शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

ओबीसी आरक्षणावर राज्य शासनाचा ‘टाईमपास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST

पुणे : “येत्या फेब्रुवारीत महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. तोपर्यंत राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावर फक्त ‘टाईमपास’ करायचा आहे,” ...

पुणे : “येत्या फेब्रुवारीत महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. तोपर्यंत राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावर फक्त ‘टाईमपास’ करायचा आहे,” असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“भाजपा सरकारच्या काळात केंद्र सरकारकडे सेन्सस डेटा मागितला होता. अध्यादेश काढून पाच जिल्ह्यांतील आरक्षण वाचविण्यात आले. मात्र, राज्य शासनाने १३ डिसेंबर ते ४ मार्च २०२१ या काळात मागासवर्ग आयोग का नेमला नाही? इम्पिरिकल डेटा जमा का केला नाही? सरकारने केवळ आदेश देऊन अहवाल दिला असता तरी ओबीसी आरक्षण रद्द झाले नसते,” असा दावा फडणवीस यांनी केला. इम्पिरिकल तपासणी चार महिन्यांत होऊ शकते. जर राज्य शासनाला हे करायचे नसेल तर आम्ही करून देऊ, असे ते म्हणाले. फडणवीस शुक्रवारी (दि. ९) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू राहील. अधिवेशन घ्यायचे असेल तेव्हाच ‘डेल्टा’ कसा येतो. अधिवेशनानंतर चर्चा थांबते तेव्हा कोरोना नसतो का? असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले. राज्य शासनाकडून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याची आयुधे गोठविण्याचे काम सुरू आहे. लोकशाहीला फासावर चढविण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे.

“स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत सर्व जागा भरण्याची घोषणा विधिमंडळात केली. त्यानंतर एमपीएससीच्या सदस्यांच्या जागा भरणार असल्याचे सांगितले. यावरून राज्य सरकार याविषयावर गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. एमपीएससीचा विषय एससीबीसीमुळे अडकल्याचा शासनाचा दावा चूक असून राज्य शासनाने आपली जबाबदारी झटकू नये,” असे फडणवीस म्हणाले.

चौकट

नरकेंनी पुरावे द्यावे

“पुण्यातील हरी नरके हे विचारवंत आहेत. परंतु, ते अर्धसत्य सांगत आहेत. ते ओबीसी समाजाचे प्रवक्ते म्हणून बोलण्याऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत,” अशी टिप्पणीही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली. नरके यांनी धमकावले जात असल्याची तक्रार सोशल मीडियात केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, “त्यांना भाजपाशी संबंधित कोणी जर धमकावत असेल तर तसे पुरावे त्यांनी द्यावेत. मी स्वत: त्यांच्यावर कारवाई करेन.”

चौकट

धनगर आरक्षणाचे काय?

धनगर आरक्षणासाठी कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीतच आम्ही निर्णय घेणार होते. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने धनगर आरक्षणाबाबतचा नकारात्मक अहवाल पाठविला होता. पण त्याचे आम्ही राजकारण केले नाही. आमच्या सरकारने समाजाच्या बाजूने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते, असे फडणवीस म्हणाले.

चौकट

देवेंद्र फडणवीस म्हणाले...

-भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले नेतृत्व आहेत. मुंडे यांच्यावर तयार केलेला स्टॅम्पही कराड यांनी तयार केलेला आहे. भाजपामध्ये संपवा-संपवीचे राजकारण होत नाही. कराड यांच्या मंत्रिपदामुळे माझ्यापेक्षा अधिक आनंद पंकजा आणि प्रितम मुंडे यांना झाला असेल.

-मरणासन्न सहकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जीवनदान मिळाले आहे. अमित शहा हे सहकारातून राजकारणात आले. गुजरातमधील सहकारात शहांचे मोठे नाव आहे. त्यांच्या नावामुळे अनेकांना कापरे भरते हा भाग निराळा असला तरी, ते सहकारातही चांगले काम करतील.

-ओबीसी प्रश्नावर सत्ताधारी उघडे पडले आहेत. हा मुद्दा अंगावर येत असल्याने हा विषय केंद्र सरकारकडे सरकविण्याचा प्रयत्न केला जातोय.

-शिवसेनेच्या मुखपत्रात आलेल्या पंकजा मुंडे यांच्या कथित नाराजी संदर्भातील लेखावर फडणवीस म्हणाले, “राऊत यांना फार कळते, ते फार विद्वान आहेत, असे पत्रकारांना का वाटते?”