शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पेरणी लांबली; पालेभाज्या पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 04:50 IST

खरीप पिकांच्या पेरणीअभावी शेतात पालेभाज्यांची टाकणी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडला आहे. विविध पालेभाज्यांचे उत्पादन घेऊन त्यापासून आर्थिक उत्पन्न प्राप्त करण्याचा मानस

शेलपिंपळगाव : खरीप पिकांच्या पेरणीअभावी शेतात पालेभाज्यांची टाकणी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडला आहे. विविध पालेभाज्यांचे उत्पादन घेऊन त्यापासून आर्थिक उत्पन्न प्राप्त करण्याचा मानस शेतकरीवर्गात जोरात सुरू आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून पालेभाज्यांना बाजारात प्रचंड मागणी असल्याने भाज्यांचे दरही उच्चांकी पातळीवर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांसाठी ही एक जमेची बाजू ठरणार आहे.चालू पावसाळी हंगामाला सात जून मृग नक्षत्रापासून सुरुवात झाली आहे. मात्र, प्रारंभीच्याच नक्षत्रात पावसाने ओढ दिल्याने ओलीअभावी शेतात खरीप पिकांच्या पेरण्या करता येत नसल्याने हजारो हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप पिकांच्या पेरण्यांना कालावधीपेक्षा जास्त उशीर होत असल्याने बहुतांशी शेतकरी शेतात विविध पालेभाज्या तसेच तोडणीयुक्त पिकांच्या लागवडी करण्यास पसंती देत आहेत. तोडीव पिकांनाही मार्केटमध्ये चांगला बाजारभाव लाभत असल्याने शेतकऱ्यांचे खरिपाचे ‘आर्थिक’ बजेट समतोलात ठेवण्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. हंगामात पावसाअभावी पेरणीयुक्त पिकांची पीछेहाट होत असल्याने शेतकऱ्यांचे पीक नियोजन कोलमडले जाऊ लागले आहे. यावर उपाय म्हणून बहुतांशी शेतकऱ्यांनी पालेभाज्या, तोडीव माल व फुलशेती करण्यास पसंती दिली आहे. शेतातील टाकणीयुक्त पालेभाजांची पिके चार-पाच दिवसांची झाली असून, बियाणांना मोड येऊ लागले आहेत. (वार्ताहर)खरीप हंगामाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने पेरण्यांची कामे प्रलंबित आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पालेभाज्यावर्गीय पिकांचे उत्पादन घेण्याकडे पसंती दिली आहे. साधारण महिना ते दीड महिन्यात पूर्णत्वास येणाऱ्या पालेभाज्यांची टाकणी शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणावर पूर्ण केली आहे. खेडच्या पूर्व भागातील शेलगाव, दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव, वडगाव-घेनंद, मरकळ, गोलेगाव, बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, नवीनगाव, मोहितेवाडी, चिंचोशी आदी गावांसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात पालेभाज्या टाकणी सुरू आहे.