्त व शेतकरी उपस्थित होते.याबाबत तालुक्यातील शेतकºयांना विचारात घेतले नाही. तर मूळ अहवालात एकही उपसा सिंचन योजना प्रस्तावित नव्हती तर नवीन अहवालात नारायणपूर उपसा सिंचन योजना (दीडशे कोटी) प्रस्तावित आहे. भोर व वेल्हे तालुक्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी काय तरदूत केली आहे हे समजून येत नाही. वेल्हे तालुक्यातील उपसा सिंचनासाठी वांगणी, वाजेघर, रांजणे, खामगाव तर २० किलोमीटर उजवा कालवा, डावा कालवा याबाबत काहीही उल्लेख नाही. मूळ अहवालात पाण्याचे क्षेत्र भोरसाठी ७२८५ व वेल्ह्यासाठी ६८५ इतके होते, तर नवीन अहवालात भोरसाठी ९४३५ आणि वेल्ह्यासाठी ८५० क्षेत्र वाढविले आहे. क्षेत्र वाढूनही गावांची संख्या वाढली नाही.राजगड सहकारी साखर कारखाना निगडे येथे गुंजवणी पाणीवाटपाच्या सुधारित अहवालाबाबत माहिती देताना आमदार संग्राम थोपट व काँग्रेसचे पदाधिकारी.विद्युतनिर्मिती होणार नाही?मूळ प्रकल्प अहवालात धरणाजवळ २ मेगावॅट इतकी विद्युतनिर्मिती प्रस्तावित होती, परंतु नवीन अहवालात शासनाने तत्त्वत: मान्यता देताना धरणाजवळ विद्युत गृह उभारून त्यानंतर बंद पाईपलाईन करण्याचे नियोजित होते. त्यास दि. २१ एप्रिल २०१७ रोजी शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.प्रस्तावित नवीन अहवाल तयार करताना विद्युत गृहाचा कोठेही विचार केल्याचे दिसत नाही. त्यामुळे २ मेगावॅट विद्युतनिर्मिती होणार नाही. त्यामुळे शासनाचे दरवर्षी ३.२८ कोटी इतके उत्पन्न बंद होणार आहे.>भोर, वेल्हे तालुक्यात मूळ अहवालात भोर तालुक्यात २८ टक्के व वेल्हे ४० टक्के भातक्षेत्र होते. परंतु नवीन अहवालानुसार कमी करुन भोर व वेल्ह्यासाठी प्रत्येकी २५ टक्केच पाण्याचे क्षेत्र सुचविले आहेत. ठिबक सिंचनाद्वारे भातपिके घेणे म्हणजे शेतक-यांची चेष्टा केल्यासारखे दिसत आहे. गहू, हरभरा व ज्वारी पिके न घेण्याचे सुचविले आहे. म्हणजे येथील शेतकºयांनी केवळ भातपिकेच घ्यावीत व इतर कोणतीही पिके घेऊ नयेत असे अहवालात नमूद केले आहे.>देखभाल शेतक-यांना करावी लागणारपाटाद्वारे पाणी देण्याची तरतूद होती परंतु आता वितरण व्यवस्था बंद पाईपद्वारे व ठिबक सिंचनाद्वारे प्रस्तावित केली आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे याची देखभाल दुरुस्ती शेतक-यांना करावी लागणार आहे.