शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

तुकोबारायांच्या सोहळ्याची सांगता

By admin | Updated: August 11, 2015 03:50 IST

भाळी चंदनाचा गंध, मुखी विठुरायाचे नाम, हाती टाळ-वीणा, मृदंगाचा निनाद आणि अभंगाचा गजर करीत हलक्या पावसाच्या सरी पडत असताना भक्तिमय वातावरणात ठिकठिकाणी भंडाऱ्याची

देहूगाव : भाळी चंदनाचा गंध, मुखी विठुरायाचे नाम, हाती टाळ-वीणा, मृदंगाचा निनाद आणि अभंगाचा गजर करीत हलक्या पावसाच्या सरी पडत असताना भक्तिमय वातावरणात ठिकठिकाणी भंडाऱ्याची उधळण करीत श्री संत तुकाराममहाराज पालखीचे सोमवारी दोनच्या सुमारास आषाढवारी करून देहूत आगमन झाले. देहूकरांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे आनंदमय वातावरणात स्वागत केले. पालखीची ३३० वी आषाढी वारी संपन्न झाली.पहाटे नित्यपूजा उरकल्यानंतर पिंपरी येथून पालखी देहूगावाकडे निघाली असता, रस्त्यात ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. पालखीचे स्वागत देहूगावच्या उपस्थित ग्रामस्थांनी केले. पालखीसमवेत संस्थानाचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, सुनीलमहाराज दिगंबर मोरे, सुनील दामोदर मोरे, अशोक निवृत्ती मोरे,अभिजित मोरे,जालिंदर मोरे आदी उपस्थित होते.पालखी मंदिरासमोर आल्यानंतर महाद्वार आरती झाली. मुख्य मंदिरात दिलीप नारायण मोरे इनामदार यांनी संत तुकाराममहाराजांच्या पादुका डोक्यावर घेतल्या व त्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नेल्या. येथे बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर, हे माहेर संतांचे हा अभंग झाला. यानंतर दिलीप मोरे यांच्या हस्ते आरती झाली. आरती झाल्याबरोबर उपस्थित वारकऱ्यांनी ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ नामाचा जयघोष करीत पताका उंचावून तुतारी, शंख, नगारा व ताशाचा गजर व नाद केला. या वेळी मंदिराच्या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. आरतीनंतर चांदीची अब्दागिरी, सावलीचे रेशमी छत्र, गरूड टक्के, पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात प्रदक्षिणा घातली. भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी, मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानाच्या वतीने नारळप्रसाद देऊन सत्कार झाला. (वार्ताहर)प्रत्येक वर्षी पालखी परत येताना वारकऱ्यांची गर्दी खूपच कमी असते. मात्र या वर्षी पालखी माघारी येतानादेखील मोठ्या संख्येने वारकरी होते. गर्दी जास्त व पोलीस बंदोबस्त कमी अशी परिस्थिती होती. पालखी प्रस्थानाच्या तुलनेत बंदोबस्त कमी असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण करणे व वाहतूक सुरळीत ठेवणे पोलिसांना अवघड जात होते. पालखीबरोबर आलेली वाहने थेट गावात वारकऱ्यांसमवेत आली होती. परिणामी पालखी मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. देहू-आळंदी रस्ता बराच वेळ बंदच होता. दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी-चिंचवड भागातील शाळा सुटत असल्याने त्यांची वाहने गर्दीत अडकली होती.