शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन अभ्यासाने विद्यार्थ्यांचा वाढतोय ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

खोर : कोरोना आला अन् सगळे जीवनच ऑनलाईन झाले..! तब्बल दीड वर्षापासून कोरोनाच्या रोगाने चांगलेच थैमान घातले असून, याचा ...

खोर : कोरोना आला अन् सगळे जीवनच ऑनलाईन झाले..! तब्बल दीड वर्षापासून कोरोनाच्या रोगाने चांगलेच थैमान घातले असून, याचा सर्वाधिक फटका आज शिक्षण विभागाला बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या झपाट्याने शिक्षण व्यवस्था कोलमडली. संपूर्ण शिक्षण विभाग ऑनलाईन होऊन बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला घेतल्याने ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर भर दिला गेला. मात्र, ऑनलाईन शिक्षण प्रणालीचे आज विद्यार्थी वर्गांची डोकेदुखी ठरत आहे. अनेक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर संगममताने ऑनलाईन अभ्यास करीत असतात. तर ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन अभ्यास करीत असताना खेडेगाव असल्याने मोबाईल टॉवर, रेंजचा सर्वाधिक समस्या सध्या जाणवत असताना दिसत आहे. दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत ऑनलाईन शिक्षण चालू केले आहे.

खोर (ता. दौंड) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन शाळा सुरू केली आहे. दररोज सकाळी ८ ते ९ या वेळेत व संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम घेण्यावर भर दिला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेतच बसून अभ्यासक्रम समजून घेण्यास अडचण येत असते, तर हा ऑनलाईन पद्धतीच्या अभ्यासक्रम मुलांना कसा समजून घेता येईल? हाच प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांच्या पालकांना पडत आहे. खोरच्या श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीची पटसंख्या ५३ आहे. मात्र, आज ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी केवळ १५ ते २० मुले हजेरी दर्शवितात.

भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. लोणकर म्हणाले की, ऑनलाईन शिकवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तालुका पातळीवर व गावपातळीवर विचार करून ऑनलाईन शिक्षण बंद करून आठवड्यातून किमान दोन वेळा ऑफलाईन शिक्षण सुरू करण्याची परवानगी मिळावी.

ऑनलाईन शिकवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तालुका पातळीवर व गावपातळीवर विचार करून ऑनलाईन शिक्षण बंद करून आठवड्यातून किमान दोन वेळा ऑफलाईन शिक्षण सुरू करण्याची परवानगी मिळावी.

-के. एस. लोणकर, मुख्याध्यापक, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, खोर

------

तब्बल दीड वर्षापासून मुलांच्या शाळा बंद झाल्या आहेत. मुलांची शिक्षणाच्या बाबतीतील गोडी ही कमी होण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन शिक्षण घेण्यास देखील मुले टाळाटाळ करीत आहेत. ग्रामीण भागात कोरोनाची सावट कमी आहे. प्रशासनाने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी.

-प्रकाश साळुंके, पालक, खोर

खोर (ता. दौंड) येथे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करताना. तर काही ठिकाणी मुख्याध्यापक के. एस. लोणकर घरोघरी जाऊन मुलांना शिकवीत आहेत.