शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

चासकमानचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटूनही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:10 IST

शिक्रापूर: चासकमानचे ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटले, तरी सुरूच आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील २० गावांचा पाण्याचा प्रश्न ...

शिक्रापूर: चासकमानचे ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटले, तरी सुरूच आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील २० गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेले आश्वासन हवेतच विरल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत असल्याने शेतकऱ्यांनी चासकमान पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. दरम्यान, या समितीच्या माध्यमातून हक्काचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. तसेच, आंदोलनाची तयारीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती समितीचे समन्वयक समाधान डोके यांनी दिली.

चासकमानच्या पाण्यावर शिरूर तालुक्यातील तब्बल ५० टक्के सिंचन अवलंबून आहे. यावर्षीचे पाटबंधारे विभागाने १० मार्चला ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन सुरू केले. ‘टेल टू हेड’ पध्दतीने हे आवर्तन शिरूरच्या २० गावांना २५ एप्रिलला देण्यात येईल असे पाटबंधारे विभागाने सांगितले होते. मात्र, तसे काहीच झाले नाही. ४५ दिवसाचे ५७ वा दिवस उजाडला, तरी या भागाला पाणी दिले गेले नाही. त्यामुळे बहुतांश भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळी पिके करपून चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतभेद विसरून काही मंडळी एकत्रित येत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चासकमान पाणी संघर्ष समितीची स्थापना केल्याची माहिती जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांनी दिली.

शिक्रापूरमध्ये या समितीची बैठक पार पडली यावेळी जातेगावचे उपसरपंच गणेश उमाप, गणेश मासळकर, बाळासाहेब चव्हाण, अविनाश देवकर, प्रवीण मासळकर, समीर मासळकर, महेश मासळकर, पांडुरंग ढोकले, नितीन दरेकर आदी शेतकरी उपस्थित होते. बैठकीत कालवा क्षमता नसताना अनिर्बंध पाणी पूर्व भागात देण्याचा सातत्याने होणारा हट्ट, ९२ ते १४४ किलोमीटरच्या पाण्याचे आवर्तन दिवस कधीच निश्चित केले जात नाही, आवर्तनाच्या बैठका, तारखा, वितरणाची पध्दती कधीच जाहीर केली जात नाही, सदोष कालवे-पाट असल्याने ४५ टक्के पाणी गळती असल्याचे खात्याला मान्य आहे. परंतु, त्यावर काहीही कार्यवाही केली जात नाही, हेड टू टेल की, टेल टू हेड ही पध्दती सोयीस्कर बदलली जाते, प्रकल्पासाठी पुनर्वसन व भूसंपादन शिक्रापूर परिसरात असताना या भागावरच सतत अन्याय, पाणीपुरवठा सोसायट्यांना २३ दिवसांच्या फरकाने पाणी देण्याच्या नियमाची थेट पायमल्ली,पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीत पूर्व भागाकडे थेट दुर्लक्ष, मेन पाटावरील अनेक पोटचाऱ्यांना रात्रीचे पाणी सर्रास दिले जाते, आवर्तन वेळेत नसल्याने पिकांच्या नुकसानभरपाईची जबाबदारी खात्याची आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, आता या प्रश्नाची सोडवणुकीसाठी न्यायालयाकडे दाद मागण्यावर एकमत झाले. त्याचबरोबर यासंदर्भात आंदोलनही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

१० शिक्रापूर

जातेगाव खुर्द (ता.शिरूर) येथील लक्ष्मण नरके यांनी पाणी आवर्तन वेळेत न आल्याने सोडून दिलेले दीड एकर वांग्याचे पीक.