शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

पाण्याअभावी ऊस, केळी पिके गेली वाया

By admin | Updated: May 19, 2017 04:33 IST

इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीच्या बागा चक्क सोडून दिल्या आहेत.

- लोकमत न्यूज नेटवर्क

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीच्या बागा चक्क सोडून दिल्या आहेत. तर उसाला पाणी मिळत नसल्यामुळे परिसरातील पिके वाया गेली आहेत.उष्णतामान सतत वरचेवर वाढत असल्याने याचा परिणाम शेतातील पिकावर झालेला आहे. तालुक्यात पश्चिमेकडील भागात थोरातवाडी, लासुर्णे, बेलवाडी या भागात शेकडो एकरात केळीची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात ही गावे केळी उत्पादनात अग्रेसर आहेत. मात्र या वर्षी तीव्र उन्हाळा असल्याने विहिरीच्या पाण्याने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला आहे. इंधन विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याने उसाला व केळीला पाणीपुरवठा करणे अवघड झाले असल्याने शेतकऱ्याने उसाच्या व केळीच्या बागेकडे दुर्लक्ष केलेले आहे.पाणीच नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढे केळी व ऊस जळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. ऊसपिके जागेवर जळून गेल्यामुळे तालुक्यातील तीनही सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर याचा परिणाम होणार आहे. डाळिंबाच्या बागेकडेही शेतकऱ्याने दुर्लक्ष केल्याने डाळिंबाच्या बागा जागेवर होरपळून जळून खाक होताना दिसत आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तहसीलदारांनी जागेवर पंचनामा करून आर्थिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे.