शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी महिलांना सरकारी संवेदनशीलतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगार महिलांना सरकारी संवेदनशीलतेची गरज आहे. सर्वच सरकारी खात्यांनी आपल्या योजनांमध्ये या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगार महिलांना सरकारी संवेदनशीलतेची गरज आहे. सर्वच सरकारी खात्यांनी आपल्या योजनांमध्ये या महिलांचा समावेश कसा करता येईल यावर काम करावे, असे निर्देश विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांंनी दिले.

ऊसतोडणी महिलांच्या समस्यांवर चर्चा व उपाययोजना यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी या विशेष ऑनलाईन बैठकीचे सोमवारी दुपारी आयोजन केले होते.

सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, महिला व बालविकास विभागाच्या मुख्य सचिव आय. ए. कुंदन, सामाजिक न्याय आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, सहकार आयुक्त अनिल कवडे, बीडचे निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे, महिला व बालकल्याण उपायुक्त राहुल मोरे बैठकीला उपस्थित होते.

फक्त कामासाठी लाखांच्या संख्येने स्थलांतर करणाऱ्या कष्टकरी महिला हा एक मोठा समाज घटक आहे, असे स्पष्ट करून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आपण त्यांच्या समस्यांकडे फक्त सहानुभूतीने पाहून चालणार नाही. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांच्यातील गर्भाशय शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण, बालविवाह, कामाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, मासिक पाळीच्या काळातही काम करण्याची सक्ती, त्यामुळे होणारे गर्भपात, शस्त्रक्रियेनंतर होणारी आरोग्याची हेळसांड अशा अनेक गोष्टींनी या घटकाला ग्रासले आहे. त्याचे जीवन सुखकर होईल यादृष्टीने काम करण्याची गरज आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी ऊसतोडणी कामगार महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा विस्ताराने आढावा घेतला. काही अधिकाऱ्यांना सूचना देत काही योजनांबाबत बदलाचे निर्देशही दिले.

आयुक्तांनी दिली योजनांची माहिती

बालविकास उपायुक्त राहुल मोरे यांनी बालकल्याण समितीमार्फत होत असलेल्या कामाची माहिती दिली. साखर आयुक्त गायकवाड यांनी कारखानदारांना कामगारांसाठी आरोग्य सुविधा देणे बंधनकारक करण्यात आल्याचे सांगितले. डॉ. नारनवरे यांनी मुलांसाठीच्या वसतिगृह योजनेची माहिती दिली. बीड जिल्ह्यातून दरवर्षी १ लाख ३५ हजार कामगार स्थलांतरित होतात. त्या सर्वांची आरोग्य तपासणी होत असल्याची माहिती देण्यात आली. योजना कागदावर न ठेवता त्याचा लाभ होतो आहे की नाही, याविषयी दक्ष राहण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.