शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

राज्य शासनाने आयुर्वेदिक औषधांची योजना सुरू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

डॉ. सुहास परचुरे यांचे शासनाला पत्र : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास पाच सिद्ध औषधे उपयुक्त पुणे : कोरोनाच्या साथीचा उद्रेक पुन्हा ...

डॉ. सुहास परचुरे यांचे शासनाला पत्र : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास पाच सिद्ध औषधे उपयुक्त

पुणे : कोरोनाच्या साथीचा उद्रेक पुन्हा सुरू झाला आहे. विषाणुविरोधात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधांना मान्यता देऊन ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय योजना सुरू करावी, अशी मागणी निमाचे माजी अध्यक्ष आणि आयुर्वेद रसशाळेचे संस्थापक डॉ. सुहास परचुरे यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासीही याबाबत पत्रव्यवहार केला जाणार आहे.

''कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून मी आजवर जवळपास ८०० हून अधिक लोकांना आयुर्वेदिक औषधे दिली आहेत. त्यापैकी कोणालाही कोरोनाचा त्रास झालेला नाही. आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. अमेरिकेत झालेल्या संशोधनामध्ये औषधांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. भारताला आयुर्वेदाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. शासनाच्या प्रयोगशाळाही सुसज्ज आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत संशोधन करून त्या आधारे औषधांना मान्यता द्यावी'', अशी माहिती डॉ. परचुरे यांनी ''लोकमत''ला दिली.

परचुरे यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, ''सध्याची लस ही कोरोना होऊ नये आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, यासाठीच दिली जात आहे. आत्तापर्यंत भारतात सुमारे १ कोटी बाधित असले, तरी १०० कोटी प्रत्यक्ष नाहीत. लस दिल्यावर सर्व भारतीयांसाठी मी एक योजना सुचवत आहे. आयुर्वेदात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी अश्वगंधा चूर्ण, गुळवेल चूर्ण, शुंठी, ज्येष्ठमध (यष्टिमधु) आणि भीमसेनी कापूर ही पाच सिद्ध औषधे आहेत. याचे वाटप किमान महाराष्ट्र शासनाने सुरु करावे. मी माझ्या ओळखीचे, मित्र नातेवाईक यांना गेले ३ महिने ही औषधे देत आहे. एकालाही कोणताही त्रास झालेला नाही. यावर शासन निधीतून संशोधनही करता होईल आणि जनतेस फायदा होईल. या योजनेला ''सुहास योजना'' असे नाव देता येईल.''

श्वसनाशी संबंधित विकारांवर ज्येष्ठमध आणि भीमसेनी कापूर उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. आयुर्वेदिक औषधांचा कोणताही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. आयुष मंत्रालयातर्फे कोरोना साथीच्या सुरुवातीपासून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने काही औषधे आणि उपाय सुचवण्यात आले आहेत. याच धर्तीवर राज्य सरकारकडून वरील पाच औषधे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.