शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाण्यासाठी पुन्हा पेटणार संघर्ष

By admin | Updated: February 5, 2015 23:30 IST

सुमारे ४ निविदा राज्य शासनाने रद्द केल्याने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

सुनील राऊत ल्ल पुणेपुणे : जुना कालवा (बेबी कॅनॉल) दुरुस्तीसाठीच्या सुमारे ४ निविदा राज्य शासनाने रद्द केल्याने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. हा कालवा ४५ वर्षे बंद अवस्थेत असून त्याला असंख्य ठिकाणी गळती तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी शेतकऱ्यांना मिळणार की गळतीद्वारे वाया जाणार, याबाबत महापालिका आणि स्वत: पाटबंधारे विभागही संभ्रमात पडले आहेत. खडकवासल्याच्या पाण्यावरून पुणे शहर व ग्रामीण यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. यावर उपाय म्हणून मध्यंतरी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहारातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून सुमारे साडेसहा टीएमसी पाणी शेतीला देण्याचा निर्णय झाला. हा प्रकल्प मार्चअखेरीस पूर्ण करून पाणी देण्याचे ठरले होते. मात्र, आता या कामासाठीच्या निविदाच राज्य शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता आहे. आघाडी शासनाच्या काळात राज्यातील सिंचन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाल्याने राज्य शासनाने राज्यातील तब्बल ६२४ कोटी २८ लाख रुपयांच्या सुमारे १२८ निविदा रद्द केल्या आहेत. या निविदांमध्ये खडकवासला प्रकल्पातील जुन्या आणि नव्या कालव्यांच्या दुरुस्तीच्याही सुमारे ८ निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यात महापालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या कॅनॉलच्या दुरुस्तीच्या सुमारे ८ ते १0 कोटी रुपयांच्या निविदांचा समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.४पालिकेकडून मुंढवा येथे बंधारा बांधण्यात आला असून, जॅक वेल उभारली जात आहे. हे पाणी या बांधातून उचलून सुमारे साडेतीन किलोमीटर लांब जलावाहिनीतून हडपसर येथून बेबी कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडले जाईल. हे काम ९0 टक्के पूर्ण झाले असून, त्यासाठी ९0 कोटींचा खर्चही झाला आहे. उर्वरित १0 टक्के काम मार्चअखेरीस पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.पाटबंधारे विभागाची कोंडी४शेतीसाठी पाणी सोडण्यात येणारा बेबी कॅनॉल (जुना कालवा) हा १८८५मध्ये खडकवासला धरण बांधल्यानंतर बांधण्यात आलेला आहे. १९६२मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर नवीन कालवा बांधण्यात आला. हा कालवा १९७0मध्ये सुरू झाल्यानंतर त्याच वेळी हा बेबी कॅनॉल बंद करण्यात आला. तो आजतागायत गेल्या ४५ वर्षांपासून बंदच आहे. ४त्यामुळे या कालव्याचे बांध अनेक ठिकाणी मातीसाठी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळतीची शक्यता आहे. तर, अनेक ठिकाणी त्यात भराव टाकून अतिक्रमणेही करण्यात आलेली आहे. ४महापालिकेकडून या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडण्यापूर्वी त्याची दुरूस्ती पाटबंधारे विभागाकडून होणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने सिंचन विभागाने त्याच्या चार निविदा काढल्या होत्या. त्यांची रक्कम सुमारे ८ ते १0 कोटींची होती. मात्र, या निविदा आता रद्द झाल्याने ही दुरूस्ती होणे अशक्य आहे. ४महापालिकेने शेतीसाठी सांडपाणी सोडल्यानंतर पालिकेस पाटबंधारे विभाग १६.५0 टीएमसी पाणी देणार आहे. त्यामुळे सिंचनाचे पाणी आपोआपच कमी होणार आहे. तर जे साडेसहा टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले जाणार आहे, त्यातील केवळ अर्धा टीएमसी पाणी पुरेल एवढेच सिंचन क्षेत्र बेबी कॅनॉलवर आहे. त्यामुळे सहा टीएमसी पाण्याचा वापरच होणार नसल्याचे महापालिका तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात. ४२0१२ पासून शहरासाठी १६.५0 टीएमसी पाणी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पालिकेस जादा पाणी दिल्यास शेतीसाठीचे पाणी कमी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नदीत सोडलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.