शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारवाडीला झिका संसर्गातील संवेदनशील गाव घोषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST

-------------- भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे झिका आजाराच्या संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केले असले तरी ग्रामपंचायत प्रशासन ...

--------------

भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे झिका आजाराच्या संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केले असले तरी ग्रामपंचायत प्रशासन मात्र यांबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नसल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून कोरोनाचे रुग्णवाढीबरोबरच इतर आजारांचे रुग्ण ही या गावात वाढत असल्याने यावर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे मागील तीन वर्षांपासून डेंग्यू आणि इतर डासांपासून होणाऱ्या आजार विषयी संवेदनशील गाव म्हणून प्रशासनाने जाहीर केलेले आहे. डेंग्यूच्या उद्रेकावेळी ‘लोकमत’ने बातमी प्रसारित केली असता तक्रारवाडीसारख्या छोट्या गावात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्य पथकासह भेट देत सर्व त्या उपाययोजना करून आजारावर नियंत्रण मिळविले होते.

आरोग्य प्रशासन प्रत्येक वेळी सर्वेक्षण करणे, जनजागृती करणे आणि रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे काम करीत असते त्याला ग्रामपंचायत प्रशासनाने मदत करणे गरजेचे असते मात्र सध्या तक्रारवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आरोग्य प्रशासनालाना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आरोग्य प्रशासन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण गावात डुकरांच्या सुळसुळाट, रस्त्यावर पाळीव जनावरांच्या गोठे यामुळे डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत तरी देखील ग्रामपंचायत पातळीवर जनजागृती केली जात नसल्याचेही आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे अनेक वेळा हवेतील बदलामुळे आजारी पडत असल्याचे समज करून खासगी दवाखान्यातून उपचार केले जात आहेत. वेळ निघून गेल्यावर निदान झाल्यास ते जीवावर बेतू शकते याची माहिती या गावाला आहे. कारण यातच गावातील होतकरू तरुणाचा जीव गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.

त्यामुळेच तक्रारवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने फवारणी, जनजागृती आणि इतर उपाययोजना करण्याची गरज असून ‘बैल गेला आणि झोपा केला’ या म्हणीप्रमाणे वेळ निघून गेल्यावर उपाययोजना करून काही साध्य होणार नसल्याचे वास्तव चित्र आहे.

याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावात तातडीने फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाच्या मदतीने जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. आम्ही सर्व पदाधिकारी या आजाराच्या दृष्टीने माहिती घेत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बरे न वाटल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करीत आहे.

--------