शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

ऊसतोडणी महिलांना सरकारी संवेदनशीलतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगार महिलांना सरकारी संवेदनशीलतेची गरज आहे. सर्वच सरकारी खात्यांनी आपल्या योजनांमध्ये या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगार महिलांना सरकारी संवेदनशीलतेची गरज आहे. सर्वच सरकारी खात्यांनी आपल्या योजनांमध्ये या महिलांचा समावेश कसा करता येईल यावर काम करावे, असे निर्देश विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांंनी दिले.

ऊसतोडणी महिलांच्या समस्यांवर चर्चा व उपाययोजना यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी या विशेष ऑनलाईन बैठकीचे सोमवारी दुपारी आयोजन केले होते.

सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, महिला व बालविकास विभागाच्या मुख्य सचिव आय. ए. कुंदन, सामाजिक न्याय आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, सहकार आयुक्त अनिल कवडे, बीडचे निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे, महिला व बालकल्याण उपायुक्त राहुल मोरे बैठकीला उपस्थित होते.

फक्त कामासाठी लाखांच्या संख्येने स्थलांतर करणाऱ्या कष्टकरी महिला हा एक मोठा समाज घटक आहे, असे स्पष्ट करून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आपण त्यांच्या समस्यांकडे फक्त सहानुभूतीने पाहून चालणार नाही. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांच्यातील गर्भाशय शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण, बालविवाह, कामाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, मासिक पाळीच्या काळातही काम करण्याची सक्ती, त्यामुळे होणारे गर्भपात, शस्त्रक्रियेनंतर होणारी आरोग्याची हेळसांड अशा अनेक गोष्टींनी या घटकाला ग्रासले आहे. त्याचे जीवन सुखकर होईल यादृष्टीने काम करण्याची गरज आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी ऊसतोडणी कामगार महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा विस्ताराने आढावा घेतला. काही अधिकाऱ्यांना सूचना देत काही योजनांबाबत बदलाचे निर्देशही दिले.

आयुक्तांनी दिली योजनांची माहिती

बालविकास उपायुक्त राहुल मोरे यांनी बालकल्याण समितीमार्फत होत असलेल्या कामाची माहिती दिली. साखर आयुक्त गायकवाड यांनी कारखानदारांना कामगारांसाठी आरोग्य सुविधा देणे बंधनकारक करण्यात आल्याचे सांगितले. डॉ. नारनवरे यांनी मुलांसाठीच्या वसतिगृह योजनेची माहिती दिली. बीड जिल्ह्यातून दरवर्षी १ लाख ३५ हजार कामगार स्थलांतरित होतात. त्या सर्वांची आरोग्य तपासणी होत असल्याची माहिती देण्यात आली. योजना कागदावर न ठेवता त्याचा लाभ होतो आहे की नाही, याविषयी दक्ष राहण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.