शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

चासकमानचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटूनही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:10 IST

शिक्रापूर: चासकमानचे ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटले, तरी सुरूच आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील २० गावांचा पाण्याचा प्रश्न ...

शिक्रापूर: चासकमानचे ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन ५७ दिवस उलटले, तरी सुरूच आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील २० गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेले आश्वासन हवेतच विरल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत असल्याने शेतकऱ्यांनी चासकमान पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. दरम्यान, या समितीच्या माध्यमातून हक्काचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. तसेच, आंदोलनाची तयारीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती समितीचे समन्वयक समाधान डोके यांनी दिली.

चासकमानच्या पाण्यावर शिरूर तालुक्यातील तब्बल ५० टक्के सिंचन अवलंबून आहे. यावर्षीचे पाटबंधारे विभागाने १० मार्चला ४५ दिवसांचे उन्हाळी आवर्तन सुरू केले. ‘टेल टू हेड’ पध्दतीने हे आवर्तन शिरूरच्या २० गावांना २५ एप्रिलला देण्यात येईल असे पाटबंधारे विभागाने सांगितले होते. मात्र, तसे काहीच झाले नाही. ४५ दिवसाचे ५७ वा दिवस उजाडला, तरी या भागाला पाणी दिले गेले नाही. त्यामुळे बहुतांश भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळी पिके करपून चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतभेद विसरून काही मंडळी एकत्रित येत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चासकमान पाणी संघर्ष समितीची स्थापना केल्याची माहिती जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांनी दिली.

शिक्रापूरमध्ये या समितीची बैठक पार पडली यावेळी जातेगावचे उपसरपंच गणेश उमाप, गणेश मासळकर, बाळासाहेब चव्हाण, अविनाश देवकर, प्रवीण मासळकर, समीर मासळकर, महेश मासळकर, पांडुरंग ढोकले, नितीन दरेकर आदी शेतकरी उपस्थित होते. बैठकीत कालवा क्षमता नसताना अनिर्बंध पाणी पूर्व भागात देण्याचा सातत्याने होणारा हट्ट, ९२ ते १४४ किलोमीटरच्या पाण्याचे आवर्तन दिवस कधीच निश्चित केले जात नाही, आवर्तनाच्या बैठका, तारखा, वितरणाची पध्दती कधीच जाहीर केली जात नाही, सदोष कालवे-पाट असल्याने ४५ टक्के पाणी गळती असल्याचे खात्याला मान्य आहे. परंतु, त्यावर काहीही कार्यवाही केली जात नाही, हेड टू टेल की, टेल टू हेड ही पध्दती सोयीस्कर बदलली जाते, प्रकल्पासाठी पुनर्वसन व भूसंपादन शिक्रापूर परिसरात असताना या भागावरच सतत अन्याय, पाणीपुरवठा सोसायट्यांना २३ दिवसांच्या फरकाने पाणी देण्याच्या नियमाची थेट पायमल्ली,पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीत पूर्व भागाकडे थेट दुर्लक्ष, मेन पाटावरील अनेक पोटचाऱ्यांना रात्रीचे पाणी सर्रास दिले जाते, आवर्तन वेळेत नसल्याने पिकांच्या नुकसानभरपाईची जबाबदारी खात्याची आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, आता या प्रश्नाची सोडवणुकीसाठी न्यायालयाकडे दाद मागण्यावर एकमत झाले. त्याचबरोबर यासंदर्भात आंदोलनही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

१० शिक्रापूर

जातेगाव खुर्द (ता.शिरूर) येथील लक्ष्मण नरके यांनी पाणी आवर्तन वेळेत न आल्याने सोडून दिलेले दीड एकर वांग्याचे पीक.