शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

साखरदराची उसळी

By admin | Updated: January 23, 2017 02:42 IST

चालू हंगामात साखर धंद्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत. चालू एका महिन्यात साखरेने क्विंटलमागे तब्बल ३०५ रुपयांची उसळी

सोमेश्वरनगर : चालू हंगामात साखर धंद्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत. चालू एका महिन्यात साखरेने क्विंटलमागे तब्बल ३०५ रुपयांची उसळी घेतली आहे. गेल्या चार महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चालू हंगामात साखर कारखान्यांनी वाढलेल्या दराच्या पैशाचा उपयोग गेटकेन ऊस मिळविण्यासाठी केला आहे. एकीकडे साखरेला चांगला दर तर दुसरीकडे उसाचा तुटवडा अशा द्विधा मन:स्थितीत कारखाने सापडले होते. त्यामुळे कारखान्यांनी चालू हंगामात एफआरपीपेक्षा टनाला ७०० ते ८०० रुपये देऊन उसाची उपलब्धता केली. उसाची पळवापळवी करण्यावरून अनेक कारखान्यांच्या कामगारांमध्ये हाणामारीसुद्धा झाली होती. दर हंगामात एप्रिल ते मेपर्यंत चालणारे साखर कारखाने यावर्षी डिसेंबरपासूनच बंद होण्यास सुरुवात झाली. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक साखर कारखान्यांनी आपला हंगाम उरकला आहे. तर पुणे जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी आठ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने कारखान्यांना ठरवून दिलेली कोठा पद्धतीचे बंधन हटविले आहे. सध्या साखर खुली झाली असल्याने कारखाने आपआपल्या मर्जीने साखरेची विक्री करत आहेत. साखरेला अजून दर वाढतील म्हणून अनेक कारखान्यांची गेल्या वर्षीचीच साखर पडून आहे. तर चालू हंगामातील नवीन साखर साठा करून ठेवली आहे. त्यामुळे कारखाने आपल्या मर्जीनुसार विक्रीसाठी केवळ ५ ते १० हजार पोतीच ठेवत आहेत. तर दुसरीकडे जे कारखाने साखर साठा करत आहेत अशा कारखान्यांकडे केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. जर साखरेचे दर अजून वाढले तर केंद्र सरकार साखर आयात करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. मात्र सध्या जागतिक बाजारपेठेतही साखरेचे दर ३७०० रुपये क्विंटलवर गेल्याने साखर आयात करणेही सरकारला परवडणारे नाही. ४० टक्के आयात शुल्क गृहीत धरल्यास साखर भारतात येईपर्यंत ती ४० ते ४२ रुपयांवर जाणार आहे. त्यातच घाऊक बाजारपेठेत साखरेचे दर ४० रुपयांवर गेले आहेत. साखर कारखान्यांची शिखर संघटना असलेल्या इस्मा केंद्र सरकारने साखरेचे दर रोखा अन्यथा टोकाची पावले उचलावी लागतील असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)