शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा

By admin | Updated: April 28, 2017 06:05 IST

पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असून, उन्हाळ्याच्या ऐन मध्यातही पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. शेतीसाठी सध्या

पुणे : पुण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असून, उन्हाळ्याच्या ऐन मध्यातही पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. शेतीसाठी सध्या आवर्तन सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतरही पुण्याला रोज दोन वेळ व्यवस्थित पाणी देता येईल इतके पाणी धरणसाखळीत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असला तरी पुणेकरांना त्यावर पाण्याचा दिलासा मिळणार आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणसाखळीत सध्या ८.५६ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात या चारही धरणांत मिळून फक्त ५.४२ टीएमसी पाणी होते. त्यामुळे पुणे शहराला सुमारे वर्षभर एक वेळ व नंतर दोन दिवसांनी एक वेळ असा पाणीपुरवठा केला जात होता. या वेळी मात्र धरणात पुरेसे पाणी आहे, त्यामुळे पुणे शहराच्या पाणीकपातीची गरज भासणार नाही असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.सध्या खडकवासला धरणातून शेतीच्या पाण्यासाठी म्हणून आवर्तन सुरू आहे. ते साधारण १० ते १२ मे पर्यंत सुरू राहील. त्यात साधारण ४ टीएमसी पाणी जाते. मात्र धरणसाखळीमुळे त्यानंतरही पुरेसा म्हणजे ४.५६ टीएमसी पाणीसाठा धरणात असेल. खडकवासला धरणातून पाणी कमी झाले की धरणसाखळीमुळे अन्य धरणांमधून त्यात पाणी जमा होते. खडकवासला धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. पुणे शहरासाठी याच धरणातून पाणी घेण्यात येते. त्यावर शुद्धीकरण करून ते पुणे शहराला पुरवले जाते.पुण्यासाठी धरणातून रोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. त्यातून दोन वेळा व्यवस्थित पाणी देता येते. सध्या तरी धरणात पुरेसे पाणी आहे. बाष्पीभवन होऊन पाणी कमी होण्याची शक्यता गृहीत धरली तरीही पुणे शहरात पाणी कपात करावी लागणार नाही असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. मागील पावसाळ्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. धरणसाखळीतील सर्व धरणे भरली होती. त्यामुळेच यंदा चारही धरणांत चांगले पाणी आहे. खडकवासला धरणातील पाणी कमी झाले तरी अन्य धरणांमधून त्यात पाणी येणार असल्यामुळे पुण्यावर पाणीटंचाईची वेळ येणार नाही. (प्रतिनिधी)