शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
6
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
7
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
8
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
9
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
11
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
12
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
13
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
14
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
15
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
16
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
17
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
18
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
19
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
20
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

दुष्काळाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: June 2, 2016 00:34 IST

सद्य:स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे. सत्ताधारी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच रस्ते, पाणी, वीज याबाबत गंभीर स्वरूपाच्या समस्या शेतकऱ्यांना

पाटेठाण : सद्य:स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे. सत्ताधारी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच रस्ते, पाणी, वीज याबाबत गंभीर स्वरूपाच्या समस्या शेतकऱ्यांना भेडासावत असून, शेतातील उत्पादित होत असलेल्या कुठल्याही शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे परिणामी दुहेरी संकटात सापडलेला शेतकरीवर्ग आज सरकारच्या उदासीन धोरणांमुळे देशोधडीला लागला आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पाटेठाण येथे नवीन ग्रामसचिवालय व जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एक वर्ष सत्तेत आलेल्या या सरकारने नुसतेच जाहिरातबाजी करून मोठ्या प्रमाणात विकासकामे करीत असल्याचा दिखाऊपणा करण्याचा सपाटा लावला आहे; परंतु दुष्काळी परिस्थितीत होरपळणारा, शेतकऱ्यांसाठी कुठल्याही कर्जमाफी, तसेच हिताच्या विधायक योजना राबवल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्र्ती बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितले, की माझ्या आमदारकीच्या कालावधीत विकासकामासांठी कुठल्याही गटातटाच्या राजकारणाचा विचार न करता तसेच भेदभाव न करता निधी दिला; परंतु सध्या काही लोक झालेली सर्वच कामे आम्ही मंजूर केली असल्याची टिमकी वाजवत आहेत. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी माजी आमदार अशोक पवार, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, पांडुरंग राऊत, बाळासाहेब थोरात, रोहिणी पवार, योगीनी दिवेकर, नितीन दोरगे, मानसिंग पाचुंदकर, ज्योती खळदे, विकास लवांडे, पाटील यादव, संदीप हंबीर, मनोज हंबीर, भाऊसाहेब ववले, मनोज ववले, शुभांगी थोरात, दिलीप हंडाळ उपस्थित होते. (वार्ताहर)