शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

भीमाशंकर परिसराचा योग्य अभ्यास करा, अन्यथा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST

पुणे : मावळात ३६ तासांत ५०० हून अधिक मिमी पाऊस झाला. भीमाशंकर देवस्थान पाण्यात गेले. अतिवृष्टी, ढगफुटी असे अनेकांनी ...

पुणे : मावळात ३६ तासांत ५०० हून अधिक मिमी पाऊस झाला. भीमाशंकर देवस्थान पाण्यात गेले. अतिवृष्टी, ढगफुटी असे अनेकांनी त्याला नाव दिले. पण माणसांनी केलेल्या नुकसानीचे हे परिणाम आहेत. मर्यादेपेक्षा अतिक्रमण अधिक झाले की, पूर येतोच. निसर्ग दयाळू नाही. भीमाशंकर परिसरातील बांधकामे, तिथले लोक, पर्यटन या सर्वांचा अभ्यास करून नियोजन करावे, अन्यथा भविष्यात दरडी कोसळणे, पूर येणारच, अशी माहिती भूजलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वीच मंदिरानजीकच्या दोन विहिरी (कुंड) स्वच्छता केल्या आहेत. त्यातील पाण्याचे/झऱ्याचे उगम उत्तर-पश्चिमेकडून आहेत. त्या दिशेलाच वर डोंगर माथ्याचा भाग सपाट करून तिथे दोन मोठे कृत्रिम तलाव केलेले आहेत. याच दिशेला खाली जी घरे आहेत तिकडे डोंगरभिंतीची माती सुटी झालेली आहे. काही प्रमाणात डोंगराला तडे-भेगाही दिसून आल्या होत्या. निश्चितच उत्तर-पश्चिमेकडून जे पण काही विकासाच्या नावाखाली सुरु राहील, त्याचा परिणाम खाली मंदिराजवळ होणार आहे. अगदी तोच परिणाम म्हणजे परवा पाण्याने मंदिराला विळख्यात घेतले, असे धोंडे म्हणाले.

भिमाशंकर मंदिराचे तिर्थक्षेत्र म्हणून असलेलं महत्त्व आणि भविष्यात अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यास प्रशासनाची संभाव्य नाचक्की होईल. त्यामुळे आताच योग्य उपाय करायला हवेत, असे धोंडे यांनी सांगितले.

——————————————-

सर्व बाजूने प्रशासनाने विचार करावा

22 जूलै रोजी रात्री मंदिर परिसरास पुराच्या पाण्याने वेढा दिला. मंचर-भिमाशंकर रस्त्यावर मोठी दरड कोसळली. मंदिर परिसरात राहणारी लोकसंख्या आणि वर्तमान स्थिती पाहता प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. किमान पावसाळ्यात लोकांना स्थलांतरित तरी करायला हवे. या परिसराची संपूर्ण तांत्रिक तपासणी व्हायला हवी. हे सगळे वेळेतच घडावे तर जीव वाचतील अन्यथा दुर्घटना घडून गेल्यावर होणाऱ्या अभ्यासाचा काहीच उपयोग होणार नाही, असे धोंडे म्हणाले.

—————————————————-

या ठिकाणी मुळातच दाट वस्ती आहे, शिवाय तिथीनुसार होणारी गर्दी वेगळीच आहे. या गर्दीसाठी लागणारी व्यवस्था म्हणून खोल पाया लागणारी नवी बांधकामे तितकिशी नाहीत. जी आहेत ती जुनी आहेत. परंतु नवीन कामे करता ती धोकादायक ठरतील यात शंका नाही. देवस्थान विकासकामे सुरु असताना पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवणे म्हणजे "आगीशी खेळच होय" याचा विचार झाला पाहिजे.

- उपेंद्र धोंडे, भूजलतज्ज्ञ

———————————