शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

राज्यात राजकीय नैतिकतेचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 01:02 IST

‘स्वातंत्र्यानंतर १९७२ पासून २०१६ पर्यंतचा दुष्काळ अनुभवत असताना, शेतकऱ्यांची मुले सत्तेत जाऊनदेखील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात म्हणूनच शेतकऱ्यांचा विकास थांबला.

लोणी काळभोर : ‘‘स्वातंत्र्यानंतर १९७२ पासून २०१६ पर्यंतचा दुष्काळ अनुभवत असताना, शेतकऱ्यांची मुले सत्तेत जाऊनदेखील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात म्हणूनच शेतकऱ्यांचा विकास थांबला. राज्यात विकास करताना राजकीय नैतिकतेचा दुष्काळ पडला आहे. याचे चित्रण मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, ग्रामीण साहित्यातून आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्न तसेच त्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे महात्मा फुले आद्य क्रांतिकारक होते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘दुष्काळाचे मराठी साहित्यातील प्रतिबिंब’ या विषयांवर दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोतापल्ले बोलत होते. या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे प्रशासन सहसचिव डॉ. अशोक करांडे होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी चर्चासत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी, दुष्काळावर मात करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी विषयप्रवर्तक डॉ. सुहास पुजारी (सोलापूर), डॉ. विद्यासागर पाटंगणकर (बीड), डॉ. शिरीष लांडगे पाटील (नेवासा), डॉ. जयद्रथ जाधव (रेणापूर, लातूर), डॉ. उदय जाधव (खटाव, सातारा), इत्यादींनी संशोधनपर लेखांचे वाचन केले. यावर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी वीर राठोड (औरंगाबाद), यांच्यासमवेत डॉ. महादेव वाळुंज (इंदापूर), डॉ. किसन माने (सांगोला), प्रा. अरविंद हंगरेकर (तुळजापूर), ज्ञानेश्वरी मुंडे (औरंगाबाद), डॉ. रामलीला पवार (जालना), डॉ. तानाजी देशमुख (सोलापूर), प्रा. भाऊ गोसावी (कोल्हापूर), डॉ. अशोक तवर (पाचगणी), कु. मयूरा जाधव (सोलापूर), प्रा. रत्नाकर बेडगे (लातूर), प्रा. शिवाजी गायकवाड (लोणी काळभोर), प्रा. समीर आबनावे (उरुळी कांचन) आदींनी शोधनिबंधाचे वाचन केले. प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील (कोल्हापूर), डॉ. अविनाश सांगोलेकर (मराठी विभाग प्रमुख-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), डॉ. शिरीष पाटील (जळगाव), प्राचार्र्या शोभा इंगवले (पुणे), डॉ. नानासाहेब सूर्यवंशी (नांदेड), डॉ. स्नेहल तावरे, इत्यादींनी विविध सत्रांचे अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन डॉ. संभाजी निकम व प्रा. स्नेहा बुरगुल यांनी केले.