शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, बागेत कैऱ्यांचा सडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

काल रात्री अचानक वादळी वारा बेफाम सुरू झाला. त्यामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणून अनेक ठिकाणी वीजपुरवठा रात्रीच बंद ...

काल रात्री अचानक वादळी वारा बेफाम सुरू झाला. त्यामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणून अनेक ठिकाणी वीजपुरवठा रात्रीच बंद करण्यात आला होता. येथे बहुतांश शेतकऱ्यांकडे आंब्याच्या बाग आहेत. येथील शेतकरी सीताराम देवकर यांची हापूस, केशरी, रत्नागिरी आणि राजापुरी वाणाच्या सुमारे २०० आंब्यांच्या झाडांची बाग आहे. तसेच तुकाराम देवकर, नाथा देवकर, रामदास देवकर, पोपट कोतवाल, शिवाजी कोतवाल,बबन कोतवाल,साहेबराव कोतवाल,दत्तू भांबेरे या शेतकऱ्यांच्या पण फळबाग आहेत. आंब्याची बाग नुकतीच पाडाला लागायला सुरुवात झाली होती. अजून आंबे विक्री करण्यासाठी तोडले नाहीत. सोसायट्या वाऱ्यामुळे बागेत कैऱ्यांचा सडा पडला होता. यावर्षी मार्केटमध्ये आंबा खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आणि बाजारभाव पण खूप चांगला आहे, त्या अनुषंगाने किमान तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. पण वादळामुळे कैऱ्या कच्च्या असतानाच झाडावरून पडून फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाली असल्याचे सीताराम देवकर यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात कोणत्याही शेतमालाची विक्री झाली नाही. बराच शेतमाल शेतातच वाया गेला त्यात आता वादळाच्या तडाख्यात हातातोंडाशी विक्रीस आलेल्या आंब्याच्या फळबागेची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. शेतकरीवर्ग या नुकसानीतून सावरला जावा म्हणून शासनाने रीतसर पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी संतोष आग्रे यांनी केली आहे.तसेच परिसरातील अनेक शेतकरी वर्गाचे कैऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे सीताराम देवकर यांच्या झाडाच्या कैऱ्यांचा सडा खाली पडलेला दिसत आहे.