शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा मागे घ्या

By admin | Updated: October 11, 2016 01:45 IST

शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच तसेच जि. प. शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह इतरांवर दाखल केलेला खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे

शिरूर : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच तसेच जि. प. शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह इतरांवर दाखल केलेला खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी तालुक्यातील मराठा बांधवांनी सोमवारी शहरात मूक मोर्चा काढला. राज्यातील मोर्चात मराठा बांधवांनी ज्या पद्धतीने शिस्तीचे व एकजुटीचे दर्शन घडविले, त्याच पद्धतीने आजच्या मोर्चातील चित्र दिसून आले.शिरसगाव काटा गावचे माजी सरपंच रामचंद्र केदारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक संदीप आढाव, माजी सरपंच भरत चव्हाण, धनश्री चव्हाण यांच्यासह सात जणांविरुद्ध सात आॅक्टोबरला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात केदारी व त्यांच्या कुटुंबीयांनी पालकसभेत प्रतिविद्यार्थी एका पालकाला प्रवेश असताना सभेच्या ठिकाणी प्रवेश केला. याबाबत मुख्याध्यापक आढाव समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना केदारी यांनी आढाव यांना अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली. मुख्याध्यापक अपंग तसेच राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक असल्याने त्यांचा अपमान करू नका, शिवीगाळ करू नका, असे सांगणाऱ्या चव्हाण यांच्या अंगावर केदारी धावून गेले व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने केदारी यांनी खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असे निवेदनात म्हटले आहे.मोर्चा तहसील कार्यालय येथे आल्यावर तेथे सभेत रूपांतर झाले. राज्यातील मोर्चाप्रमाणेच छोट्या व्यासपीठावर केवळ पाच मुलींनाच बोलण्याची संधी देण्यात आली. ऐश्वर्या रणदिवे, आदिती आढाव, ऋतुजा खोले, खोडदे, प्रेरणा बारवकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. तालुक्यातील विविध भागांतून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात शिक्षकवर्गही होता. इतर समाजाचे बांधवही मोर्चात सहभागी झाले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्यासह विविध पक्षांचे, संस्था, संघटनांचे पदाधिकारी आवर्जून मोर्चात सहभागी झाले. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, दौंड उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, शिरूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मराठा समाजाच्या वतीने युवतींच्या हस्ते तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन सुपूर्त करण्यात आले व मोर्चाची शांततेत सांगता करण्यात आली. (वार्ताहर)