शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा

By admin | Updated: April 28, 2017 06:05 IST

पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असून, उन्हाळ्याच्या ऐन मध्यातही पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. शेतीसाठी सध्या

पुणे : पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असून, उन्हाळ्याच्या ऐन मध्यातही पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. शेतीसाठी सध्या आवर्तन सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतरही पुण्याला रोज दोन वेळ व्यवस्थित पाणी देता येईल इतके पाणी धरणसाखळीत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असला तरी पुणेकरांना त्यावर पाण्याचा दिलासा मिळणार आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणसाखळीत सध्या ८.५६ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात या चारही धरणांत मिळून फक्त ५.४२ टीएमसी पाणी होते. त्यामुळे पुणे शहराला सुमारे वर्षभर एक वेळ व नंतर दोन दिवसांनी एक वेळ असा पाणीपुरवठा केला जात होता. या वेळी मात्र धरणात पुरेसे पाणी आहे, त्यामुळे पुणे शहराच्या पाणीकपातीची गरज भासणार नाही असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.सध्या खडकवासला धरणातून शेतीच्या पाण्यासाठी म्हणून आवर्तन सुरू आहे. ते साधारण १० ते १२ मे पर्यंत सुरू राहील. त्यात साधारण ४ टीएमसी पाणी जाते. मात्र धरणसाखळीमुळे त्यानंतरही पुरेसा म्हणजे ४.५६ टीएमसी पाणीसाठा धरणात असेल. खडकवासला धरणातून पाणी कमी झाले की धरणसाखळीमुळे अन्य धरणांमधून त्यात पाणी जमा होते. खडकवासला धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. पुणे शहरासाठी याच धरणातून पाणी घेण्यात येते. त्यावर शुद्धीकरण करून ते पुणे शहराला पुरवले जाते.पुण्यासाठी धरणातून रोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. त्यातून दोन वेळा व्यवस्थित पाणी देता येते. सध्या तरी धरणात पुरेसे पाणी आहे. बाष्पीभवन होऊन पाणी कमी होण्याची शक्यता गृहीत धरली तरीही पुणे शहरात पाणी कपात करावी लागणार नाही असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. मागील पावसाळ्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. धरणसाखळीतील सर्व धरणे भरली होती. त्यामुळेच यंदा चारही धरणांत चांगले पाणी आहे. खडकवासला धरणातील पाणी कमी झाले तरी अन्य धरणांमधून त्यात पाणी येणार असल्यामुळे पुण्यावर पाणीटंचाईची वेळ येणार नाही. (प्रतिनिधी)