शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सोलापूरसाठी नदीत सोडलेले पाणीही जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST

कळस : उजनीतून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने वातावरण पेटले आहे. आता सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून ...

कळस : उजनीतून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने वातावरण पेटले आहे. आता सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून पाणीची तरतूद नसल्याने एक थेंबही जाऊ दिला जाणार नाही. सध्या नदीतून देण्यात आलेले पाणीही बंद पाडण्यात येईल, असा इशारा इंदापूर शेतकरी कृति समितीने दिला आहे.

कळस (ता. इंदापूर) येथे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला देण्यात येणारे पाणी हे आमच्या हक्काचे आहे. त्यास सोलापूरमधून होणारा विरोध हे राजकीय द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नाही. मात्र, सोलापूरला ऑक्टोबरनंतर अनधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य आहे. सध्या सोलापूरला नदीतून देण्यात येणारे पाणीही बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी आमची खोडी काढली आहे, त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त शेतकऱ्यांनी इंदापूरच्या पाण्यास विरोध करणाऱ्यांचा जोडे मारून व मुंडण करून निषेध केला. सणसर येथेही शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय आंदोलन केले. वडापुरी (ता. इंदापूर) येथील इंदापूर-बावडा रस्त्यावर शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन अर्धा तास रास्ता शासनाने फेरविचार करावा, अन्यथा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे अभिजित तांबीले यांनी सांगितले. कळंबमध्ये पाणी रद्दच्या आदेशाचा काळ्या फिती बांधून निषेध करत बोंबाबोंब आंदोलन करून तीव्र आंदोलन पुकारले आहे.