शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

क्षेत्रनिश्चितीसाठी पालिका घेणार राज्याचा अभिप्राय

By admin | Updated: November 2, 2015 01:10 IST

नगरसेवकांनी शहरामध्ये क्षेत्रसभा घ्याव्यात याकरिता प्रत्येक प्रभागात क्षेत्रनिश्चिती करून ती गॅझेटमध्ये प्रसिद्ध करणे कायद्यानुसार आवश्यक आहे.

पुणे : नगरसेवकांनी शहरामध्ये क्षेत्रसभा घ्याव्यात याकरिता प्रत्येक प्रभागात क्षेत्रनिश्चिती करून ती गॅझेटमध्ये प्रसिद्ध करणे कायद्यानुसार आवश्यक आहे. मात्र, ही क्षेत्रनिश्चिती नेमकी कशी करायची याबाबत संदिग्धता असल्याने महापालिकेकडून शासनाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय घेतला जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी दिली. यामुळे क्षेत्रसभेचा तिढा लवकरच सुटून त्यांना नागरिकांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्य शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियिम कायदा १९४९ मध्ये २००९ मध्ये दुरुस्ती करून कलम २९ क अन्वये प्रत्येक नगरसेवकाने दोन वर्षांतून किमान ४ क्षेत्रसभा घेणे बंधनकारक केले आहे. रस्ते, पाणी, साफसफाई, ड्रेनेज, दिवाबत्ती, कचऱ्याची विल्हेवाट आदी मूलभूत सोईसुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी, अपेक्षा जाणून घेणे व त्याची सोडवणूक करणे ही तरतूद केली. या क्षेत्रसभा न घेतल्यास संबंधित नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कायद्यानुसार क्षेत्रसभाच होत नसल्याची तक्रार स्वयंसेवी संस्थांकडून आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली. त्याचबरोबर क्षेत्रसभा होत नसल्याने अ‍ॅड. विकास शिंदे यांनी पालिकेला नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व नगरसेवकांना १४ सप्टेंबर २०१५ रोजी एक पत्र पाठवून तातडीने क्षेत्रसभा घेण्याचे आदेश दिले. मात्र, क्षेत्रच निश्चित नसल्याने वॉर्डसभा कशा घ्यायचा, असा प्रश्न नगरसेवकांसमोर उभा ठाकला होता. त्यांनी लवकरात लवकर क्षेत्रनिश्चित करून मिळावे, अशी आयुक्तांकडे मागणी केली आहे. आयुक्तांनी क्षेत्र निश्चित करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे काम निवडणूक विभागाकडे सोपविले आहे. याबाबत सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘कायद्यामध्ये क्षेत्रनिश्चित करून गॅझेटमध्ये प्रसिद्ध करावयाचे आहे, गॅझेट हे राज्य शासन प्रसिद्ध करीत असते. त्यामुळे महापालिकेने क्षेत्र निश्चित करून ते राज्य शासनाकडून गॅझेटमध्ये प्रसिद्ध करायचे की राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेऊन क्षेत्र जाहीर करणार, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे शासनाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय घेतला जाणार आहे.’’