शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

तक्रारवाडीला झिका संसर्गातील संवेदनशील गाव घोषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST

-------------- भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे झिका आजाराच्या संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केले असले तरी ग्रामपंचायत प्रशासन ...

--------------

भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे झिका आजाराच्या संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केले असले तरी ग्रामपंचायत प्रशासन मात्र यांबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नसल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून कोरोनाचे रुग्णवाढीबरोबरच इतर आजारांचे रुग्ण ही या गावात वाढत असल्याने यावर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे मागील तीन वर्षांपासून डेंग्यू आणि इतर डासांपासून होणाऱ्या आजार विषयी संवेदनशील गाव म्हणून प्रशासनाने जाहीर केलेले आहे. डेंग्यूच्या उद्रेकावेळी ‘लोकमत’ने बातमी प्रसारित केली असता तक्रारवाडीसारख्या छोट्या गावात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्य पथकासह भेट देत सर्व त्या उपाययोजना करून आजारावर नियंत्रण मिळविले होते.

आरोग्य प्रशासन प्रत्येक वेळी सर्वेक्षण करणे, जनजागृती करणे आणि रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे काम करीत असते त्याला ग्रामपंचायत प्रशासनाने मदत करणे गरजेचे असते मात्र सध्या तक्रारवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आरोग्य प्रशासनालाना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आरोग्य प्रशासन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण गावात डुकरांच्या सुळसुळाट, रस्त्यावर पाळीव जनावरांच्या गोठे यामुळे डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत तरी देखील ग्रामपंचायत पातळीवर जनजागृती केली जात नसल्याचेही आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे अनेक वेळा हवेतील बदलामुळे आजारी पडत असल्याचे समज करून खासगी दवाखान्यातून उपचार केले जात आहेत. वेळ निघून गेल्यावर निदान झाल्यास ते जीवावर बेतू शकते याची माहिती या गावाला आहे. कारण यातच गावातील होतकरू तरुणाचा जीव गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.

त्यामुळेच तक्रारवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने फवारणी, जनजागृती आणि इतर उपाययोजना करण्याची गरज असून ‘बैल गेला आणि झोपा केला’ या म्हणीप्रमाणे वेळ निघून गेल्यावर उपाययोजना करून काही साध्य होणार नसल्याचे वास्तव चित्र आहे.

याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावात तातडीने फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाच्या मदतीने जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. आम्ही सर्व पदाधिकारी या आजाराच्या दृष्टीने माहिती घेत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बरे न वाटल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करीत आहे.

--------