शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नी नगरपालिकेविरोधात अवमान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : सर्वोच्च न्यायालयाने ४ आॅक्टोबर २०१६ रोजी कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी रेबिज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : सर्वोच्च न्यायालयाने ४ आॅक्टोबर २०१६ रोजी कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी रेबिज निर्मूलनासाठी आणि मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश दिले होते. बारामती नगरपरिषदेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. या समितीने त्यांना दिलेलं काम करणे तर लांब पण अजून अशी समितीच बारामती नगरपरिषदेने गेल्या जवळपास ५ वर्षांत स्थापनच केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा नगरपालिकेने अवमान केला आहे. त्यामुळे नगरपालिकेविरोधात अवमान याचिका दाखल करण्यासाठी अॅटर्नी जनरल यांच्याकडे परवानगी मागणार असल्याचे येथील अ‍ॅड. भार्गव पाटसकर यांनी स्पष्ट केले आहे.

मोकाट जनावरांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना देखरेख समितीची स्थापना करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. महाराष्ट्र शासनानाच्या नगरविकास विभागानेही या बाबत परिपत्रक काढून या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक जारी केले होते, त्याकडेही बारामती नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे.

रेबिज निर्मूलनासाठी आणि मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश दिले होते. त्यानुसार अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल नियमांतर्गत ‘देखरेख समिती’ स्थापन करणे आवश्यक होते व त्या समितीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तसेच कायद्यातील तरतुदीनुसार काम करणे अपेक्षित होेते. या समितीने अशा कुत्र्यांची गणना, त्यांचे लसीकरण, नसबंदी करणे तसेच भटकी कुत्री पकडून त्यांचे स्थलांतर करणे आदी कामांची जबाबदारी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ‘देखरेख समिती’ची आहेत. बारामती नगरपालिकेकडे पाटसकर यांनी माहितीच्या अधिकारात या समितीबाबत माहिती मागितली होती. मात्र, अशी कोणतीही समिती अस्तित्वात नसल्याचे पत्र नगरपालिकेने त्यांना दिलेले आहे.

बारामती नगरपरिषदेने येत्या महिनाभरात ही समिती स्थापन करून भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात समितीने योग्य काम करावे, अशी मागणी देखील अ‍ॅड. पाटसकर यांनी केली आहे. अ‍ॅड. पाटसकर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर लढा देत आहेत.