शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
5
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
6
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
7
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
8
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
9
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
10
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
11
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
12
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
13
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
14
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
15
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
16
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
17
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
18
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
19
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
20
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...

नाझरे जलाशयातून उन्हाळी हंगाम पाहिले आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST

प्रचंड ऊन आणि उन्हाळा सुरू झाल्याने या पट्ट्यातील शेती पिके पाण्याअभावी जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उसाची पिके ...

प्रचंड ऊन आणि उन्हाळा सुरू झाल्याने या पट्ट्यातील शेती पिके पाण्याअभावी जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उसाची पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत तर अनेक ऊस उत्पादकांना पाण्याअभावी उसाच्या उत्पन्नावरही परिणाम दिसू लागला आहे. पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने कडवळ आणि नगदी पिके ही धोक्यात आली आहेत. एकीकडे उन्हाळा, दुसरीकडे वीज महावितरणकडून सुरू झालेली वीजबिलांची सक्तीची वसुली यामुळे त्रस्त झालेले शेतकरी पाणी असूनही काहीच करू शकत नाहीत. धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे, नाझरेचे शेतकरी देविदास नाझीरकर, बारीकराव नाझीरकर, सदाशिव चिकणे, नितीन नाझीरकर, जवळार्जुनचे मामा गुळूमकर तसेच पट्ट्यातील शेतकऱ्यांनी नाझरे जलाशयाचे शाखाधिकारी अनिल घोडके यांची भेट घेतली. शेतकरी व नाझरे प्रकल्प यांच्यात समन्वय नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणजे ताबडतोब जलाशयातून शेती सिंचनासाठी आवर्तन सोडणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीनुसार आज पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे आवर्तन सोडण्यात आले.

नाझरे प्रकल्प हा या परिसरातील शेतीसिंचन आणि पाणीपुरवठा योजनांसाठी आहे. जलाशयातून येथील सर्वच पाणीपुरवठा योजनांना पाणी दिले जात आहे. मात्र शेतकऱ्यांची पिके जळू लागली तरी ही पाण्याचे नियोजन जलाशयाच्या प्रशासनाकडून झालेले नव्हते. जलाशयाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात समन्वय दिसत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शेतीला पाणीपुरवठा करावा. तसेच शेतकऱ्यांनी ही स्वतः प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाण्याची मागणी करावी, असे आवाहन टेकवडे यांनी यावेळी केले आहे.

जलाशयाच्या कालव्यातून ३० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले असून टेल टू हेड अशा पद्धतीने पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आल्याचे जलाशयाचे शाखाधिकारी अनिल घोडके यांनी सांगितले. सध्या जलाशयात ४०२ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७१ टक्के पाणीसाठा आहे. जलाशयावरील पिण्याच्या पाण्याच्या सर्वच्या सर्व योजनांना पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.

नाझरे जलाशयातून कालव्याद्वारे शेती सिंचनासाठी आवर्तन सोडताना माजी आ. अशोक टेकवडे, शाखा अभियंता अनिल घोडके, संदीप चिकणे व इतर.