शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

पाण्यासाठी पुन्हा पेटणार संघर्ष

By admin | Updated: February 5, 2015 23:30 IST

सुमारे ४ निविदा राज्य शासनाने रद्द केल्याने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

सुनील राऊत ल्ल पुणेपुणे : जुना कालवा (बेबी कॅनॉल) दुरुस्तीसाठीच्या सुमारे ४ निविदा राज्य शासनाने रद्द केल्याने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. हा कालवा ४५ वर्षे बंद अवस्थेत असून त्याला असंख्य ठिकाणी गळती तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी शेतकऱ्यांना मिळणार की गळतीद्वारे वाया जाणार, याबाबत महापालिका आणि स्वत: पाटबंधारे विभागही संभ्रमात पडले आहेत. खडकवासल्याच्या पाण्यावरून पुणे शहर व ग्रामीण यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. यावर उपाय म्हणून मध्यंतरी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहारातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून सुमारे साडेसहा टीएमसी पाणी शेतीला देण्याचा निर्णय झाला. हा प्रकल्प मार्चअखेरीस पूर्ण करून पाणी देण्याचे ठरले होते. मात्र, आता या कामासाठीच्या निविदाच राज्य शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता आहे. आघाडी शासनाच्या काळात राज्यातील सिंचन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाल्याने राज्य शासनाने राज्यातील तब्बल ६२४ कोटी २८ लाख रुपयांच्या सुमारे १२८ निविदा रद्द केल्या आहेत. या निविदांमध्ये खडकवासला प्रकल्पातील जुन्या आणि नव्या कालव्यांच्या दुरुस्तीच्याही सुमारे ८ निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यात महापालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या कॅनॉलच्या दुरुस्तीच्या सुमारे ८ ते १0 कोटी रुपयांच्या निविदांचा समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.४पालिकेकडून मुंढवा येथे बंधारा बांधण्यात आला असून, जॅक वेल उभारली जात आहे. हे पाणी या बांधातून उचलून सुमारे साडेतीन किलोमीटर लांब जलावाहिनीतून हडपसर येथून बेबी कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडले जाईल. हे काम ९0 टक्के पूर्ण झाले असून, त्यासाठी ९0 कोटींचा खर्चही झाला आहे. उर्वरित १0 टक्के काम मार्चअखेरीस पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.पाटबंधारे विभागाची कोंडी४शेतीसाठी पाणी सोडण्यात येणारा बेबी कॅनॉल (जुना कालवा) हा १८८५मध्ये खडकवासला धरण बांधल्यानंतर बांधण्यात आलेला आहे. १९६२मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर नवीन कालवा बांधण्यात आला. हा कालवा १९७0मध्ये सुरू झाल्यानंतर त्याच वेळी हा बेबी कॅनॉल बंद करण्यात आला. तो आजतागायत गेल्या ४५ वर्षांपासून बंदच आहे. ४त्यामुळे या कालव्याचे बांध अनेक ठिकाणी मातीसाठी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळतीची शक्यता आहे. तर, अनेक ठिकाणी त्यात भराव टाकून अतिक्रमणेही करण्यात आलेली आहे. ४महापालिकेकडून या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडण्यापूर्वी त्याची दुरूस्ती पाटबंधारे विभागाकडून होणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने सिंचन विभागाने त्याच्या चार निविदा काढल्या होत्या. त्यांची रक्कम सुमारे ८ ते १0 कोटींची होती. मात्र, या निविदा आता रद्द झाल्याने ही दुरूस्ती होणे अशक्य आहे. ४महापालिकेने शेतीसाठी सांडपाणी सोडल्यानंतर पालिकेस पाटबंधारे विभाग १६.५0 टीएमसी पाणी देणार आहे. त्यामुळे सिंचनाचे पाणी आपोआपच कमी होणार आहे. तर जे साडेसहा टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले जाणार आहे, त्यातील केवळ अर्धा टीएमसी पाणी पुरेल एवढेच सिंचन क्षेत्र बेबी कॅनॉलवर आहे. त्यामुळे सहा टीएमसी पाण्याचा वापरच होणार नसल्याचे महापालिका तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात. ४२0१२ पासून शहरासाठी १६.५0 टीएमसी पाणी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पालिकेस जादा पाणी दिल्यास शेतीसाठीचे पाणी कमी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नदीत सोडलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.