शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

सरळ सेवेसाठी कंपनी निवडण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST

पुणे: सरळ सेवा पद भरतीसाठी महाआयटीकडून कंपन्यांच्या निवड प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची नावे ...

पुणे: सरळ सेवा पद भरतीसाठी महाआयटीकडून कंपन्यांच्या निवड प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची नावे निवड यादीमध्ये दिसत असल्याने पुन्हा भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली . या पार्श्वभूमीवर महाआयटीकडून सरळ सेवा पद भरतीसाठी सुमारे २५ वेळा मुदतवाढ देऊन कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले. मात्र, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सर्व भरती प्रक्रिया राबविण्यास संदर्भात सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. मात्र, काळ्या यादीतील कंपन्यांनी निवड करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली होत असल्याचे दिसून येते आहे,असे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, सरळ सेवा पदभरतीसाठी मनविसेकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता.ओएमआर पद्धतीने सरळ सेवा पदभरती करण्यासाठी महाआयटीतर्फे कंपनीची निवड प्रक्रिया पूर्ण केली जात असून येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर कंपन्यांची अंतिम निवड यादी तंत्रज्ञान विभागाकडे पाठविली जाणार असल्याचे महाआयटीने मनविसेला कळविण्यात आले आहे. त्यामुळे सरळ सेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला.