शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

मानवतावादी हितासाठी स्वराज्याची निर्मिती

By admin | Updated: February 21, 2017 02:04 IST

छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची निर्मिती ही मानवतावादी हितासाठी केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन

सासवड : छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची निर्मिती ही मानवतावादी हितासाठी केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन, ज्यांच्याकडे जे कौशल्य आहे त्या व्यक्तीला मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे दिली. आग्रा येथून केलेली सुटका, अफझलखानाचा वध, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर अशा अनेक सरदारांनी व मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठीआपले प्राण अर्पण केले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी खऱ्या अर्थाने सोशल इंजिनियरिंग केले, असे मत शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नारायण टाक यांनी व्यक्त केले.छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त वाघिरे महाविद्यालय सासवड येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी साळवे होते. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. एस. कदम, डॉ. किरण रणदिवे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डी. एस. कदम यांनी केले. टाक यांचे छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि त्यांचे सोशल इंजिनियरिंग या विषयावर व्याख्यान झाले. छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांचे आर्थिक विचार, स्त्रियांविषयी असणारी भूमिका, पर्यावरण, बौद्धिक चातुर्य, व्यवस्थापन, पुरंदरचा इतिहास, स्वराज्य निर्मितीमागील भूमिका, स्वराज्यनिर्मिती ही अन्यायाविरुद्ध असणारा लढा होता इत्यादीविषयी सविस्तर विवेचन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. साळवे यांनी, आजच्या सामाजिक वातावरणात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य, त्यांचे शेती, व्यापार, लष्कर, आरमार संघटन इत्यादींविषयीचे विचार व कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या जीवनकार्याचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. किरण रणदिवे यांनी आभार मानले.