शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वाचन, लेखन कौशल्य विकासासाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद असल्याने‌ त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. अनेक विद्यार्थ्यांची लेखन व वाचनाची ...

पुणे : कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद असल्याने‌ त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. अनेक विद्यार्थ्यांची लेखन व वाचनाची गती मंदावली आहे. त्यामुळेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत विशेष मोहीम हाती घेण्यासंदर्भात विचार केला जात आहे. त्या-त्या वर्गात विद्यार्थ्यांचे अपेक्षित वाचन व लेखन कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स तयार करणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

वर्षभरापासून विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, ऑनलाइन शिक्षणाला अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने विकसित होणारे लेखन कौशल्य आणि वाचन कौशल्य यावर चांगलाच परिणाम झाला आहे. विद्यार्थी वर्गामध्ये असताना शिक्षक त्याच्या वाचन व लेखनाकडे लक्ष देतात. त्यातून विद्यार्थ्यांचे हे दोन्ही कौशल्य विकसित होण्यास मदत होते. परंतु, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक प्रगतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली आहे.

--

ऑनलाइन शिक्षणामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या लेखन व वाचन कौशल्यावर परिणाम झाला आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील. शिक्षण विभागातर्फे याबाबत विचार केला जात आहे.

- दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

---

सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन कौशल्ये विकासित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) ब्रिज कोर्स तयार करण्याचा विचार केला जात आहे.

- दिनकर टेमकर, संचालक एससीईआरटी

--

प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची प्रगती श्रावण, भाषण, वाचन आणि लेखन या चार कौशल्यांशी निगडित असते. शाळा बंद असल्यामुळे त्यावर परिणाम झाला आहे. मात्र, पालकांनी व शिक्षकांनी यात पुढाकार घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढता येईल. शिक्षकांच्या मदतीने पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्यावा. शक्य झाल्यास परिसरातील समवयस्क मुलांचे गट तयार करून त्यांचे वाचन व लेखन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करावा.

- गोविंद नांदेड, माजी संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

--

विद्यार्थ्यांनी वर्षभर लिखाणच केले नाही. अर्ध्या तासाच्या लिखाणाला काही विद्यार्थ्यांना दोन तास लागत असल्याचे अलीकडे दिसून आले आहे.त्यामुळेच इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा वेळ वाढवून दिला. ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या लेखन व वाचन कौशल्याकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे पालकांची भूमिका यात महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी दिलेले लेखन विद्यार्थी वेळेत पूर्ण करतात की नाही हे पालकांनी तपासणे आवश्यक आहे.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महासंघ