शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
4
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
5
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
6
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
7
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
8
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
9
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
10
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
11
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
12
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
13
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
14
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
15
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
16
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
17
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
18
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
19
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
20
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?

राज्यात राजकीय नैतिकतेचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 01:02 IST

‘स्वातंत्र्यानंतर १९७२ पासून २०१६ पर्यंतचा दुष्काळ अनुभवत असताना, शेतकऱ्यांची मुले सत्तेत जाऊनदेखील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात म्हणूनच शेतकऱ्यांचा विकास थांबला.

लोणी काळभोर : ‘‘स्वातंत्र्यानंतर १९७२ पासून २०१६ पर्यंतचा दुष्काळ अनुभवत असताना, शेतकऱ्यांची मुले सत्तेत जाऊनदेखील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात म्हणूनच शेतकऱ्यांचा विकास थांबला. राज्यात विकास करताना राजकीय नैतिकतेचा दुष्काळ पडला आहे. याचे चित्रण मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, ग्रामीण साहित्यातून आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्न तसेच त्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे महात्मा फुले आद्य क्रांतिकारक होते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘दुष्काळाचे मराठी साहित्यातील प्रतिबिंब’ या विषयांवर दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोतापल्ले बोलत होते. या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे प्रशासन सहसचिव डॉ. अशोक करांडे होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी चर्चासत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी, दुष्काळावर मात करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी विषयप्रवर्तक डॉ. सुहास पुजारी (सोलापूर), डॉ. विद्यासागर पाटंगणकर (बीड), डॉ. शिरीष लांडगे पाटील (नेवासा), डॉ. जयद्रथ जाधव (रेणापूर, लातूर), डॉ. उदय जाधव (खटाव, सातारा), इत्यादींनी संशोधनपर लेखांचे वाचन केले. यावर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी वीर राठोड (औरंगाबाद), यांच्यासमवेत डॉ. महादेव वाळुंज (इंदापूर), डॉ. किसन माने (सांगोला), प्रा. अरविंद हंगरेकर (तुळजापूर), ज्ञानेश्वरी मुंडे (औरंगाबाद), डॉ. रामलीला पवार (जालना), डॉ. तानाजी देशमुख (सोलापूर), प्रा. भाऊ गोसावी (कोल्हापूर), डॉ. अशोक तवर (पाचगणी), कु. मयूरा जाधव (सोलापूर), प्रा. रत्नाकर बेडगे (लातूर), प्रा. शिवाजी गायकवाड (लोणी काळभोर), प्रा. समीर आबनावे (उरुळी कांचन) आदींनी शोधनिबंधाचे वाचन केले. प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील (कोल्हापूर), डॉ. अविनाश सांगोलेकर (मराठी विभाग प्रमुख-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), डॉ. शिरीष पाटील (जळगाव), प्राचार्र्या शोभा इंगवले (पुणे), डॉ. नानासाहेब सूर्यवंशी (नांदेड), डॉ. स्नेहल तावरे, इत्यादींनी विविध सत्रांचे अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन डॉ. संभाजी निकम व प्रा. स्नेहा बुरगुल यांनी केले.