शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा

By admin | Updated: April 28, 2017 06:05 IST

पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असून, उन्हाळ्याच्या ऐन मध्यातही पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. शेतीसाठी सध्या

पुणे : पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असून, उन्हाळ्याच्या ऐन मध्यातही पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. शेतीसाठी सध्या आवर्तन सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतरही पुण्याला रोज दोन वेळ व्यवस्थित पाणी देता येईल इतके पाणी धरणसाखळीत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असला तरी पुणेकरांना त्यावर पाण्याचा दिलासा मिळणार आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणसाखळीत सध्या ८.५६ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात या चारही धरणांत मिळून फक्त ५.४२ टीएमसी पाणी होते. त्यामुळे पुणे शहराला सुमारे वर्षभर एक वेळ व नंतर दोन दिवसांनी एक वेळ असा पाणीपुरवठा केला जात होता. या वेळी मात्र धरणात पुरेसे पाणी आहे, त्यामुळे पुणे शहराच्या पाणीकपातीची गरज भासणार नाही असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.सध्या खडकवासला धरणातून शेतीच्या पाण्यासाठी म्हणून आवर्तन सुरू आहे. ते साधारण १० ते १२ मे पर्यंत सुरू राहील. त्यात साधारण ४ टीएमसी पाणी जाते. मात्र धरणसाखळीमुळे त्यानंतरही पुरेसा म्हणजे ४.५६ टीएमसी पाणीसाठा धरणात असेल. खडकवासला धरणातून पाणी कमी झाले की धरणसाखळीमुळे अन्य धरणांमधून त्यात पाणी जमा होते. खडकवासला धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. पुणे शहरासाठी याच धरणातून पाणी घेण्यात येते. त्यावर शुद्धीकरण करून ते पुणे शहराला पुरवले जाते.पुण्यासाठी धरणातून रोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. त्यातून दोन वेळा व्यवस्थित पाणी देता येते. सध्या तरी धरणात पुरेसे पाणी आहे. बाष्पीभवन होऊन पाणी कमी होण्याची शक्यता गृहीत धरली तरीही पुणे शहरात पाणी कपात करावी लागणार नाही असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. मागील पावसाळ्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. धरणसाखळीतील सर्व धरणे भरली होती. त्यामुळेच यंदा चारही धरणांत चांगले पाणी आहे. खडकवासला धरणातील पाणी कमी झाले तरी अन्य धरणांमधून त्यात पाणी येणार असल्यामुळे पुण्यावर पाणीटंचाईची वेळ येणार नाही. (प्रतिनिधी)