शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केंद्रीय विमुक्त, भटके व अर्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केंद्रीय विमुक्त, भटके व अर्ध भटके विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी केली. याबाबत त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबईत भेट घेतली व त्यांना निवेदन दिले व यात लक्ष घालण्याची विनंती केली.

कोश्यारी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, निवेदन स्वीकारले व सर्व संबंधितांबरोबर याविषयी बोलण्याचे आश्वासनही दिले. इदाते यांनी त्यांना सांगितले की केंद्र सरकार या समाजघटकाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रानेही यापूर्वी या विषयात देशाला दिशा देणारे निर्णय घेतले, मात्र सन २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले व सर्वप्रथम विमुक्त जाती भटक्या जमाती मंत्रालयाचे नाव बदलून ते बहुजन कल्याण मंत्रालय करण्यात आले. त्यातून या मंत्रालयाचे काम त्याचा पुरेसा बोध होत नाही, तसेच मागील ६० वर्षांपासून असलेली त्यांची ओळख पुसण्याचा हा प्रयत्न आहे.

महाज्योती संस्था वि.जा.भ.ज.,ओबीसी एसबीसी साठी असताना या संस्थेवर एकही प्रतिनिधी विजाभज प्रवर्गातील घेतलेला नाही. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे अद्यापही भटक्या विमुक्तांचे सर्वेक्षण चालू केले नाही, याकडेही इदाते यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यात जिल्हास्तरावर भटके विमुक्त समस्या निराकारण समित्या गठित स्थापन कराव्यात, समाजाचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांमध्ये संशोधन केंद्र स्थापन करावे अशा मागण्यांचे निवेदन इदाते यांनी राज्यपालांना दिले. या वेळी जनजाती विकास परिषदेचे कार्यवाह अनिल फड तसेच अजित आंब्रे उपस्थित होते.