शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यास फी परत द्यावी

By admin | Updated: January 13, 2017 03:30 IST

कोर्सची फी भरल्यानंतरही कोर्स अपूर्ण ठेवल्याप्रकरणी ग्राहक मंचाने एका संस्थेला तक्रारदार विद्यार्थ्याला

पुणे : कोर्सची फी भरल्यानंतरही कोर्स अपूर्ण ठेवल्याप्रकरणी ग्राहक मंचाने एका संस्थेला तक्रारदार विद्यार्थ्याला १२ हजार रुपयांची फी परत देण्यात यावी, असा आदेश दिला आहे.कोर्स अपूर्ण ठेवल्याबद्दल संस्थेने तक्रारदाराला १२ हजार रुपये आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आता परत द्यावेत, तक्रारदाराला झालेल्या नुकसानीबद्दल ५ हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून १ हजार रुपये द्यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे आणि सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी दिला आहे़ याप्रकरणी शांताराम सत्यनारायणजी झंवर (रा. ओंकार कॉम्प्लेक्स, उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड डेपो) यांनी ग्लोबल इंटरप्रायजेस इन्फोटेक सोल्युशन्स (साई कृपाभवन, के.एस.बी. पंप्स कंपनीसमोर, खराळवाडी, पिंपरी) यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. झंवर यांनी स्वत: मंचापुढे आपली बाजू मांडली.झंवर यांना स्टँटर्ड अ‍ॅप्लीकेशन अ‍ॅड प्रॉडक्टस हा कोर्स करायचा होता. त्यांनी ग्लोबल इंटरप्रायजेस इन्फोटेक सोल्युशन्स यांच्याकडे या कोर्ससाठी १२ हजार रुपये भरुन प्रवेश घेतला. त्यांना कोर्सनंतर नोकरी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, कॅम्प परिसरातील त्यांचे कार्यालय बंद होणार असून, ते पिंपरी येथे परत सुरु होणार आहे. त्याठिकाणी कोर्स पूर्ण करण्यासाठी यावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. झंवर यांना कोर्स पूर्ण करुन दिला नाही. तसेच त्यांनी भरलेली फी त्यांना परत करण्यात आली नाही. सेवा देताना त्रुटी असल्यामुळे त्यांनी दाखल केलेला अर्ज मागण्यांसह मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी ग्राहक मंचाकडे केली होती.(प्रतिनिधी)मेल पाठवूनही उत्तर नाहीसंस्थेने कोर्सची फी स्वीकारूनसुद्धा झंवर यांचा कोर्स अपूर्ण ठेवला. तसेच, त्यांनी मेल पाठविल्यानंतरही त्यांना फीची रक्कम परत केली नाही. विद्यार्थ्याकडून कोर्सची संपूर्ण फी घेऊन तो कोर्स अपूर्ण ठेवणे, ही विरुद्ध पक्षाची कृतीही सेवेतील त्रुटी ठरते. युक्तिवादा दरम्यान तक्रारदाराने सांगितले की, त्यांना हा कोर्स शिकविण्यासाठी जे शिक्षक होते, त्यांनी संबंधितांची संस्था सोडली त्यामुळे त्यांचा कोर्स पूर्ण होऊ शकला नाही, ही बाब त्यांनी संबंधितांना पाठविलेल्या मेलमध्ये नमूद आहे. त्याला विरुद्ध पक्षाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. तक्रार अर्जातील नमूदबाबी लक्षात घेऊन मंचाने तक्रार अर्ज मंजूर केला़