शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केंद्रीय विमुक्त, भटके व अर्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केंद्रीय विमुक्त, भटके व अर्ध भटके विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी केली. याबाबत त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबईत भेट घेतली व त्यांना निवेदन दिले व यात लक्ष घालण्याची विनंती केली.

कोश्यारी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, निवेदन स्वीकारले व सर्व संबंधितांबरोबर याविषयी बोलण्याचे आश्वासनही दिले. इदाते यांनी त्यांना सांगितले की केंद्र सरकार या समाजघटकाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रानेही यापूर्वी या विषयात देशाला दिशा देणारे निर्णय घेतले, मात्र सन २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले व सर्वप्रथम विमुक्त जाती भटक्या जमाती मंत्रालयाचे नाव बदलून ते बहुजन कल्याण मंत्रालय करण्यात आले. त्यातून या मंत्रालयाचे काम त्याचा पुरेसा बोध होत नाही, तसेच मागील ६० वर्षांपासून असलेली त्यांची ओळख पुसण्याचा हा प्रयत्न आहे.

महाज्योती संस्था वि.जा.भ.ज.,ओबीसी एसबीसी साठी असताना या संस्थेवर एकही प्रतिनिधी विजाभज प्रवर्गातील घेतलेला नाही. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे अद्यापही भटक्या विमुक्तांचे सर्वेक्षण चालू केले नाही, याकडेही इदाते यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यात जिल्हास्तरावर भटके विमुक्त समस्या निराकारण समित्या गठित स्थापन कराव्यात, समाजाचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांमध्ये संशोधन केंद्र स्थापन करावे अशा मागण्यांचे निवेदन इदाते यांनी राज्यपालांना दिले. या वेळी जनजाती विकास परिषदेचे कार्यवाह अनिल फड तसेच अजित आंब्रे उपस्थित होते.