शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी महिलांना सरकारी संवेदनशीलतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगार महिलांना सरकारी संवेदनशीलतेची गरज आहे. सर्वच सरकारी खात्यांनी आपल्या योजनांमध्ये या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगार महिलांना सरकारी संवेदनशीलतेची गरज आहे. सर्वच सरकारी खात्यांनी आपल्या योजनांमध्ये या महिलांचा समावेश कसा करता येईल यावर काम करावे, असे निर्देश विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांंनी दिले.

ऊसतोडणी महिलांच्या समस्यांवर चर्चा व उपाययोजना यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी या विशेष ऑनलाईन बैठकीचे सोमवारी दुपारी आयोजन केले होते.

सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, महिला व बालविकास विभागाच्या मुख्य सचिव आय. ए. कुंदन, सामाजिक न्याय आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, सहकार आयुक्त अनिल कवडे, बीडचे निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे, महिला व बालकल्याण उपायुक्त राहुल मोरे बैठकीला उपस्थित होते.

फक्त कामासाठी लाखांच्या संख्येने स्थलांतर करणाऱ्या कष्टकरी महिला हा एक मोठा समाज घटक आहे, असे स्पष्ट करून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आपण त्यांच्या समस्यांकडे फक्त सहानुभूतीने पाहून चालणार नाही. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांच्यातील गर्भाशय शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण, बालविवाह, कामाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, मासिक पाळीच्या काळातही काम करण्याची सक्ती, त्यामुळे होणारे गर्भपात, शस्त्रक्रियेनंतर होणारी आरोग्याची हेळसांड अशा अनेक गोष्टींनी या घटकाला ग्रासले आहे. त्याचे जीवन सुखकर होईल यादृष्टीने काम करण्याची गरज आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी ऊसतोडणी कामगार महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा विस्ताराने आढावा घेतला. काही अधिकाऱ्यांना सूचना देत काही योजनांबाबत बदलाचे निर्देशही दिले.

आयुक्तांनी दिली योजनांची माहिती

बालविकास उपायुक्त राहुल मोरे यांनी बालकल्याण समितीमार्फत होत असलेल्या कामाची माहिती दिली. साखर आयुक्त गायकवाड यांनी कारखानदारांना कामगारांसाठी आरोग्य सुविधा देणे बंधनकारक करण्यात आल्याचे सांगितले. डॉ. नारनवरे यांनी मुलांसाठीच्या वसतिगृह योजनेची माहिती दिली. बीड जिल्ह्यातून दरवर्षी १ लाख ३५ हजार कामगार स्थलांतरित होतात. त्या सर्वांची आरोग्य तपासणी होत असल्याची माहिती देण्यात आली. योजना कागदावर न ठेवता त्याचा लाभ होतो आहे की नाही, याविषयी दक्ष राहण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.