शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

वादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, बागेत कैऱ्यांचा सडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

काल रात्री अचानक वादळी वारा बेफाम सुरू झाला. त्यामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणून अनेक ठिकाणी वीजपुरवठा रात्रीच बंद ...

काल रात्री अचानक वादळी वारा बेफाम सुरू झाला. त्यामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणून अनेक ठिकाणी वीजपुरवठा रात्रीच बंद करण्यात आला होता. येथे बहुतांश शेतकऱ्यांकडे आंब्याच्या बाग आहेत. येथील शेतकरी सीताराम देवकर यांची हापूस, केशरी, रत्नागिरी आणि राजापुरी वाणाच्या सुमारे २०० आंब्यांच्या झाडांची बाग आहे. तसेच तुकाराम देवकर, नाथा देवकर, रामदास देवकर, पोपट कोतवाल, शिवाजी कोतवाल,बबन कोतवाल,साहेबराव कोतवाल,दत्तू भांबेरे या शेतकऱ्यांच्या पण फळबाग आहेत. आंब्याची बाग नुकतीच पाडाला लागायला सुरुवात झाली होती. अजून आंबे विक्री करण्यासाठी तोडले नाहीत. सोसायट्या वाऱ्यामुळे बागेत कैऱ्यांचा सडा पडला होता. यावर्षी मार्केटमध्ये आंबा खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आणि बाजारभाव पण खूप चांगला आहे, त्या अनुषंगाने किमान तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. पण वादळामुळे कैऱ्या कच्च्या असतानाच झाडावरून पडून फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाली असल्याचे सीताराम देवकर यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात कोणत्याही शेतमालाची विक्री झाली नाही. बराच शेतमाल शेतातच वाया गेला त्यात आता वादळाच्या तडाख्यात हातातोंडाशी विक्रीस आलेल्या आंब्याच्या फळबागेची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. शेतकरीवर्ग या नुकसानीतून सावरला जावा म्हणून शासनाने रीतसर पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी संतोष आग्रे यांनी केली आहे.तसेच परिसरातील अनेक शेतकरी वर्गाचे कैऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे सीताराम देवकर यांच्या झाडाच्या कैऱ्यांचा सडा खाली पडलेला दिसत आहे.