शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

चाकणमध्ये प्लॅस्टिकबंदीला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:10 IST

चाकण : दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. त्याप्रमाणे चाकण नगर परिषदने कडक अंमलबजावणी करत शहरात प्लॅस्टिक ...

चाकण : दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. त्याप्रमाणे चाकण नगर परिषदने कडक अंमलबजावणी करत शहरात प्लॅस्टिक बंदी केली होती. शहरातील अनेक मोठ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यामुळे छोट्या व्यावसायिकांनीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून नगर परिषदचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

चाकण शहरात प्लॅस्टिकबंदीच्या काळात नगर परिषद प्रशासनाने कडक अंमलबजावणी करून अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच शहरातील आठवडे बाजारात जनजागृती करून प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन केल्याने सर्वच स्तरावरील व्यावसायिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केला होता. परंतु हा कारवाईचा बागुलबुवा फुटला असून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. या प्लॅस्टिक कॅरिबॅग बाजारात येतात कशा हे प्रशासनाला दिसत नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. १०० वर्षे तरी प्लॅस्टिक कुजत नाही. प्लॅस्टिक जाळल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होऊन प्रदूषण वाढत आहे. तसेच कचऱ्यात जास्त कचरा प्लॅस्टिक कॅरिबॅगच जास्त प्रमाणात असतात. यामुळे कचरा पेटवल्यास त्यातून निघणाऱ्या धुरातून परिसरात हवा प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी बाजारात येणाऱ्या या पिशव्या रोखणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक कॅरिबॅग तयार करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या बंदी आहे.

नगर परिषद प्रशासनाकडून प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई होते नसल्याने कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर भाजी मंडई, फळ, मिठाई आणि फूलविक्रेत्यांकडून वापर वाढला आहे. तसेच समारंभामध्येही जेवणावळी व कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिक द्रोण,ग्लास, कप, वाट्या, चमच्यांचा वापर केला जात आहेत. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडालेला असताना संबधित यंत्रणा डोळेझाक करत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पर्यावरणसह मानवी आरोग्याला हा फटका बसत आहे. राज्य सरकारने कायदे व नियम बनविले असले तरी याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

कोट

कोरोनाच्या काळात याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु पुन्हा एकदा शहरातील प्लॅस्टिक कॅरिबॅग विकणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. लोकांनीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मदत करावी. प्लॅस्टिकमुक्त चाकण शहरासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. - नानासाहेब कामठे,मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद.

प्लॅस्टिकच्या वाढत्या भस्मासुराचा परिणाम.

पावसाळ्य़ात गटारे तुंबतात.

- जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते.

- नाले तुंबतात, पूरस्थिती निर्माण होते.

- प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने भूप्रदषणात वाढ.

* काय उपाययोजना कराव्यात...

- हॉटेल, फेरीवाले, हातगाडय़ा आणि दुकानविक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करावी.

- प्लॅस्टिक वापरणारे विक्रेत्यांचा परवाना रद्द करवा.

- प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी तागाच्या, कापडाच्या व कागदाच्या पिशव्यांचा वापर वाढावा.

- प्लॅस्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करावी.

- प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियान राबविणे.

-