शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

चासकमानचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटूनही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:10 IST

शिक्रापूर: चासकमानचे ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटले, तरी सुरूच आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील २० गावांचा पाण्याचा प्रश्न ...

शिक्रापूर: चासकमानचे ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटले, तरी सुरूच आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील २० गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेले आश्वासन हवेतच विरल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत असल्याने शेतकऱ्यांनी चासकमान पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. दरम्यान, या समितीच्या माध्यमातून हक्काचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. तसेच, आंदोलनाची तयारीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती समितीचे समन्वयक समाधान डोके यांनी दिली.

चासकमानच्या पाण्यावर शिरूर तालुक्यातील तब्बल ५० टक्के सिंचन अवलंबून आहे. यावर्षीचे पाटबंधारे विभागाने १० मार्चला ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन सुरू केले. ‘टेल टू हेड’ पध्दतीने हे आवर्तन शिरूरच्या २० गावांना २५ एप्रिलला देण्यात येईल असे पाटबंधारे विभागाने सांगितले होते. मात्र, तसे काहीच झाले नाही. ४५ दिवसाचे ५७ वा दिवस उजाडला, तरी या भागाला पाणी दिले गेले नाही. त्यामुळे बहुतांश भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळी पिके करपून चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतभेद विसरून काही मंडळी एकत्रित येत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चासकमान पाणी संघर्ष समितीची स्थापना केल्याची माहिती जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांनी दिली.

शिक्रापूरमध्ये या समितीची बैठक पार पडली यावेळी जातेगावचे उपसरपंच गणेश उमाप, गणेश मासळकर, बाळासाहेब चव्हाण, अविनाश देवकर, प्रवीण मासळकर, समीर मासळकर, महेश मासळकर, पांडुरंग ढोकले, नितीन दरेकर आदी शेतकरी उपस्थित होते. बैठकीत कालवा क्षमता नसताना अनिर्बंध पाणी पूर्व भागात देण्याचा सातत्याने होणारा हट्ट, ९२ ते १४४ किलोमीटरच्या पाण्याचे आवर्तन दिवस कधीच निश्चित केले जात नाही, आवर्तनाच्या बैठका, तारखा, वितरणाची पध्दती कधीच जाहीर केली जात नाही, सदोष कालवे-पाट असल्याने ४५ टक्के पाणी गळती असल्याचे खात्याला मान्य आहे. परंतु, त्यावर काहीही कार्यवाही केली जात नाही, हेड टू टेल की, टेल टू हेड ही पध्दती सोयीस्कर बदलली जाते, प्रकल्पासाठी पुनर्वसन व भूसंपादन शिक्रापूर परिसरात असताना या भागावरच सतत अन्याय, पाणीपुरवठा सोसायट्यांना २३ दिवसांच्या फरकाने पाणी देण्याच्या नियमाची थेट पायमल्ली,पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीत पूर्व भागाकडे थेट दुर्लक्ष, मेन पाटावरील अनेक पोटचाऱ्यांना रात्रीचे पाणी सर्रास दिले जाते, आवर्तन वेळेत नसल्याने पिकांच्या नुकसानभरपाईची जबाबदारी खात्याची आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, आता या प्रश्नाची सोडवणुकीसाठी न्यायालयाकडे दाद मागण्यावर एकमत झाले. त्याचबरोबर यासंदर्भात आंदोलनही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

१० शिक्रापूर

जातेगाव खुर्द (ता.शिरूर) येथील लक्ष्मण नरके यांनी पाणी आवर्तन वेळेत न आल्याने सोडून दिलेले दीड एकर वांग्याचे पीक.