शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

दुष्काळाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: June 2, 2016 00:34 IST

सद्य:स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे. सत्ताधारी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच रस्ते, पाणी, वीज याबाबत गंभीर स्वरूपाच्या समस्या शेतकऱ्यांना

पाटेठाण : सद्य:स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे. सत्ताधारी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच रस्ते, पाणी, वीज याबाबत गंभीर स्वरूपाच्या समस्या शेतकऱ्यांना भेडासावत असून, शेतातील उत्पादित होत असलेल्या कुठल्याही शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे परिणामी दुहेरी संकटात सापडलेला शेतकरीवर्ग आज सरकारच्या उदासीन धोरणांमुळे देशोधडीला लागला आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पाटेठाण येथे नवीन ग्रामसचिवालय व जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एक वर्ष सत्तेत आलेल्या या सरकारने नुसतेच जाहिरातबाजी करून मोठ्या प्रमाणात विकासकामे करीत असल्याचा दिखाऊपणा करण्याचा सपाटा लावला आहे; परंतु दुष्काळी परिस्थितीत होरपळणारा, शेतकऱ्यांसाठी कुठल्याही कर्जमाफी, तसेच हिताच्या विधायक योजना राबवल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्र्ती बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितले, की माझ्या आमदारकीच्या कालावधीत विकासकामासांठी कुठल्याही गटातटाच्या राजकारणाचा विचार न करता तसेच भेदभाव न करता निधी दिला; परंतु सध्या काही लोक झालेली सर्वच कामे आम्ही मंजूर केली असल्याची टिमकी वाजवत आहेत. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी माजी आमदार अशोक पवार, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, पांडुरंग राऊत, बाळासाहेब थोरात, रोहिणी पवार, योगीनी दिवेकर, नितीन दोरगे, मानसिंग पाचुंदकर, ज्योती खळदे, विकास लवांडे, पाटील यादव, संदीप हंबीर, मनोज हंबीर, भाऊसाहेब ववले, मनोज ववले, शुभांगी थोरात, दिलीप हंडाळ उपस्थित होते. (वार्ताहर)