शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात राजकीय नैतिकतेचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 01:02 IST

‘स्वातंत्र्यानंतर १९७२ पासून २०१६ पर्यंतचा दुष्काळ अनुभवत असताना, शेतकऱ्यांची मुले सत्तेत जाऊनदेखील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात म्हणूनच शेतकऱ्यांचा विकास थांबला.

लोणी काळभोर : ‘‘स्वातंत्र्यानंतर १९७२ पासून २०१६ पर्यंतचा दुष्काळ अनुभवत असताना, शेतकऱ्यांची मुले सत्तेत जाऊनदेखील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात म्हणूनच शेतकऱ्यांचा विकास थांबला. राज्यात विकास करताना राजकीय नैतिकतेचा दुष्काळ पडला आहे. याचे चित्रण मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, ग्रामीण साहित्यातून आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्न तसेच त्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे महात्मा फुले आद्य क्रांतिकारक होते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘दुष्काळाचे मराठी साहित्यातील प्रतिबिंब’ या विषयांवर दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोतापल्ले बोलत होते. या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे प्रशासन सहसचिव डॉ. अशोक करांडे होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी चर्चासत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी, दुष्काळावर मात करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी विषयप्रवर्तक डॉ. सुहास पुजारी (सोलापूर), डॉ. विद्यासागर पाटंगणकर (बीड), डॉ. शिरीष लांडगे पाटील (नेवासा), डॉ. जयद्रथ जाधव (रेणापूर, लातूर), डॉ. उदय जाधव (खटाव, सातारा), इत्यादींनी संशोधनपर लेखांचे वाचन केले. यावर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी वीर राठोड (औरंगाबाद), यांच्यासमवेत डॉ. महादेव वाळुंज (इंदापूर), डॉ. किसन माने (सांगोला), प्रा. अरविंद हंगरेकर (तुळजापूर), ज्ञानेश्वरी मुंडे (औरंगाबाद), डॉ. रामलीला पवार (जालना), डॉ. तानाजी देशमुख (सोलापूर), प्रा. भाऊ गोसावी (कोल्हापूर), डॉ. अशोक तवर (पाचगणी), कु. मयूरा जाधव (सोलापूर), प्रा. रत्नाकर बेडगे (लातूर), प्रा. शिवाजी गायकवाड (लोणी काळभोर), प्रा. समीर आबनावे (उरुळी कांचन) आदींनी शोधनिबंधाचे वाचन केले. प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील (कोल्हापूर), डॉ. अविनाश सांगोलेकर (मराठी विभाग प्रमुख-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), डॉ. शिरीष पाटील (जळगाव), प्राचार्र्या शोभा इंगवले (पुणे), डॉ. नानासाहेब सूर्यवंशी (नांदेड), डॉ. स्नेहल तावरे, इत्यादींनी विविध सत्रांचे अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन डॉ. संभाजी निकम व प्रा. स्नेहा बुरगुल यांनी केले.