शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

महामार्गाच्या भूसंपादनासाठी विशेष पॅकेजची मागणी

By admin | Updated: May 10, 2015 04:56 IST

भूसंपादनाच्या नवीन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर जागा मालकांनी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे. भूसंपादनाचे काम रखडल्यामुळे

पुणे : भूसंपादनाच्या नवीन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर जागा मालकांनी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे. भूसंपादनाचे काम रखडल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पुणे-नाशिक महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. याबाबत १५ मे नंतर प्रत्येक गावांमध्ये शिबिर घेऊन नागरिकांना भूसंपादनाचे पैसे वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.पुणे-नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. यात नाशिक जिल्ह्यात रस्त्याचे रुदीकरणाचे बहुतेक काम पूर्ण होत आले आहे. परंतु, पुणे जिल्ह्यात रस्त्यांसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाला विरोध होत आहे. यामध्ये आळेफाटा, नारायणगाव, मंचर आणि राजगुरुनगर येथे नागरिकांनी रस्त्यासाठी जागा देण्यास विरोध केला आहे. तसेच नारायणगाव, राजगुरुनगर येथे बायपास करण्यात येणार असून, याला देखील नागरिकांचा विरोध आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील ३२ किलोमीटरचे भूसंपादन रखडले आहे. या ३२ किलोमीटरमध्ये १२ गावे येत असून, यापैकी सुमारे ११ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. हे भूसंपादन करण्यासाठी एनएचआय विभागाने सुमारे २४ कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे. यापैकी भूसंपादन विभागाने आतापर्यंत केवळ सहा कोटी रुपयांचे वाटप जागा मालकांना केले. त्यामुळे आता शिल्लक असलेल्या पैशाचे वाटप करण्यासाठी १४ मे ते १० जून दरम्यान प्रत्येक गावांमध्ये खास शिबिराचे आयोजन करुन पैशाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर भूसंपादनाच्या कामाला वेग येईल, असे राव यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)