शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

सरळ सेवेसाठी कंपनी निवडण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST

पुणे: सरळ सेवा पद भरतीसाठी महाआयटीकडून कंपन्यांच्या निवड प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची नावे ...

पुणे: सरळ सेवा पद भरतीसाठी महाआयटीकडून कंपन्यांच्या निवड प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची नावे निवड यादीमध्ये दिसत असल्याने पुन्हा भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली . या पार्श्वभूमीवर महाआयटीकडून सरळ सेवा पद भरतीसाठी सुमारे २५ वेळा मुदतवाढ देऊन कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले. मात्र, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सर्व भरती प्रक्रिया राबविण्यास संदर्भात सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. मात्र, काळ्या यादीतील कंपन्यांनी निवड करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली होत असल्याचे दिसून येते आहे,असे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, सरळ सेवा पदभरतीसाठी मनविसेकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता.ओएमआर पद्धतीने सरळ सेवा पदभरती करण्यासाठी महाआयटीतर्फे कंपनीची निवड प्रक्रिया पूर्ण केली जात असून येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर कंपन्यांची अंतिम निवड यादी तंत्रज्ञान विभागाकडे पाठविली जाणार असल्याचे महाआयटीने मनविसेला कळविण्यात आले आहे. त्यामुळे सरळ सेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला.