शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मानवतावादी हितासाठी स्वराज्याची निर्मिती

By admin | Updated: February 21, 2017 02:04 IST

छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची निर्मिती ही मानवतावादी हितासाठी केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन

सासवड : छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची निर्मिती ही मानवतावादी हितासाठी केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन, ज्यांच्याकडे जे कौशल्य आहे त्या व्यक्तीला मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे दिली. आग्रा येथून केलेली सुटका, अफझलखानाचा वध, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर अशा अनेक सरदारांनी व मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठीआपले प्राण अर्पण केले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी खऱ्या अर्थाने सोशल इंजिनियरिंग केले, असे मत शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नारायण टाक यांनी व्यक्त केले.छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त वाघिरे महाविद्यालय सासवड येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी साळवे होते. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. एस. कदम, डॉ. किरण रणदिवे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डी. एस. कदम यांनी केले. टाक यांचे छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि त्यांचे सोशल इंजिनियरिंग या विषयावर व्याख्यान झाले. छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांचे आर्थिक विचार, स्त्रियांविषयी असणारी भूमिका, पर्यावरण, बौद्धिक चातुर्य, व्यवस्थापन, पुरंदरचा इतिहास, स्वराज्य निर्मितीमागील भूमिका, स्वराज्यनिर्मिती ही अन्यायाविरुद्ध असणारा लढा होता इत्यादीविषयी सविस्तर विवेचन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. साळवे यांनी, आजच्या सामाजिक वातावरणात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य, त्यांचे शेती, व्यापार, लष्कर, आरमार संघटन इत्यादींविषयीचे विचार व कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या जीवनकार्याचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. किरण रणदिवे यांनी आभार मानले.