शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

साखरेचे दर घसरले!

By admin | Updated: May 28, 2014 00:24 IST

साखर कारखानदारीला दिलासा ठरलेली साखरेची दरवाढ अवघ्या दोन महिन्यांची ठरली.

सोमेश्वरनगर : साखर कारखानदारीला दिलासा ठरलेली साखरेची दरवाढ अवघ्या दोन महिन्यांची ठरली. ३,००० ते ३,१०० रुपयांपर्यंत गेलेले साखरेचे दर पुन्हा २,८०० ते २,९०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. दोनशे रुपयांची ही दरातील घसरण कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडून टाकणारी ठरणार आहे, यामुळे शेतकर्‍यांना उसाचे दुसरे आणि तिसरे पेमेंट मिळेल का नाही, याची धास्ती वाटू लागली आहे. सन २०१३-१४मध्ये वर्षभर साखरेचे दर हे २,५०० रुपये क्विंटलच्या आसपास घुटमळत होते. त्यामुळे राज्यातील कारखान्यांपुढे आर्थिक संकट उभे राहीले होते. एक वर्ष साखरेचे दर ‘जैसे थे’ होते. त्यामुळे अनेक कारखाने शॉर्ट मार्जीन मध्ये गेले होते. गेल्या हंगामात राज्यातील अनेक कारखान्यांने शेतकर्‍यांना शासनाने ऊसाचे निर्धारीत मुल्य (एफआरपी) देण्यासाठी असमर्थता दशविली. साखरेचे दर पडलेले असताना शेतकर्‍यांना ऊसाचा पहीला हप्ता देण्यासाठी कारखान्यांकडे पैसेच नव्हते. शेवटी केंद्र शासनाने यामध्ये हस्तेक्षेप करत देशातील साखर कारखान्यांसाठी ६६०० कोटी रूपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यातील महाराष्ट्राच्या वाटयाला २२०० कोटी रूपये आले होते. मात्र कारखाने चालू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पहीला हप्ता देणे बंधनकारक असताना मात्र केंद्राकडून कारखान्यांना पैसे मिळता मिळता मार्च महीना उजाडला. पहीला हप्ता मिळण्यासाठी शेतकर्‍यांना मार्च महीना उजाडण्याची वाट पाहवी लागली होती. जरी केंद्राने हे कर्ज बिनव्याजी जरी दिले असले तरी कारखान्यांना ते फेडायचे आहे. त्यामुळे साखरेला चांगले दर राहणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्यापासून कच्च्या साखरेचे निर्यात अनुदान ३३० रूपयांवरून २२७ रूपयांवर आणल्याने निर्यात थंडावली. या वर्षीही देशांतर्गत साखर निमिर्ती समाधानकारक झाली आहे. पुढील हंगाम हा अतिरीक्त साखरेचे ठरणार आहे. यामुळे भविष्यात साखरेच्या दराची खात्री कोणीही देऊ शकत नाही. (वार्ताहर)