शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

तक्रारवाडीला झिका संसर्गातील संवेदनशील गाव घोषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST

-------------- भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे झिका आजाराच्या संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केले असले तरी ग्रामपंचायत प्रशासन ...

--------------

भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे झिका आजाराच्या संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केले असले तरी ग्रामपंचायत प्रशासन मात्र यांबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नसल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून कोरोनाचे रुग्णवाढीबरोबरच इतर आजारांचे रुग्ण ही या गावात वाढत असल्याने यावर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे मागील तीन वर्षांपासून डेंग्यू आणि इतर डासांपासून होणाऱ्या आजार विषयी संवेदनशील गाव म्हणून प्रशासनाने जाहीर केलेले आहे. डेंग्यूच्या उद्रेकावेळी ‘लोकमत’ने बातमी प्रसारित केली असता तक्रारवाडीसारख्या छोट्या गावात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्य पथकासह भेट देत सर्व त्या उपाययोजना करून आजारावर नियंत्रण मिळविले होते.

आरोग्य प्रशासन प्रत्येक वेळी सर्वेक्षण करणे, जनजागृती करणे आणि रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे काम करीत असते त्याला ग्रामपंचायत प्रशासनाने मदत करणे गरजेचे असते मात्र सध्या तक्रारवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आरोग्य प्रशासनालाना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आरोग्य प्रशासन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण गावात डुकरांच्या सुळसुळाट, रस्त्यावर पाळीव जनावरांच्या गोठे यामुळे डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत तरी देखील ग्रामपंचायत पातळीवर जनजागृती केली जात नसल्याचेही आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे अनेक वेळा हवेतील बदलामुळे आजारी पडत असल्याचे समज करून खासगी दवाखान्यातून उपचार केले जात आहेत. वेळ निघून गेल्यावर निदान झाल्यास ते जीवावर बेतू शकते याची माहिती या गावाला आहे. कारण यातच गावातील होतकरू तरुणाचा जीव गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.

त्यामुळेच तक्रारवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने फवारणी, जनजागृती आणि इतर उपाययोजना करण्याची गरज असून ‘बैल गेला आणि झोपा केला’ या म्हणीप्रमाणे वेळ निघून गेल्यावर उपाययोजना करून काही साध्य होणार नसल्याचे वास्तव चित्र आहे.

याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावात तातडीने फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाच्या मदतीने जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. आम्ही सर्व पदाधिकारी या आजाराच्या दृष्टीने माहिती घेत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बरे न वाटल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करीत आहे.

--------